Monday, December 31, 2007

वर्ष सरे

वर्ष सरे
आठ्वनी उरे
चाहुल येइ
नव्या्ची

जुनी जळमटे
आमच्यासाठी कस्पटे
नवीन वाट फुटे
ह्या वर्षीपासुंची

स्वागताचा जल्लोष
आनंदात बेहोष
येते फोडुनी कोष
फूल पाखरु नवे

मिळुन आपण सगळे
करुया त्यास रान मोकळे
बागडुया त्याच्या बरोबर पण
स्वतःस तोडु या संकोचा मधुन

काढुन डोळ्यावरची झालर
३१ चा करुनी जागर
संकल्प एक अजुन सोडु या
स्वतःचे एक अस्तित्व शोधु या

Thursday, November 22, 2007

जमलंच तर परत ये!!!

जमलंच तर परत ये!!!

भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये!
साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!

कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये!

महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठी तरी परत ये!

मी वेडा, मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य;
तू तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये!

थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये!

तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले;
या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत

Friday, August 03, 2007

दु:खाच्या घरी एकदा जमली होती पार्टी

मुग्धा खोंड
दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कुणाच्या ही नजरेत..."

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी

फ़ुलांना जर अस

प्रमोद बेजकर
फ़ुलांना जर असे आहेच कोमेजायचे
कशाला जीव लावुन ताटवे फ़ुलवायचे

कशासाठी पसारा मांडला तू एवढा
तुला आहेत सारे सूर्य जर विझवायचे

पुन्हा भिजलो न मी भिजलो मिळुन दोघे जसे
विसरले मेघही नंतर तसे बरसायचे

विचारे सारखी येऊन आठवणीत ती
किती वेळा ठरवले तू मला विसरायचे

नको पाहू अशी तू एकटक माझ्याकडे
तुझ्या डोळ्यात माझे गीतही हरवायचे

'पुन्हा भेटू' जरी म्हटले निरोपाच्या क्षणी
उमजलो मी पुन्हा नाही कधी भेटायचे

सदा माझे तुझे माझे तुझे माझे तुझे
अमीबांचे कधी या विश्व विस्तारायचे

तुला बघताच माझी गझल बोलू लागते
मला नाहीच जमले पण कधी बोलायचे

Thursday, August 02, 2007

पुन्याच्या पोरी

पुन्याच्या पोरी रे पुन्याच्या पोरी
बुक्क्यान्चा मार पन बोलायची चोरी

दिसायला असेल पडलेला प्रकाश जरी
मगावं स्ट्राबेरी तर मिळते मारी

कुनी असेल स्मार्ट तर कुनी असेल गोरी
जवल जाउन बघा यांची पाटिच कोरी

झाल्या किती मोठ्य़ा तरी एकतील लोरी
पेन्टहाउस ला जशी एक अट्याच मोरी

थोड्या आहेत बाभाळी अन थोड्याश्या बोरी
कुठलीही पोरगी तशी आहे फ़ाशीचिच दोरी

पुन्याचा पोरिंचा असतो हजारदा रीटेक
ब्याटींग करता करता उडालेली असते विकेट

TVS ची SCOOTY आनी BAJAJ ची SUNNY
श्याम्पू लावला तरी सुटत नाही फ़नी

बाहेर जाताना यान्चे तोंड असते झाकलेले
असावेत यान्ना स्वताचे वीकपॊईन्ट समजलेले

पोरिंना वाटते आम्हि पावसाच्या गारा
अग उडालेला फ़्युज तुमचा तुम्हि तुट्लेल्या तारा

सान्गायला सरळ असतात या पोरि वागायला पाजी
खानार्र्याने जपुन खावी हि कार्ल्याची भाजी

म्हनुन पुन्याच्या पोरी रे पुन्याच्या पोरी
बुक्क्यान्चा मार पन बोलायची चोरी

Wednesday, August 01, 2007

आयुष्य


आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी

Wednesday, July 25, 2007

राजे

-कमलेश भान्ड्वलकर
मोघलान्नी हिन्दुन्ना
केल होते गुलाम
आपल्या प्रत्येक श्वाशाचा
हाति त्यान्च्या होता लगाम

हिन्दुन्ना नव्हती अब्रु
नव्हता त्यान्ना मान
स्त्रियान्ची नव्हती कदर
लान्घयचे होते पारतन्त्राचे रान

अशातच तुतारीन्च्या आवाजने
अवघे शिवनेरी दुमदुमले
सन १६२६ अक्शय्यत्रुतियेला
राजे प्रुथ्वीवर अवतरले

राजान्ना होती पुर्ण
परिस्थितिची जाण
सशपथ राज्याभिशेक
करुन झाले मराठ्यान्ची शान

गनिमी कावा हेच
त्यान्चे परिपुर्ण अस्त्र
विश्वासाने सन्घटित मावळे
हेच त्यान्चे अस्त्र

शाहिस्तेखानाची कापली बोटे
अफ़झलखानाचा केला अन्त
मोघलशाहिला पुर्ण हलविले
पराक्रम त्यान्चे अनन्त

राजे तुम्ही होता म्हणूनच
आज आहेत मन्दिरान्चे कळस
गळ्यात डोलते मन्गळ्सूत्र
अन्गनी शोभते तुळस

राजे तुम्ही होता म्हणूनच
आज आहे कुन्कु कपाळी
आशीर्वाद आहेत
प्रसन्न आहे माती काळी

राजे तुम्ही होता म्हणूनच
कमरेला आहे करदोरा
हिन्दु आहेत जगाच्या पुढे
चालतोय त्यान्चाच तोरा

राजे तुम्ही होता म्हणूनच
आज आम्ही आहोत
आमचे शत:कोटी प्रणाम
तुमच्या चरणी जावोत

एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला

एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला
तुझ्या नकळत मी तुझ्यावर प्रेम केलं
तुझ्या बरोबर आयुष्यभर राहण्याचं स्वप्न पाहीलं
तुझ्यामुळेच प्रेमाचा खरा अर्थ मला कळला
पण या प्रेमाची जाणीव कशी करुन देऊ तुला


जिथे जिथे पाहतोय तु आणि फ़क्त तुच दिसतेस
नजरेस नजर देता खट्याळ हसतेस
तुझं बरोबर असणं जणू स्वप्न वाटे मला
मला सगळीकडे तुच दिसतेस
पण मग मीच कसा गं दिसत नाही तुला


तु अजाण आहेस माझ्या या प्रेमाने
सांगितल नेहमी मुक्या ईशा-याने
पण तो ईशारा तुला कधीच कसां ना कळला
कधी मी सगळ शब्दात सांगु शकेन का तुला?


एकदा निश्चयच केला होता तुला विसरण्याचा
हजारदा केला प्रयत्न सगळं संपवण्याचा
पण प्रत्येक प्रयत्न माझा, माझ्याच प्रेमापुढे फ़ोल ठरला
जणु हे वेडं मन कधी विसरुच शकत नाही तुला


आता तर फ़क्त एकच स्वप्न आहे या मनाचं
तुज्यासोबत शेवटपर्यंत जगण्याचं
एक दिवस नक्कीच जिंकेल
हा वेडा जीव आज जो या खेळात हरला
एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला

तुलाच शोधतोय!

तुलाच शोधतोय!

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना......
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना... कण-कण मरतांना.......

आयुष्य म्हणजे हेच असत......

....सई(सुप्रिया पाटील)
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
प्रवाहासारखं...येईल त्याला सोबत घेत जाणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
स्व:तची दु:ख विसरून दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
भूतकाळाच्या गोड आठवणीं सोबत वर्तमानात जगणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
एकटं येऊन गर्दीत जगून पुन्हा एकटं निघून जाणं........

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
थोडसं रडणं आणि खूपखुप हसणं.......

निर्णय

@मोनिका घरत.
मनात होते कधी एकदा
तुझ्यासवे वाळूत फिरावे
विसरूनी या सार्‍या जगताला
प्रेमगीत हे मिळुनी गावे

आयुष्याच्या एका संध्याकाळी
एक आठवण मनात सलते
अधुरे राहीले स्वप्न माझे
जुळले नाही अपुले नाते

विनंती एकच विसरूनी जा हे
तुझ्या परीने उणी आहे मी
सुखी रहा तू सार्‍या जन्मी
तव मार्गातुन दूर उभी मी

धागा द्या धागा द्या

ही कविता मी कोणालाही उद्धेशून लिहीलेली नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका.
हवं तर ह्या कवितेचा संबंध माझ्याशी जोडा.
@सनिल पांगे

धागा द्या धागा द्या (धागा = THREAD, -- इति ओर्कुत)
आम्हालाही थोडा धागा द्या
आमच्या शब्दांनाही इथे
व्यासपीटावर जागा द्या

धागा द्या धागा द्या
प्रेत्येकाचं मन म्हणतं
तुमचं नाणं सोन्याचं असलं
तरी आमचं पितळेचंही खणंखणंतं

येऊ द्या येऊ द्या
आम्हालाही पुढे येऊ द्या
चढाओढीच्या खेळा मध्ये
आम्हालाही भाग घेऊ द्या (चढा-ओढ - माझाही वाटा मोठा आहे)

जिंकू द्या, जिंकू द्या
आम्हालाही मन जिंकू द्या
आमच्या शब्दांनाही थोडाबहूत
कवितेत प्राण फुंकू द्या

ऋणानूबंध, ऋणानूबंध
आम्हालाही ऋणी होऊ द्या
तुमचे आभार मनापासून माणून
आम्हालाही कोणि होऊ द्या

मिरवू द्य, मिरवू द्या
आमच्याही कवितेंना मिरवू द्या
आमच्या बावळट मुलांच्या डोईवर
कोणालातरी हात फिरवू द्या

निस्व:र्थ व्हा, निस्व:र्थ व्हा
आमचही घर वसू ध्या
मागच्या बाकावर पडलो आम्ही
कधीतरी पुढे बसू द्या

दान द्या, भिक्षा द्या
प्रतिसाद आम्हाला हकखास द्या
आमच्याही गुदमरत जाणाऱ्या कवितेना
जगवण्यासाठी एक श्वास द्या

मज आजहि उमगेना

मज आजहि उमगेना
प्रिये,सान्ग सखे कुठे चुकलो समजेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

मज जीवनास अर्थ दिलास खरा
तुच तु होतिस जिवनी चैतन्यचा झर
हा झरा आटतना मज आज पहावेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

तुझीच वाट पाहिली चातकासम
आज हा कसा पसरी जीवनतम?
मज चातका ह्या दुश्काळी अता रहवेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

मज जीवनी प्रवेश केलास गुपचुप
कसे सहावे नियतीचे हे क्रुर रुप
तुझ्यविन जिवन आता जगवेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

जिथे असशी रहा मान्गल्य सुखाने
कधी स्पर्श न करावा जीवनी दु:खाने
पण तुझ्यविन मज माझे अस्तित्वच जाणवेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

हे मुंबईकर

ही मी निघाले माझ्या रस्त्यावर
रोजचीच वाट, रोजचेच धावणे
रोजचीच गर्दी, रोजचेच पाहुणे
माझ्यामागे त्यांचे रोजचेच धावणे

मुंबापुरी माझ्याबरोबर झोपते उठते
माझ्यासोबतच दिवस जगते
माझ्या प्रत्येक फेरीबरोबर
त्यांचे जीवन वेग धरते

झुकझुक माझ्या श्वासाबरोबर
त्यांचे जीवन ताल धरते
कधी संगीत तर कधी विसंगत
सुरावटीत ते ऐकु येते

प्रत्येक प्रवासी हितगुज करतो
सुखदुखांची रास उधळतो
माझ्यासोबत मनास मने
जुळवण्याचे तो प्रयत्न करतो

मी नेहमीच धावते
उनपावसाची कशास तमा
हेच मझे सांगणे तुम्हासी
जीवनगाणे गात रहा

(सगळे व्यवस्थित चालले होते...
पण नजर लागली कोणाची...?
तारीखः ११ जुलै २००५)

ते नरधम माझ्या जीवावर उठले
चढले ते शस्त्रास्त्रांनी स्फोटक सोडुन गेले
मोठ्या धमाक्याने तेव्हा माझे अंग चिरटले
आणि माझ्या साथिदारांच्या जिवाचे कत्तल केले

एक धमाका एक स्फोट
किती जिवांची कत्तल
तो आक्रोश ती धावपळ
जगण्याची ती धडपड

ती शरीराची लक्तरे,
ते लटकलेले हात,
ते रक्ताचे थारोळे,
निर्दयांनी केला घात

ती पिळवटलेली नजर,
विचारते 'मीच का?'
पाहणार्याच्या नजरेलाही
असह्य होतो धक्का

पहा पहा त्या बाळाचा आक्रोश
निर्जीव आईच्या कुशीत
सहज गेला नसेल जीव तिचा
त्याच्या भविष्याच्या विचारत

मग दिसतात सरसावलेले
तत्पर मदतीचे हात
घायाळांना दिलासा देणारे
ते देवाचे अवतार

वर्षे उलटली काळही सरला
मागे व्रणही ठेवुन गेला
निर्दयतेच्या क्रुर प्रसंगी
जीवनात घाव सोडुन गेला

खचले तेव्हा मी ,म्हणाले आता माझे कोणी नाही
मझ्याबरोबर राहुन जीव गमावेल कोणी

परंतु..

माझे नमन तुझ्या चरणी
हे मुंबईकर,
तुझ्या धाडसाला माझा सलाम,
ठेंगा दाखवुन दहशतवाद्यांना,
तु सुरु केलेस आपले काम

पाउस असा हा झरतो

पाउस असा हा झरतो
पानांतुन गाणी गातो
नभ घेवुनी उशाशी
मोत्यांची स्वप्ने देतो

ओल्या मनात माझ्या
दडुनी खुशाल बसतो
रोमांच होवुनी वा
हातावरी उमटतो

थेंबात ये रुपेरी
घेई खुशाल झोके
मातीतुनी उगवती
त्याची अनंत रुपे

पाउस आसमंती
पाउस अंतरात
पाउस होवुनी मी
माझ्या मनी त्रुषार्त

माझे स्वप्नं माला हसतात.

माझे स्वप्नं माला हसतात.
मी त्याला भेटते आणि सर्वस्वं विसरुन जाते,
जशी वैशाखात ही धरा बहरुन येते.

तो बोलायला सुरुवात करतो,
आणि मी फ़क्तं त्याच्याकडे बघते,

मग प्रत्येक श्वसात,उदांत,
डोळ्यात त्याला सठवते.

थोड्या वेळानी,तो ही एकदा,
प्रेमाने नजर फ़िरवतो.

माझा हाथ,प्रेमाने
त्याच्या हथात घेतो.

मी पण माझं मन माझ्या
हाथात ठेउन त्याला देते,

आणि त्या क्शणी मनाला,
असलेली त्याची हुर हुर जणवते.

बराच वेळ असाच निघुन जातो,
एकमेकांच्या डोळ्यन्नी अवघं विश्वं फ़िरुन येतो.

मग वर्याच्या हळुवार वेगात मी त्याच्या कुशित शिरते,
आणि परत एक्दा स्वत:ला मी त्याच्या अधीन करते.

त्याच्या श्वसाचा सुगन्धं,मी कधिच माझा केलेला असतो,
आणि एकमेकांच्या प्रेमात आम्हि स्वत:ला विसरुन जातो.

अचानक सगळं सुन्दर दिसयला लगतं,
वारा काहीतरी कानात गुणगुणतो,

मग वतवरण उगाच बदलतं,
आकाशात काळे ढ्ग जमुन येतात,
सोबत पवसांच्या सरी घेउन येतात.

वीज चमकते,मी त्यच्या कुशीत शिरते,
आवाज होतो ढ्गांचा,मी मिट्लेले डोळे खाडकन उघडते.

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते............

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
मन चांदण्यात न्हावुन निघते
आशेच्या पावासाळी सरीने
डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते
माझ्या मनातल्या कोरया कॅनवास वर
तुझं चित्र मग आपोआपच उमटते

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
जणु श्रावणातली पहीली सर बरसते
तुझ्या आठवणींच्या सरीने
कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला
मग नवी पालवी फ़ुटते
रात्रीच्या गर्द काळोखी आभाळातली
शांत चांदणी जणु पुन्हा चमकते
माझी नजर मग
त्या चांदण्यातही तुलाच शोधिते

कधी कधी तर वाटते की जाऊदे
तु नाही तर तुझी आठवण तरी येते
कमीत कमी माझं उदास मन थोडंतरी हसते

भावना मनाच्या कोणा न कळल्या .............

शब्द बांधील ती प्रेम गुपिते
मी मुद्दामच नव्हती खोलली
उगवत्या मनाच्या स्वप्नांची
जणु ईच्छाच होती मावळली

तुझ्या आठवणीत तेव्हा
प्रत्येक रात्र मी जागवली
तुझ्या बरोबरच्या प्रत्येक
क्षणाला न विसरण्याची शपथ मी दिली

अविस्मरणीय त्या क्षणात आता
असहनीयशी वेदनाच फ़क्त ऊरली
त्या वेदनेची लहर मनाच्या
अंतरी खोलवर पोहोचली

आनंदाच्या गावची वेस जणू
आता खुप मागे राहीली
वाटतय ती भाग्यलक्ष्मी जणु
माझ्यावर कायमचीच रागवली

सहन मी एकट्यानेच केलं
तुझी सोबत जरी नसली
मन बिचांर एकटच जळांल
तुझी आठवण जेव्हा जेव्हा पेटुन उठली

एकतरी प्रेम कविता-हास्य कविता

एकतरी प्रेम कविता म्हटल करावी
दोन-एक सिनेमे पाहिले की जमावी
अलगद शब्द जुळवुनी ती घडावी
'ह' यात काय अवघड लेखणी म्हणाली

मग 'मुघले आझम'ची पारायणे केली
रटाळ'गणिते'सोडुन प्रेमकोडीन्ची सवय लावली
त्या कमिटेड मैत्रिणीची रोज आस्थेने विचारपुस केली
'ह' यात काय अवघड लेखणी म्हणाली

बागेत संध्याकाळी हटकुन राणीला खेळायला न्यायची
प्रेमभंगात बुडालेल्या मित्राची चोरुन डायरी
वाचायची
आर्चिजच्या दुकानात घुसल्यावर'तीच' पाहयची
'ह' यात काय अवघड लेखणी म्हणाली

दिवसामागुन दिवस ,महिन्या मागुन महिने
शब्द काही सापडेना ना जमेना.
.
.
कसे जमणार?प्रीत जणु निस्वार्थ 'त्याग'
एकाच प्रेमकवितेसाठी 'स्वार्थी'मला हे उमगेना
.
.
मंडळी
म्हणुन मी'ताज'ला व्होट देऊन मी मोकळी झाले
@भक्ती

एखादा पावसाळा............!!!!!!!!

पाऊस म्हणजे काय?
तर शरीराबरोबर मनालाही चिंब भिजावणारा,
जतन केलेल्या आठवणी अलगदपणे उलगडायला लावणारा.

मित्र-मैत्रीणिंबरोबर पाण्यात सोडलेल्या होड्या,
आणि ऐन वयात आल्यावर पावसात भिजून काढलेल्या खोड्या,
सगळ काही नजरेसमोर अचानक नाचू लागत,
अगदी कालच घडल्यासारख ते वाटू लागत.

पावसात भिजल्या नंतर मनाचा कोपर्‍यात दाडपूण टाकलेल्या गोष्टीही आठवू लागतात,
आणि त्याही मग नकळत चेहरयवर एक हसू आणतात,
ती पावसात भिजलेली आठवनही आपल्याला हविहवीशी वाटते,
लोकात नकार देउन सुद्धा आपल्या मनात तीच आठवं दाटते.

नेहमी चिक-चिक करणारा पाऊस ही आपल्याला सुखाऊ लागतो,
अशी भेट रोजच होईल का? आपण मनालच विचारू लागतो,
असे तर अनेक पावसाले येतात आयुष्यात,
पण काही पावसाले मनात घर करून राहतात.

भरपूर वेगळ घडत आयुष्यात,
पण या आठवणी नेहमी सारख्याच वागतात,
म्हणूनच सांगते मित्रांनो,
एखादा असा पावसाळा पुढचे अनेक पावसाळे काढायला पुरेसा असतो,
कारण तो पावसाळा मनाच्या कप्प्यात जपलेला असतो,
अगदी आयुष्यभारासाठी

क्रोधाग्नी..एक चटका

टिप : एका सत्यघटनेवर आधारीत......
-------------------------------------

उत्तरप्रहर, मी गाढ झोपेत,
अपरात्री फ़ोनची घंटा खणखणली
बाहेरगावच्या मैत्रीणीचा नंबर
पाहून मनात शंकेची पाल चुकचकली
"अत्यंत तातडीची मदत हवीय,
ताबडतोब निघ" तिनं आज्ञा सोडली

"सुमी, परवा रात्री न सांगताच
कूणाचा तरी हात धरून पळून गेली
विधात्याचा लेख बघ, दुर्दैवाने
तिथेही तिची पाठ नाही रे सोडली
अपघातात त्याच्यासकट बाकीची
जागीच ठार,ती गंभीर जखमी झाली
तीने घडलेली सारी हकीकत
एका श्वासात न थांबता सांगून टाकली

"माझ्या कडून काय मदत हवी आहे"
अनपेक्षीत धक्का पचवित मी विचारणा केली
तिला मदत करावी, सार्‍यांची मी किती
गयावया केली, कुणीच भीक नाही घातली
वाटलं तू काहीतरी करशील म्हणून
अपरात्री तुला साद, ती पार रडवेली झाली

प्रत्येकाच्या डोळ्यात अंगार,आप्त
नातेवाईक मंडळी कोंडाळी करुन बसलेली
घाव अगदी ताजा, नुकता काल-परवाचा
झाडून सारी जणूकाही सुडाग्नीने पेटलेली
"जखमी प्राण्याला पण आपण मदत
करतो, हे तुमचं रक्त" मी समजुत काढली

"मदत करण्याचा विषय सोडून बोल"
बापाने करारीपणे आपली भूमिका स्पष्ट केली
"परवा तिचं श्राद्ध होतं, ती आम्हाला मेली
ज्या दिवशी तिने घराची लक्ष्मणरेषा ओलांडली
पोरीने केलेला विश्वासघात आठवून, बापाने
बहूदा मनातल्या मनात जोरदार शीवी हासडली

पाहून सार्‍यांचा एकंदर रागरंग, खवळलेल्या
समुद्रात नौका घालण्याची कल्पना, मी टाळली
"या घडीला गरज तिची, नंतर करायचं
काय तिचं, निवड तुमची" मी विनवणी केली
आणि म्हणालो,"तिला वाचवू शकला असता
तुम्हाला उपरती नाही झाली म्हणजे मिळवली

कुठलंस फ़ुटकळ इस्पितळ, तोच तो
चिरपरिचित विचित्र औषधी गंध, अंधारी खोली
शरीरावर असंख्य जखमा, जुन्यापुराण्या
खाटेवर मुटकुळं करुन ती निपचित पडलेली
माझी हलकेच थाप, तीची गाढ निद्रा भंग
पावली, मला पाहून तिला थोडी हुशारी आली

"माझ्याकरीता फ़ुलं नाही आणलीस?"
ती करुण चेहेर्‍यावर मिश्किली आणत म्हणाली
"अग वेळच नाही मिळाला गडबडीत,
लगेच आणू का?" मी उगाच सारवासारव केली
"चल सोड रे, तुला माझ्या पार्थिवावर
वहायला उपयोगी पडतील" ती कसंनुसं हसली

तुलाच शोधतोय!

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना......
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना... कण-कण मरतांना.......

तुझांच????

गजर नामाचा

श्रीधर तिच्या ह्यांचे नाव
नामाने होते सकाळ
उठता बसता घेते नाम
सदान कदाहाती माळ
गजर सदा नामाचा
श्रीधर उठ्तोस ना
श्रीधर अरे उठलास का
श्रीधर किती वाजले बघ जरा
श्रीधर उशिर होईल ऑफिसला
श्रीधर चहा ठेवलाय
श्रीधर
श्रीधर पुन्हा उठवणार नाही हं
श्रीधर काय करु ब्रेकफ्हस्ट्ला
कॉन्फ्लेक्स चालेल की
ऑमलेट हव लवकर सांग हां
देवा चटका बसला मला
श्रीधर जरा ब्र्नॉल शोध ना जरा
श्रीधर एकतोयस का
श्रीधर
अरे श्रीधर
पाणी सोडलय अंघोळीला जा
मग माझ्या करता हि बादली लाव
श्रीधर चीनुला उठवतोस का
श्रीधर कुठे जाणार आहेस आज
डबा भरुना
श्रीधर चिनुचा होमव्र्क कुठे गेला
इथेच होता काल
चल बेटा उशिर होईल आपल्याला
बेटा बाप्प्ला नमस्कार कर
आणि पापा दे बाबाला
बाबाला लवकर ये सांग
श्रीधर निघतो रे आता
फोन करेन जमेल तेव्हा
ओट्यावर डबा ठेवलाय
श्रीधर
अरे सुट्टे अस्तिल तर देना
देवळात जाईन जाताना

अनामिक भट्कंती

रात्रिच्या निरव शांततेत
एखादा तरंग उठावा
आणि उलथा-पालथ होऊन
सगळ शांत निश्चल व्हाव तसच काहितरी हे

तिच आणि त्याच भांडण झालेल
चांगलच जोरदार
तिच माहेर आणि सासर
दोघांचाही उध्दार होण्याइतपत

आणि आता सर्वत्र
अबोल्याच राज्य...

सकाळ व्हावी
तिही भांडी आपटण्याच्या आवाजाने
त्यानेही द्यावे उत्तर
मग आपटण्याऱ्या दरवाज्याने...

नाश्ता व्हावा
पण अळणी लागावा
आणि चहा मात्र कपातच रहावा

दुपार तर झालीये
पण आज तो इकडे एकटाच
आणि तिही तिकडे

मागुन थोडीशी कुजबुज
आणि मन चाहुल घेण्यात दंग...

समोरच्या होटेलातली
नेहमीची जागा आज कोणीतरी
दुसऱ्याच जोडीने बळकावलेली

आणि मनात आठवणींनी
उडवलेली गर्दी
तिकडे तो
आणि इकडे ती....

कस बस काम उरकुन
दोघही घरी निघालेले
आताशा राग जरा गेलेला...

त्याने मग नाईट शो
बुक केलेला..
तिनेही पूल साईड टेबल
रीझर्व्हड केलेला..

कालच भांडण आताशा
हरवलेल...पण
त्याने येउन मनवाव
म्हणुन तिच मन रुसलेल...नाटकीच

त्याने येउन सांगावा बेत
अन तिने तिचा...

जुनच भांडण पुन्हा नव्याने सुरु व्हाव...
भांडता भांडता त्याने म्हणाव
रागवलीस ना की खुपच सुंदर दिसतेस

तिनेही मग लाजुन त्याच्या मिठीत शिराव
अन मग रात्रभर त्यांनी
चांदण्याच्याच संगतीत घालवावी...रुपेरी चांदणे मिठीत भरत ....

'काटा' अन 'मी'

फुलांच्या बागेत आज काटा बोलला,
नेहमीच्या भाषेत मी त्याला हाकलला,

आज एक फुल नाही मिळाले वाट्याला,
मग म्हंटले आता विचारुच या काट्याला

तो मलुल होता पण तरीही सांगु लागला,
"मित्रा, मी रक्षक होतो त्या फुलासाठी,
पण आज डोळ्यासमोर हारलो रे!"
मी म्हंटले, "नवीन काय रे यामध्ये??
रोज तर सगळेच असेच फुल खुडतात"..
तो म्हणाला, "अरे त्या त्या फुलात,
माझा जीव गुंतलाय ना!"
मी म्हंटले, "अरे वेड्या हा तर निव्वळ मुर्खपणा!!"

तो भडकला अन म्हणाला,
"अरे आईबापही रक्षक असतात ना,
त्यांना ही तर काटाच ठरवितात ना कधीतरी!!
मग त्यांनी त्यांनी आपल्या फुलास जीव नाही का लावायचा??

ते जाउदे असं बघ,

तुही तर असशील ना कुणासाठी 'काटा',
(कारण तुही रक्षक आहेस कुणाचा!!)

कोणीतरी तुझ्यासाठी ही असेल 'काटा'
(तुलाही कोणीतरी हवे आहेच ना!!)

तुही 'फुल' असशील ना कुणासाठी,
(तुझ्यावर जीव लावणारे आठव!!)

कोणीतरी 'फुल' असेल ना तुझ्यासाठी,
(तुझा जीव कुणासाठी तरी तुटतो ना!!)

आणि हो,

कधीतरी एक 'काटा' दुसर्‍या 'काट्याला'
भारी पडतोच रे!!"

एवढं ऐकुन जड पावलाने बागेतुन
बाहेर पडत होतो अन तेवढ्यात पायात एक
काटा रुतला...

अन या वेळी मात्र मी 'काटा' अलगद उचलला अन
हृदयापाशी बाळगला..

अन मग दोन काटे, दोन फुलं,
उरल्या फुलांकडे, उरल्या काट्यांकडे
परतु लागले.......

आधुनिक....."चांदोमामा चांदोमामा भागलास का?...... "

चांदोमामाचे नवे गाणे एका माझ्या गीता नावाच्या मत्रिनिने संगितले.....कोणी
बनवले माहीत नाही.....
पण मला जाम आवडले म्हणून पोस्ट करत आहे....ज्याने बनवले त्याची मान्यता
मिळाली असे समजून.......

चांदोमामा चांदोमामा भागलास का?
बिल्डिंगच्या मागे जाऊन लपलास का?

बिल्डींग ही आहे सात माजली....
मामाचा वाडा पाडून बांधली.....

बिल्डींगमधे मामाच्या येऊन जा...
पाव भाजी खाऊन जा...

पाव भाजीत पडली माशी...
चांदोमामा राहिला उपाशी.....

मी "थांब" म्हणालो त्याला

मी "थांब" म्हणालो त्याला
आवाज माझा ऐकताच
तो जागच्या जागीच थांबला

क्षणभर माझं भानंच हरपलं
पाहुन त्याच्या चालण्याला
सुख-दुख:, नाती गोती सगळ्यांच्या
ओझ्याने तो पार थकलेला
तेव्हा पाहुन त्याच्या थकव्याला
आवाज मी त्याला दिलेला...........

पण..... नंतर
विचार मनात आला
थांबुनतरी मिटेल का सगळा थकवा त्याचा ?
चालत राहणं हा धर्म आहे "जीवनाचा"
म्हणुन मग थांबवण्यापेक्षा
चालण्यास थोडा उत्साह देऊया त्याला

पण....... हे आधी उमगलंच नव्हत मला
म्हणून
मी "थांब" म्हणालेलो त्याला
आवाज माझा ऐकुन
तो जागीच थांबलेला.....................

एक ’ भेट ’ काय टळली..

- स्वप्ना

पहायचे होते मला..
तुझ्या डोळ्यांत , माझे प्रतिबिंब..
पहायचे राहून गेले..

ऐकायचे होते मला..
तुझ्या आवाजात , माझे नाव..
ऐकायचे राहून गेले..

अनुभवायचे होते मला..
तुझ्या श्वासांत , माझे श्वास..
अनुभवायचे राहून गेले..

तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे....राहून गेले....

भेटीचे तर होते................फक्त बहाणे ,
मजसाठी तर झाले असते ते , ' जगणे '..

तुझ्या डोळ्यांच्या तेजात ,
उजळले असते लक्ष दीप , माझ्या नेत्रांत
जे तेवत राहिले असते , उदास अंधा-या रस्त्यांत..

तुझ्या श्वासांच्या सुगंधात ,
फुलले असते संजीवन प्राण , माझ्या श्वासांत
जे भरत राहिले असते जीवन , श्वास रोखणा-या क्षणांत..

तुझ्या आवाजाच्या मारव्यात ,
गुंजले असते मधुर गीत , माझ्या आत्म्यात
जे देत राहिले असते साद , भग्न एकाकी आयुष्यात..

पण, पण....

एक ' भेट ' काय टळली..
अन ' जगायचे ' राहून गेले..

' तुझ्याबरोबर ' जगायचे राहून गेले..

Tuesday, July 17, 2007

मी जिंकलो आणि ती हरली...

-सचिन काकडे [जुलै १६,२००७]
मी जिंकुनही हरलो ती हरुनही जिंकली
तीची प्रत्येक अदा माझ्या वेड्या मना भावली
मला खुप गर्व होता माझ्या प्रेमावर
आता फ़क्त हसुन पाहतोय त्या गर्वाच्या राखेवर

प्रेम करणं कुठे जमलं मला
सांगुच नाही शकलो कधी मनातलं तिला
पण न बोलताच ती बरंच काही बोलुन गेली
"कधी कुणावर प्रेमं नको करुस" हे मात्र सांगुन गेली

जाताना तीने माझ्याकडे तीची आठवण मात्र गहाण ठेवली
जगण्याची तेव्हा ईच्छाच नव्ह्ती उरली
तिच्या त्या आठवणींना शब्दांनी आसु, एकटेपणाने साथ दिली

पण त्याचवेळी ही कविता मला भेटली
"एक गेली तर दुसरी येतेच"
ही म्हण आज जणु पुन्हा सार्थ ठरली
तिच ती शब्दसुदंरी मला खूप आवडली
मैत्रीचा हात पुढे करता तिने लगेच मैत्री स्वीकारली

ति गेल्यावर मी अंधारातच भटकत होतो पण
हिने माझ्या आयुष्याची विझली वाट पुन्हा पेटवली

ती मला दुख:त खोलवर बुडवुन गेली
पण आज हीने मात्र
मला त्या डोहातही आनंदाने पोहण्याची कला शिकवीली
या कवितेने मला जगण्याची ही नवी भाषा शिकवीली

आज असं वाटलं की
मीच खरंच जिंकलोय आणि ती हरली
कारण दु:खाबरोबर चालताना
सुखाची वाट मी या कवितेसोबत शोधली.........

धागा द्या धागा द्या

-सनिल पांगे
धागा द्या धागा द्या (धागा = THREAD, -- इति ओर्कुत)
आम्हालाही थोडा धागा द्या
आमच्या शब्दांनाही इथे
व्यासपीटावर जागा द्या

धागा द्या धागा द्या
प्रेत्येकाचं मन म्हणतं
तुमचं नाणं सोन्याचं असलं
तरी आमचं पितळेचंही खणंखणंतं

येऊ द्या येऊ द्या
आम्हालाही पुढे येऊ द्या
चढाओढीच्या खेळा मध्ये
आम्हालाही भाग घेऊ द्या (चढा-ओढ - माझाही वाटा मोठा आहे)

जिंकू द्या, जिंकू द्या
आम्हालाही मन जिंकू द्या
आमच्या शब्दांनाही थोडाबहूत
कवितेत प्राण फुंकू द्या

ऋणानूबंध, ऋणानूबंध
आम्हालाही ऋणी होऊ द्या
तुमचे आभार मनापासून माणून
आम्हालाही कोणि होऊ द्या

मिरवू द्य, मिरवू द्या
आमच्याही कवितेंना मिरवू द्या
आमच्या बावळट मुलांच्या डोईवर
कोणालातरी हात फिरवू द्या

निस्व:र्थ व्हा, निस्व:र्थ व्हा
आमचही घर वसू ध्या
मागच्या बाकावर पडलो आम्ही
कधीतरी पुढे बसू द्या

दान द्या, भिक्षा द्या
प्रतिसाद आम्हाला हकखास द्या
आमच्याही गुदमरत जाणाऱ्या कवितेना
जगवण्यासाठी एक श्वास द्या

घोळ झालाय च्यायला डोक्यात

घोळ झालाय च्यायला डोक्यात खूप घोळ झालाय

ऑफिस मध्ये काय करतो मला माहित नसते
घरामधे बायको काय बोलते मला माहित नसते
कुठल्या दिवशी कुणाचा वाढ़ दिवस असतो वगैरे सोडाच
च्यायला कुठल्या दिवशी माझा वाढ़ दिवस असतो ते पण मला माहित नसते

घोळ झालाय माझ्या डोक्यात खूप .... जाऊ दे

मित्रान्ना फ़ोन करायला मी विसरातो
ऑफिस मध्ये मीटिंग ला जायचे मी विसरतो
मीटिंग रूम्स ची नावे पण भारी "नर्मदा ",सिंधु असते कुठली तर कुठली असते
गोदावरी
कुठली फर्स्ट floor वर अणि कुठली सेकन्ड वर हे पण मी विसरतो

घोळ झालाय माझ्या डोक्यात खूप घोळ झालाय

सॉफ्ट वेअर मध्ये काम करून साली माझी एफ्फिशियंसी पण गेलिये
काहीही वेळेवर आणि चांगलं करायची इच्छा पण मेलिये
फक्त पैसा कमावयाचे मात्र छान जमले आहे
बाकी नितिमत्ता सगळी तेल लावत गेलिये
माझ्या कामाचा जगाला किती उपयोग होतो ते नाही माहित
पण बिल्डर्स अणि दुकान्दारांची मात्र चांदी झालिये
हे सगळं पाहून ....
घोळ झालाय माझ्या डोक्यात .... साला फार घोळ झालाय

एक ना दोन ....हज़ार विचार येतात
flat,गाडी ,नोकरी , लग्न बायको,नातेवाईक , मराठी बाणा,गाणे म्हणा ,पुण्याच्या
ट्रिपा , ट्रेन तिकिट्स ,US ला जायचय ,अजुन छापायचय, वजन वाढलय ते सम्भाळायचय
....
एक ना दोन हज़ार विचार येतात
दिवसाचे २४ तास त्यामुळे कमी पडतात .... काय काय करु ?
घोळ झालाय खरच घोळ झालाय

कधी कधी वाटत मेडिटेशन करावं
डोक्याला थोड़ शांत करुन त्याला ताळ्यावर आणावं
निसर्गाने इतकं डोकं दिलय ते कसं शांत असावं
प्रत्येक गोष्टिचं गणित डोक्यात फीट बसावं
पण मेडिटेशन चा हा विचार लक्षात च रहात नाही
कारण ....
डोक्यात घोळ झालाय ... इतका घोळ झालाय कि अजुन आठवत नाही काय काय घोळ झालाय
घोळ झालाय , डोक्यात , लाइफ मध्ये , इकडे तिकडे सगळीकडे नुस्ता घोळ झालाय

Friday, July 13, 2007

पावसाची रात्र नशीली

पावसाची रात्र नशीली ...
आणि हवास तू जवळी
धुंद व्हावे तन मन आपुले ...
रिमझिम सरींच्या तालावरी

बेहोश व्हावे भिजूनी चिंब ...
भान नसावे दोघांनाही
अलगद ओठांनी टिपावेस तू ,
थेंब माझ्या गालावरी

मिळता नजरेस नजर...
ओठ थोडे थरथरावे ,
हात घेऊनी हातामध्ये,
सारे जग विसरावे ...

रेशमी स्पर्शाने तुझ्या ...
अंगअंग मोहरूनी यावे,
होऊनी रोमांचित दोघांनी,
बाहूपाशात हरवावे ...

तुझ्या ऊबदार मिठीतली ...
रात्र कधीच उलटू नये ,
विरहाचं ऊन पसरवणारी ...
अशी सकाळ कधी येऊच नये !!!!!!!

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते

या आठवणिला तरी काही कळते
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप्रमाणे गळते
तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते

तुला विसरायच॑ आहे

झाड म्हणाल॑ मला सावलीत बसायच॑ आहे
आकाश म्हणाल॑ मला गवसणी घालायची आहे
धरणी म्हणाली मला आराम करायचा आहे
सूर्य म्हणाला मला ऊन्हात बसायच॑ आहे
च॑द्र म्हणाला मला आमावस्या पहायची आहे
समुद्र म्हणाला मला तळ्यात मासे पकडायचे आहेत
तारा म्हणाला मला उल्का पडताऩा पहायची आहे
आणि तु म्हणालास.....
मला तुला विसरायच॑ आहे

त्या दिवसांनी

त्या दिवसांनी शिकवलयं
तुझ्याशिवाय नाही जगू शकत
त्या दिवसांनी शिकवलयं
तुझ्याशिवाय नाही मरू शकत
त्या दिवसांनी जाणलयं
तुझा आधार काय आहे
त्या दिवसांनी पाहिलयं
तुझ्यासाठी वेड कोण आहे
त्या दिवसांनी अनुभवलयं
वाट पाहणं काय असतं
त्या दिवसांनी दाखवलयं
कुठल्या जगात वावरायचं असतं
त्या दिवसांनी ओळखलयं
तुझ्यावर किती प्रेम आहे
त्या दिवसांनी सांगितलयं
आम्ही सरू तुमचा विरह संपवण्यासाठी

ते बघ सुख येतयं

देवानं आपल्याला का पाठवलं?
थोडसं सुख वाटावं असचं त्याला वाटलं
दुःख तर येणारचं ते आपण गोळा केलं
तुझ्यावर मैत्री रुसली
माझं तर प्रेमच हरवलं
पण सुख वाटायचं मी का थांबवलं?
तु सुख वाटलस पण दुःख घ्यायचं राहीलं
तु त्या दडलेल्या अश्रुंना वाटेतच का नाही सोडलं?
अरे आनंदाला तु सगळीकडे पाहिलं
पण त्याला आपण भेटायचं राहीलं
त्या अश्रुंना लपवू नकोस
त्यांना वाहू दे
ते बघ सुख येतयं
त्याला विसावू दे.......

तुलाही हीच स्थिती असेल का जाणवत?
हे जग विसरले मी तुला पाहत
मी झाले तुझी हळूच नजर वळवत
तुही तरंग उठवलेस नजरेला नजर मिळवत
अन् माझ्या विश्वात आलास तू नकळत
भान हरपले माझे तुला ह्रदयी साठवत
अचानक शब्द ओठांवर घाबरत
त्या शब्दांनी सांगितली एका भिंतीची तफावत
तरीही नजरेने ठेवल्या भावना तुझ्याशी जुळवत
कधी कधी पेटून उठलेल्या शंका मला अडवत
पण तुझ्या हास्याने ठेवले ते वारे वाहत
नेहमी शब्दांपेक्शा नजरा कायम बोलत
तू नसल्यावर तुझ्या आठवणी भिजवत
तुला पाहण्यासाठी हा जीव राही तळमळत
असंख्य विचार माझ्या मनात धावत
तुलाही हीच स्थिती असेल का जाणवत?
असे अनेक प्रश्न मला सतावत
अजुनि जगत आहे त्या प्रश्नांची उत्तरे शोधत?

धीर कर जरा
सांगू की नको करत दिवस जात आहेत
बोलून ज्या गोष्टी समजत नाहीत
नजरेतून त्या समजत आहेत
एवढा संयम का ते कधी कळणार?
मनातलं मनात राहतयं
ते ओठावर कधी येणार?
नजरेचा अर्थ कळलेला दिसतोय बरा!
मनात काय आहे
ते सांगायचा धीर कर जरा?

आठवण

आठवण असते फ़ुलासारखी
मनाच्या फ़ादींवर सजवायची
नाही फ़ुलदाणीत खोवायची
आठवण असते ढगासारखी
मनाच्या आकाशात झुलवायची
नाही वीज काढायची
आठवण असते वेलीसारखी
मनाच्या आधाराला लावायची
नाही आधाराला द्यायची
आठवण असते उन्हासारखी
मनःसूर्याकडून घ्यायची
नाही चद्रांला द्यायची
आठवण असते अश्रुसारखी
गालांवर ओघलायची
नाही डोळ्यात दडवायची

प्रत्येक क्शणात काहीतरी दडलय॑

प्रत्येक क्शणात काहीतरी दडलय॑
पावसातल॑ ऊन आणि ऊन्हातला पाऊस
आणि प्रत्येक ढगात हरवलेला किरण
क्शण जॊ प्रतिक्शणा॑मध्ये विभागला आहे

जणू पावसाचा थे॑ब
ऊन्हाचा किरण
आणि ढगातली वीज
प्रत्येक क्शणात काहीतरी दडलय॑

अश्रु॑चा खारटपणा
हास्याची मिठास
आणि डोळ्यातली चमक
क्शणात बदलणा-या या भावना

सुखासठी धडपडण॑
दुःखाशी झगडण॑
आठवणीतल्या सुन्दर आणि अस॑ख्य क्शणा॑बरॊबर जगण॑

जगलेल्या अस॑ख्य क्शणा॑चा हिशेब मागणारा मृत्यू
येणा-या क्शणा॑ची चाहूल दॆणारा जन्म
आणि या जगण्यामरण्यात हि॑दकळणारा जीव

एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे............
एक प्रेयसी पाहिजे............

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन् मलाही तिच्यासोबत भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरणमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधलत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बहुपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसनरी;
पण मानाने मात्र, अप्रतिम सुंदर दिसणारी,

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नात्याला हळुवारपणे जपणारी,

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जनणारी;
मे जसा आहे तसेच माझ्यावर प्रेम करणारी,

एक प्रेयसी पाहिजे, प्रेमाला प्रेम समझणारी;
सुखा- दु:खात माझ्या तन्मयतेने साथ देणारी,

एक प्रेयसी पाहिजे,........ मिळेल का अशी???????

म्हणून या आठवणींचे अस्तित्वच नाकारीन म्हणतो.......

कधिकाळी जुळलेल्या स्वप्नातल्या गाठीभेठी
आज आठवणी होऊन सामोर्‍या आल्या
थोडेसे पाणी या कोरडया डोळयात
पण बराचसा आधार मनात देऊन गेल्या

आज त्यांना मी काहीच नं बोलता जाऊ दिले
मनातं नसतानाही ओघळणारे अश्रू पाहू दिले
आता मात्र चित्र माझ्या जीवनाचे आज पुन्हा एकदा सजवतो
आणि साज म्हणून या आठवणींनाच रंगं बनवीन म्हणतो

आठवतात ते दिवस अगदी कालच घड्ल्यासारखे
दोघचं घडवत होतो शिल्प स्वप्नांचे जणू जिवंत असल्यासारखे
स्वप्नांच्या छायेत आज पुन्हा एकदा विसावतो
आणि शीतल म्हणून या आठवणींनाच सावली बनवीन म्हणतो

देहभांन विसरायचे ते दिवस होते पावसाचे
हातात हात गुंफून फुलताना एकरुप होवून झुलायचे
ओल्याचिंब गारा आज पुन्हा एकदां वेचतो
आणि ओल्या म्हणून या आठवणींनाच सरी बनवीन म्हणतो

त्या दिवसांनी दिली कष्टाला स्फूर्ती, यशाला आनंदाची आसवे
चार गूंज मायेचे उन्हात चांदणे शिंपडल्यासवे
अनुभवण्या स्पर्शही आज पुन्हा एकदां धजतो
आणि ऊब म्हणून या आठवणींनाच कुस बनवीन म्हणतो

नसले उद्या सोबत्त कोणी तरी नसतील आठवणी सर्वस्व
वेदनेतले सुख शोधत असेल विवेकाचे वर्चस्व
आयुष्याचे आव्हान आज पुन्हा एकदां स्वीकारतो
आणि ध्येयं म्हणून या आठवणींचे अस्तित्वच नाकारीन म्हणतो...........
आणि ध्येयं म्हणून या आठवणींचे अस्तित्वच नाकारीन म्हणतो............

प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...

ती म्हणाली होती प्रेम आहे माझे तुझ्यावर
नाही उमजला अर्थ तेव्हा तिच्या बोलण्याचा

माझ्याजवळं ती नाही, आता प्रत्येक आठवण सांधतो आहे
न कळलेल्या प्रेमाचा अर्थ बांधतो आहे

कदाचीत प्रेम म्हणजे आपुलकीच्या बोलांसाठी आतुर्लेले कान
पावसात शब्दांच्या चिंबं विसरतातं देह्भान

कदाचीत प्रेम म्हणजे भेटीच्या ओढीत झुरणारी ती
का फक्त एका कटाक्ष्यासाठी त्याने ओवळून टाकलेला जीव

कदाचीत प्रेम म्हणजे पाणीदार बोलके डोळे
शब्द नको तिला उसने, ती डोळ्यातूनच बोले

कदाचीत प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला तीचा विचार पहिला
आजही त्याने अर्धा घास तिच्यासाठी ठेवला

कदाचीत प्रेम म्हणजे पापण्यांमधे जपलेला सागर
ठेचं लागतच त्याला, तीला फुटलेला अश्रुंचा पाझर

कदाचीत प्रेम म्हणजे आठवणींचे धूके दाटलेले
ती निघून गेल्यावर अश्रूंच्या दवबिंदूसंगे मला वेढ

आता मात्र शब्धही लागतात अपुरे पडू
भावनांची गर्दी कशी कागदावर उतरवू ?

पण आता कळतयं....
प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे
आपले विसरून दुसर्‍याच्या विश्वात रमंणे

प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...
प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...

या सुंदर जीवनात कधी कधी..

या सुंदर जीवनात कधी कधी..
पडायच असत प्रेमात कधी कधी
बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..
पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत
विचारात गुंतल्यासारख कधी कधी
अन पाहताना तिच्याकडेच
विचारात गुंतायच असत कधी कधी..
रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच...
जागुन अशी रात्र काढावी कधी कधी
नंतर "जागली होतिस का रात्री?"
म्हणून विचारावे कधी कधी..
मागायचा असतो देवाकडे..
हात तिचा चोरुन कधी कधी
द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..
चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या
विषय तिचा निघाल्यावर कधी कधी
असते रागवायचे लटकेच
"अस काही नाहिये" म्हणून कधी कधी
विरहात तीच्या ...
असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..
पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..
असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..
पडायच असत प्रेमात कधी कधी
बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी

तुला नाही जमत

खूप प्रयत्न करतेस तू पण तुला नाही जमत
चेहर्या वरील उधार हस्याने मनातील दुख नाही लपत
आशेच तू हसत हसत खूप खूप ब ड बडटेस
लक्ष नाही माझे पाहून हळूच आश्रू पुसतेस
खूप प्रयत्न करतेस तू पण तुला नाही जमत
हृदयाच्या खोल जखमा नाही भरत
आशेच तू मित्र मित्र म्हणत नेहमीच विषय बदलतेस
काही तरीच तुझे म्हणत वेडा मला ठरवतेस
खूप प्रयत्न करतेस तू पण तुला नाही जमत

"संधी" म्हणजे सकाळची "मुंबई लोकल"

-सचिन काकडे [जुलै १३,२००७]
संधी म्हणजे सकाळची "मुंबई लोकल"
हीला नेहमी सुटण्याआधीच पकडायचंय
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
तीला वेळेवर पकडायचंय
का तीच्यामागे धावत तिला पकडायचय


ध्येयाकडे जायला दिल्या नियतीने दोन लोकल
एक 'फ़ास्ट' लोकल तर दुसरी 'स्लो' लोकल
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
'फ़ास्ट' लोकलने निराशेचे स्टेशन चुकवायचय
की स्लोने प्रत्येक स्टेशन वर थांबायचय


एक गेली तर दुसरी ही नक्कीच येणार पण
ती येईपर्यंत वाट ही पाहावी लागणार
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
हवं तिथे वेळेवर पोहोचायचय
की उशीरा पोहोचायचय


ही लोकल वेळेवर पकडलीत तर
आरामात खिडकीपाशी हवेशीर जागा मिळणार
हीला पकडायला उशीर केला तर
दरवाजावरच लटकावे लागणार
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
खिडकीपाशी आरामात हवा खात बसायचय की
बळजबरीने दरवाज्यावर लटकायचाय


या लोकलने प्रवास करताना
तुम्हाला कोणाच जागा नाही देणार
गर्दीतुन जागा स्वत:ची तुम्हालाच करावी लागणार
एखाद्या पुढच्या माणसाला डावलुनच पुढे जाव लागणार
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
एखाद्याच्या आधाराने त्याच्या पायावर उभं राहायचय
की थोडी मेहनत करुन स्वत:च्या पायावर उभं रहायचय


मग आता

तुम्हीच ठरवा तुम्हाला जीवनाचे ध्येय कसं गाठायचंय
हवं त्या ठीकाणी कुठल्या लोकलने पोहोचायचं........................

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची

- रेखा
गजावर झुकलेल्या रातराणीसारखी
नजर तुझी झुकायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!
निंबोणीच्या झाडामागचा
चंद्रही गालात हसायचा
आभाळातल्या ढगालाही गुपित तुझ सांगायचा
त्याच्यावर उगी रागवायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!

कळी कळी वेचतांना तू
फुलाच्या कानात बोलायची
मी कितीही विचारल तरी आम्ही नाही जा म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची ....!!

तुझ मात्र बर आहे,येण जाण ही सुरु आहे
मागे वळून पाहतांना काळीज तोडून नेण आहे
भुवई ऊडवत जायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!

असे हे किती दिवस चालायच,मुकेपणातच बोलायच
सारे संकेत कळून सुध्दा न कळल्यागत करायच
अन डोळे मोठे करुन पाहायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!

आता मात्र सोसत नाही,
दिवस काय पण रात्र ही तुझ्याशिवाय जात नाही
असं का व्हावं म्हणून विचारल तरी का ?लाच कारण नसत म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नको

तु परत येऊ नकोस

तु परत येऊ नकोस,
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खुप दिवस लागलेत,
मनावरील जखमा भरायला.....

दुःख अंतरी दाबुन,
एकांतामध्ये रडत असतो,
म्हणुनच का कोणास ठावुक,
सर्वांसोबत हसत असतो.....

तु आयुष्यात परत येऊ नकोस,
तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय,
त्या सर्व आठवणी विसरायला.....

पण...
काहीही असले तरी........

तुला शोधायला तरी,
नजर माझी फिरत असते,
आकाशीचा चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटुन येते......

तुला विसरण्याचा,
आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,
पण ही कवीता लिहीता लिहीता,
पुन्हा तुलाच गं मी आठवतोय...

एकदा तरी

-राज पालकर
एकदा तरी मला तुला,
एकदा तरी मला तुला,
मनापासुन हसवायचंय,
दोन क्षण का असेनात्या निखळ हास्यात,
स्वतःला हरवायचंय...

फक्त एकदाच मला तुझ्या डोळ्यांत,
नजरेला नजर मिळवत बघायचंय,
डोळ्यांमागचं वादळ मला,
अनाहुतपणे अनुभवायचंय...

फक्त एकदातरी मला,
तुला प्रेमाने जवळ घ्यायचंय,
नाहीस जगात ह्या तु एकटी,
हेच तुला समजवायचंय...

फक्त एकदा तरी तुला,
माझ्यासाठी बेचैन होताना पाहायचंय,
त्यासाठी मला तुझ्याशी,
एकदा खोटं खोटंच भांडायचय...

मग मला तुझ्यासाठी,
एकदाच विदुषक व्हायचंय,
तुझा तो लटका राग मला,
चुटकीसरशी पळवायचंय...

तुझा हात मात्र मला,
आयुष्यभरासाठीच पकडायचाय,
प्रेम करतो किती तुझ्यावर,
हेच तुला सांगायचय...

कोसळणारा पाऊस

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी

यांचं असं का होतं ते कळत नाही

यांचं असं का होतं ते कळत नाही , किंवा यांना कळतं पण वळत नाही
निळं निळं वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार,
रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार!
त्याचं कौतुक नसतंच मुळी कधी यांच्यासाठी
यांच्यासाठी एकच असते कपाळाला आठी!
कधी सुद्धा यांची पापणी ढळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही ॥१॥

मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होते!
वेलची खाल्ली तरी व्हिस्कीचा वास येतो!!
यांचा धोशा सुरू असतो -अमकं खाऊ नका त्याने डोकं जडसं होतं
तमकं पिऊ नका त्याने पडसं होतं
कधीसुद्द्धा यांची पापणी ढळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही ॥२॥


सगळे कसे बागेत व्यायाम करत बसणार?
किंवा हातात गीता घेऊन चिंतन करत बसणार?
बागेतल्या कोपऱ्यात कुणी घट्ट बिलगून बसतच ना!
गालाला गाल लावून गुलगुल करत असतंच ना!
असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच,
यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच!
नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं,
पण यांना मुलं होतात हेच एक कोडं असतं!!
या कूट कोड्याचं उत्तर कधीच सुटत नाही, यांचं असं का होतं कळत नाही॥३॥

कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात,
एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात.
एरंडेल प्यायल्यावर आणखी वेगळं काय होणार?
एकच जागा ठरलेली, आणखी कुठे जाणार?!
कारण आणि परिणाम यांचं नातं ढळत नाही,
यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळत पण वळत नाही ॥४॥

एकदा

एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत
सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत
हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची
तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात
काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे
आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त खास आहे

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

शब्द

शब्द हसणारे,शब्द हसविणारे
शब्द रडणारे,शब्द रडविणारे

कधी मधाळ,तर कधी रसाळ
वेगवेगळ्या तर्हेचे,वेगवेगळ्या स्वभावाचे
कधी सागराप्रमाणे उसळ्णारे
तर् कधी झरयाप्रमणे खळखळणारे

शब्द,कधी भांडतत,कधी कुजबुजतात
कधी रुसतात,कधी उमलतात
आणि कधीतरी फक्त डोळ्यातूनच कळतात

भावनेच्या पोटी जन्म घेउन
तिचे अस्तीत्व दाखवतात
आणि कधी कधी मात्र शब्दच
निशब्द होतात........

अचानक कधीतरी....

सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचं
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाऊन निघायचं,
काळजी, द्वेष, सारं फेकुन द्यायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

आपलं अस्तित्व या दुनियेत पहायचं,
आपलं महत्वं कुठे आहे का, हे सतत शोधायचं,
आपल्या प्रियजनांना नेहमीच जपायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

आपलं सारं कही, क्षणात दुसर्‍याला द्यायचं
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचं,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.


पण? पण अजून मला बरंच काही पहायचंय
या दुनियेकडुन, खूप काही शिकायचयं,
इथे, मलाही काहीतरी बनायचयं
म्हणून मला अजून, भरपूर जगायचं ....भरपूर जगायचं .....भरपूर जगायचं .....
सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचं
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाऊन निघायचं,
काळजी, द्वेष, सारं फेकुन द्यायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

आपलं अस्तित्व या दुनियेत पहायचं,
आपलं महत्वं कुठे आहे का, हे सतत शोधायचं,
आपल्या प्रियजनांना नेहमीच जपायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

आपलं सारं कही, क्षणात दुसर्‍याला द्यायचं
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचं,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.


पण? पण अजून मला बरंच काही पहायचंय
या दुनियेकडुन, खूप काही शिकायचयं,
इथे, मलाही काहीतरी बनायचयं
म्हणून मला अजून, भरपूर जगायचं ....भरपूर जगायचं .....भरपूर जगायचं .....

मनाला आपणच आवरायचं असतं....

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात


भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं

Tuesday, July 10, 2007

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल !!

-कुसूमाग्रज.

पुरे झाले सुर्य चंद्र, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा
जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा,
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापुर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुध्दा आभाळात पोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंड्या सारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल!

कुणीतरी असावे

कुणीतरी असावे
कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं,
भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं,

कुणीतरी असावे
पैलतीरी साद घालणारं,
शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं,

कुणीतरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर नेणारं,
अंधारलेल्या वाटेत आपल्याबरोबर येणारं,

कुणीतरी असावे,
फ़ुलांसारख फ़ुलणारं,
फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं,

कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं,
पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणारं..

धूके दाटलेले उदास उदास

-मंगेश पाडगांवकर

धूके दाटलेले उदास उदास
धूके दाटलेले उदास उदास
मला वेढीती हे तुझे सर्व भास ॥धृ.॥

उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन फिरे आर्त वारा
कुणी ही ना इथे दिसे आसपास ॥१॥

कुठे चालल्या या दिशाहीन वाटा
कुणा शोधिती या उदासीन लाटा
दिशांतून दाटे, तुझा एक ध्यास ॥२॥

क्षणी भास होतो, तुझे सूर येती
जीवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास ॥३॥

गणपत वाणी

- बा.सी.मर्ढेकर

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गि~हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!

योगा योग

योगा-योगही किती सुंदर असतात,
जसे दवबिंदू हिरव्यागार पानावर स्थिरावतात,
या योगा-योगांचे महत्व तरी पहा,
अनोळखी ही अगदी आपलेसे होतात...

एखादी घटना छानपैकी जुळुन येते,
योगा-योग यालाच तर म्हटले जाते,
या जुळलेल्या घटनाही किती सुखद असतात,
क्वचित अनमोल असा ठेवाही देऊन जातात....

प्रत्येक नाण्याला दुसरी बाजु असते,
योगाची कथाही वेगळी नसते,
योगा-योगालाही दुर्दैवाची किनार असते,
क्वचित सर्वस्वाचीही धुळधाण करते....

योगा-योगालही काही चवी असतात,
सहा रसांची याला देणगी असते ,
यांची चव घेता घेता माणुस शहाणा होतो,
योगा-योग योगा-योगानेच होतो हे समजतो...

Thursday, July 05, 2007

त्याला पाऊस आवडत नाही

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.
पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं.
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.
पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.

Wednesday, July 04, 2007

आई...

आई साठी काय लिहु
आई साठी कसे लिहु
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तीमत्व मोठे

जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातील छ्त्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं तसं ठंडगार पाणी

आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी............

Saturday, June 30, 2007

ओरखडा

हिरवी फान्दी
उमलत्या कळ्या
फान्दीवर उरलेला
एखादाच काटा..!

शब्दही असेच कधी
डवरतात...
...बहरतात
पडतात सडा होउन..किन्वा
नुसतेच सलतात!
तेव्हा...
कुठून तरी एक
हळवी दाद...
समजाव
मोहरण, बहरण
कुणीतरी टिपलय!

झेललाय कुणीतरी
...काळजावर सडा
निदान...
..एखादा ओरखडा!!!

तु

मी कधीच म्हटले नाही तुला,
तुही हो माझ्यासारखच..
माझ्यासाठी हळव.....
मी कधीही म्हणणारही नाही तूला
तुही हो त्रुषार्थ
माझ्यासारखा....
कारण हजारात एखादाच होउ शकतो
खरा चातक....!
नाही तर काही आगन्तुक पक्षीही
असतातच ना
प्रत्येक वसन्तात येणारे....
नी शिशीरात सोडुन विखुरणारे
आकाशभर........!!!

श्रद्धा.....

काल रात्री गंमत झाली, Breaking News परत आली.
तर्काच्या ऐवेजी अंधश्रद्धा नाचली, समुद्रावर ही.. गर्दी लोटली.

चमत्कार चमत्कार, पीर बाबाला नमस्कार,
बाबाची करणी, समुद्रात गोड पाणी.
सब रोगोंका एकही इलाज.....
लोक गाऊ लागली गाणी, पिऊन घाणेरड ते गटाराचे पाणी.
हीच आपली थोर संस्कृती, तरी थांबली आहे विकासाची गती.

आता विकास म्हणतात ते तरी काय?

कशा पाई करतात कष्ट? का बोलू मी स्पष्ट!!
मी स्पष्ट बोलून कुठच जग हलणार आहे,
दीड अब्जांच्या गोंगाटात लगेचच विरून जाणार आहे!
सर्व नाक डोळे मेंदू कान, झुकवितात केवळ अंधश्रद्धे साठी मान.
अशी श्रद्धा काय कामाची, जी घेऊन येई महामारी.
मला सगळे दिसते स्पष्ट, सर्व होणार आहे नक्किच नष्ट.

निसर्ग हा कृती अपेक्षितो, बलवान हा दुर्बलाला भक्षतो.
जगात बलवान किती, दुर्बल किती, मांडता येतील का आकडे?
सगळ्यात सोप्पे, व्हा मोकळे, घालून देवाला साकडे.

मुख्यमंत्री करतात महापूजा. घालून बारा अंगठ्या दहा बोटात.
चिंता नसते जनांची, तर नवीन वर्षात काय भरायला मिळेल पोटात.
या अंधश्रद्धेची वाटते मला लाज, अंगावर नसते चिंधी तरी चढवतात देवीवर साझ.

मुंबई-शांधाई, पुणे- बॉस्टन,
हे बोलणे केवळ मिठाईचे वेष्टण.
बिन्डोक जनतेला दाखवतात आतल्या मिठाईची लाच,
लावून IT Park ला भिंतभर काच.

त्या काचेपलिकडे दडली आहे वैचारिक कमकूवत,
असाध्य-साध्य कसे होईल, पाश्चात्य शैली अनुकरत!!
IT मधून आला पैसा, तळागाळात कसा पोचणार?
नवे मम्मी-डॅडी मुलांसोबत केवळ BIG Mac खाणार.

नव्या गाडीतून घरी जाता जाता, येई दत्त मंदिर आडवे,
गाडीतूनच "ओठ-कपाळ" करून गातात Indian cultural गोडवे.
लायकी तसे मिळते, अजूनही निम्मी जनता दोन घास कमीच गिळते.

उपाय काय?? वैतागून टेबलावर घट्ट मूठ आपटली,
बिचारी मुंगी त्याखाली सापडली.
मेल्या मुंगीने दिली कल्पना, चिरडून टाका त्यांना,
ज्यांना नाही फिकीर कोणाची, ना मनाची ना जनाची.
सुचून असली कल्पना, मी गालातल्या गालात हसलो,
काम सोडून या नव्या कुठल्या फंदात मी फसलो!!!!

समस्येचे कळले बहुतेक मला मूळ,
काळच ठरवेल, हे माझे ध्येय का माझे खूळ.
कामे करून घ्यायला, झिजवीन माझ्या बुटाची टाच,
तरी देणार नाही, एक दमडी देखिल मी कोणाला लाच!!!!!

---------------शिरीष माधव गानू

हरवलेला मी

स्वप्नील डोळ्यांची उघडझाप करत
जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी
कान माझे चक्क फितूरी करायचे
मात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी

अखंड उत्साही बडबड तुझी
कानावरुन जायची वाहून
पण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा
न्यायचा माझं मी पण पळवून

'असा काय रे बघतोस हरवल्यासारखा........'
तू म्हणायचीस नेहेमी
'अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी'.

'तुझं आपलं काहीतरीच......'
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
खरं खरं बोलायचं माझ्याशी

सूर्याचं अस्ताला घाईघाईने जाणं
अन तुझं गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं

'येते रे' म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन अजूनही हरवलेला मी
अन अजूनही हरवलेला मी

तू हवा..... तू हवा!

स्वप्नातील गोड भास
सत्यातील आस तू
हवीस तू.... हवीस तू

मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ
बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू

गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू

स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू

Friday, June 22, 2007

खाली डोकं वर पाय

जेव्हा तिला वा असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
जेव्हा ती लाजत म्हणते, "आज आपण पावसात जायचं"
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, "दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !"
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

मन उधाण वाऱ्याचे

मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहूरत्या सांजेला कधी एकटेच झुरते..
सावरते बावरते घडते अडखळते का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते...
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते..
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते.................
रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते,
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते..
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..
जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते..
भाबडे तरी भासांच्या मागून पळते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते..................

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबात

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबात
सगळं जग एकवटून येत..
मनातली रडगाणी वाहून नेत,
नविन सूरातील तराणे गातं..
प्रत्येक थेंबात तेच पाणी, पावसाची तिच जूनी गाणी
पण शब्दाविना आकाशाशी आनंदाची देणी घेणी..
मनामधलं मळभ जणू धाव घेउन आभाळ गाठत,
अन नभातील इंद्रधनु परत मनात बस्तान थाटतं..
डोळ्यामधल पाणी सुद्धा वाहण आता विसरुन जातं,
जलधारांच्या वेगाबरोबर दुःख जणु ओसरुन जातं..
मातीच्या या सुवासासारखं दुसरं काही असत नाही,
कुपी मधल्या अत्तराला मन आता फ़संत नाही..
पावसाचे ते पाणी घराच्या छतावर
हळुवार आपटत असते,
आपल्यातल्या बावरलेल्या बाळाला जणु,
आई प्रेमाने थोपटत असते..

तुझ्याचसाठी

तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी कुणीतरी झरत आहे
गच्च निळ्यां आभाळात एक नभ संरत आहे
मनाचा डोह होतो आठवणींनी चिंब
त्या मनाच्या डोहतही पुन्हा तुझेच प्रतीबिंब

डोळ्यांनी का होईना आता बोलुन् घे प्रिये
तुला शब्द सुचतील तेव्हा कुठे असेन कुणास् ठाऊक?
तुला सुर सापडेल असे काहीतरी आत्ताच कर
तुल शब्द सुचती ल तेव्हा असेन नसेन कुणास् ठाऊक?

तु आहेस म्हनुन माझ्या आयुष्याला आहे अर्थ,
तु नसशिल् तर् माझे जिवन आहे व्यर्थ .
मेघानवाचुन नभामध्ये पाणी कधी जमेल् काय् ?
तुला वजा केल्या नतर माझ्यासाठी जगात काही उरेल काय् ?

डोळ्यांमध्ये वादळ आणी ह्रुदयामध्ये घाव् आहे,
त्या घावाच्या पाठीमागे वेदनेचा एक् गाव आहे.
तिथली लाल गुलाबे पाहुन सर्व माणसे फसतात्,
प्रेमामध्ये ह्या पडुन सर्व भान् विसरतात्.

धूके दाटलेले उदास उदास

मंगेश पाडगांवकर

धूके दाटलेले उदास उदास
धूके दाटलेले उदास उदास
मला वेढीती हे तुझे सर्व भास ॥धृ.॥

उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन फिरे आर्त वारा
कुणी ही ना इथे दिसे आसपास ॥१॥

कुठे चालल्या या दिशाहीन वाटा
कुणा शोधिती या उदासीन लाटा
दिशांतून दाटे, तुझा एक ध्यास ॥२॥

क्षणी भास होतो, तुझे सूर येती
जीवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास ॥३॥

प्रेमात पडतांना

प्रेमात पडतांना , तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं ,
तोंड दुखेपर्यंत बडबडतांना , हवं ते सांगायचं राहून गेलं .

ती हो म्हणेल की नाही म्हणेल की देईल ठेवून एक मुस्काटात,
हा अशुभ विचार करता -करता हवं ते घडायचं राहून गेलं .

नुसताच बघत बसे मी तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये
तिच्या डोळ्यात स्वतःला शोधतांना माझ्याविना तिचं अडायचं राहून गेलं .

तिच्या ओढणीचा , खांद्याचा स्पर्श हवा- हवासा वाटतसे नेहमी,
सांगीन तिला कधीतरी म्हणतांना हा विषय काढायचं राहून गेलं .

प्रत्येक भेटीनंतर ती जातांना घालमेल जीवाची असह्य होई ,

त्या दिवशीही ती निघाली अन..... तिला अडवायचं राहून गेलं .....

कशी ही प्रीत

त्याच्या प्रेमाच्या सादेला मी रुकार दिला आणि सगळं आयुष्यच बदललं......!
सगळी दुनिया अचानक रंगीबेरंगी झाली.

अवचित भेट कशी रे घडली
ध्यानी मनीही नसताना
नकळत प्रीत कशी ही फुलली
गाफिल मन हे असताना

क्षणात बदले सारी दुनिया
गुलाब पखरण चोहीकडे
फुले पिसारा मनमोराचा
नर्तन त्याचे तुझ्यापुढे

एकांती मग उगाच हसणे
तुला आठवून उगीच झुरणे
स्वप्नामधल्या सहवासाने
पुन्हा पुन्हा ते पुलकित होणे

समय गुलाबी पंख पसरुनी
असाच अलगद विहरावा
चिंब भिजावे प्रीतसरींनी
मनात दरवळ पसरावा

राहीले ओठांवरी.....

बोलायचे काहीच होते
बोलले काहीतरी
ओठातले हे शब्द माझे
राहीले ओठांवरी

स्वप्नातली मुर्त तीही
राहीली स्वप्नांतरी
ओठातले हे शब्द माझे
राहीले ओठांवरी

साहवेना ही व्यथा तू
भेट ना रे क्षणभरी
ओठातले हे शब्द माझे
राहीले ओठांवरी

ऐक ना अखेर ही रे
चालले मी दुसर्‍या तीरी
ओठातले हे शब्द माझे

श्रावणधारा

माझ्या ह्या कवितेचं विवेक काजरेकरांनी एका छानशा गाण्यात परिवर्तन केलंय.
माझ्या कवितेचं बनलेलं हे पहिलंच गाणं.

श्रावणधारा

रंगत येती तरंगत येती
जलदांमधूनी धावत येती

श्रावणधारा, जलदाधारा
धुंद वादळी, कापीत वारा
बहरत येती, मोहरत येती
सप्त सूर ते छेडीत येती

लाटा धाडून सागर मग तो
आसूसून ही वाट पाहतो
सरीता वाहे भान हरपूनी
सवे तयाच्या मीलन पाही

इंद्रधनूच्या कमानीतूनी
घेई चुंबन वेडी अवनी
भारुन जाई सारी धरती
पावसास त्या घेऊन कवनी

नि:शब्द आता सारा परिसर
मृद्गंधाचा ओला गहिवर
आठवणी त्या व्याकुळ नयनी
ठेवूनी जाई रंगीत गगनी

हृदय पाखरु

तू नसतोस ना माझ्याजवळ तेव्हा माझं चित्तच नसतं रे था-यावर!

हृदय पाखरु

रुंजी घालती तुझ्या सयी रे, माझ्या या हृदयी
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

तो जर असता आज इथे तर
तो जर नसता आज तिथे तर
जर तरच्या द्वंद्वात अडकले, खिन्न दिशा दाही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

मन लागेना कशात माझे
सूर तयाचा कानी वाजे
देहभान रे हरपून आता, वाट तुझी पाही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

धावत ये ना, मिठीत घे ना
तोडीत ये ना वृथा बंधना
माझी नव्हते कधीच मी रे, फ़क्त तुझी राही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

गूढ

खरंच........! गूढच म्हणायचं हे. हे पृथ्वीतलावरचं रहाटगाडगं कसं काय चालतं
हे एक मोठं कोडंच आहे. शास्त्रीय दृष्टीने प्रत्येक गोष्टीला कारणं असतील
सुद्धा. पण हे सगळं घडवणारा तो कोणी तरी आहे हे नक्की. प्रत्येक गोष्टीचं वळण
अगदी ठरलेलं...... आखून दिलेलं.

अजाण त्या कळीस तो
भमर कसा भेटतो
गूढ उकले ना परी
कितीही शोधिले जरी

जशी धरा आतूरते
गगनाच्या मीलना
जशी सरीता धावते
सागराच्या वळणा

कसे कुणी अनुसरीले
कुणी कुणा शिकवीले
प्रकृतीच्या आर्तक्याचे
चलन कुणी लाविले

काय शोधी तू मना
गुपीत का करी खुले
गूढ अंतरातले
कुणा कधी न सापडे

येशील कां?

सांग सख्या रे येशील का
स्वप्नात माझिया येशील का

वारा नांदी घेऊन आला
हसू गालावर खुलवून गेला
मिटूनी डोळे वाट पाहते, हरवूनी सकला येशील का

आसमंत तो धुंद जाहला
तुझ्याचसाठी व्याकुळ झाला
अलगद येऊनी, हळूच स्पर्शूनी, मोरपीस तू होशील का

रातराणीचा सुगंध आता
गात्रातून या वाहू लागला
मिठीत तुझिया विसरुनी सारे, बेहोश मला तू करशील का

या वेडीला काही ना कळे
तुझ्याविना ना काही उकले
एकदाच रे फ़क्त एकदा, माझा तू रे होशील का

परीसस्पर्श

तुझी आठवण येताच
खुलतं ओठावर हसू
मनातले भाव जणू
दाखवतात तसू तसू

लकाकतात रे ती
डोळ्यातली निरांजनं
अन पापण्या ही जपतात
ती प्रकाशाची स्पंदनं

उजळलेला मुखचंद्रमा
अधिकच होतो लाजरा
मनातले भाव बोलून
होतो कावराबावरा

जीवाची तगमग
वाढवते हुरहुर
तुझ्या आगमनाचे वेध
करतात मन आतूर

दिसताच तू रे मग
सुखावतात ही नेत्रं
परीसस्पर्शाने तुझ्या
उजळतात गात्रं

मी पण

माझे मी पण मी कधीच विसरले
सवे जेव्हा तुझ्या मी पहिल्यांदा बहरले

स्पर्शातून तुझ्या रे मोरपीस फुलले
मनातले तरंग सारे अधरांवर उमटले

सारं विश्व माझं व्यापून तू टाकलंस
मला मात्र पुरतं वेडं करुन सोडलंस

सूर्य, चंद्र, तारे, आकाश सारं काही तूच
हृदयातली छेडली जाणारी हर एक तार तूच

तुझ्यापासून सुरु आणि तुझ्यापर्यंतच सारं
वृथा आता माझ्यासाठी बाकी जग सारं

नव्हतास तू तेव्हा.......

मंतरलेली रात होती
तारकांची प्रणयी वरात होती

चंद्राची धुंद साथ होती
मौनाची नीरव साद होती

दिलात तुझी रे याद होती
सोबतीच्या तुझी आस होती

अनिवार अशी ती रात्र होती
फितूर सारी गात्रं होती

श्वासात आर्जवी ओढ होती
उरात हुरहुर गूढ होती

रात सरता सरत नव्हती
तुझ्याविना जणू व्याकुळ होती

नि:शब्द उसासे टाकीत होती
उष:काल ती मागत होती

वळवाचा पाऊस

अचानक आभाळ भरुन येतं
चोहोबाजूंनी कोसळू लागतं
तळाशी दडलेल्या आठवणी तरल होतात
कासावीस होऊन उचंबळून येतात

उधाणलेला समुद्र
बेछूट पिसाळलेला वारा
उठवतो मोहोळ आठवणींचे
पसरुन सैरावैरा

विचारांचं काहूर
घालतं मनात थैमान
कुरतडून टाकतं काळीज
होऊन दुष्ट सैतान

काहीतरी करायचं राहून गेलेलं
खूपसं उपभोगायचं विसरुन गेलेलं
हातातून वेळ निसटून गेलेली
अपुरेपणाची जाणीव देऊन गेलेली

आभाळ निरभ्र झाल्यावर
स्व्च्छ प्रकाशाची कवाडं उघडल्यावर
आरंभ होईल नव्या दिवसाचा
तृप्तीचं तेज ल्यालेल्या एका नव्या आयुष्याचा

तुझ्याविना

का रे इतकी बंधनं हवीत ह्या जगाची? कां मनाला हवं तसं जगता येऊ नये? नाही रे
जगता येत तुझ्याशिवाय!!

माझं अस्तित्व तुझ्याशिवाय
एक मोठं शून्य
जगातलं सारं काही व्यर्थ
तुझ्याशिवाय अन्य

जाणीव होताच ह्याची मला
कासावीस होतो जीव
तुझ्याविना माझ्या जगण्याची
मलाच येते कीव

कसली ती तगमग
कसली ती तडफ़ड
तुझ्याविना जगण्याची
कशासाठी ही धडपड

उधळून द्यावी सारी
बंधने वाटे आज
भिरकावून द्यावी ती
पांघरलेली लाज

धावत तुझ्याकडे येऊन
मनसोक्त रडून
सारं काही करावं मोकळं
कुशीत तुझ्या शिरुन.

प्रेमसमर

जयश्री

पाहू नकोस ना रे
मजसी असा गडे तू
मी विरघळून जाते
समजून घे जरा तू

आमंत्रणे तुझी ती
नजरेतूनीच येती
नि:शब्द आर्जवे ती
डोळेच व्यक्त करीती

करी पाठलाग माझा
मिश्कील भाव त्याचे
हळुवार सोडती ते
शर प्रेमबंधनाचे

लटका विरोध आता
किती वेळ भासवू मी
ओढाळ ह्या मनाला
किती वेळ थांबवू मी

तू जिंकलास जानू
हरले तुझी प्रिया मी
समरात ह्या मनाच्या
हरुनीही जिंकले मी

तुझे श्वास

श्वास तुझे ते मला दिलेले
संपत आले रे
कासावीस हा जीव होतसे
त्याविण माझा रे

श्वासांच्या त्या हिंदोळ्यांवर
झुलते मी ही तुझ्यासवे
स्पंदनात त्या अनुभवते मी
तुझ्या छबीचे रंग नवे

हळुवार त्या निश्वासांच्या
गोड गुलाबी स्पर्शाने
लाली चढते गो-या गाली
नकळत कशी ही लज्जेने

उमले ओठी हास्य चोरटे
आठवून त्या गुजगोष्टी
काटा फुलतो अंगावरती
तुझीच स्मरुनी गोड मिठी

रिती जाहले आहे पुरती
विना तुझ्या त्या श्वासांनी
दे ना आता श्वास नवे ते
घेऊनी मजसी तव कवनी

मुखवटे आणि चेहरे

किती मुखवटे, किती चेहरे
किती खोटे, किती खरे
प्रयत्न केला शोधायचा जर
भीषण सत्य येईल समोर
त्या सत्याला सामोरं कधी जाता येईल का?

रोज भेटणारे, बेगडी हसणारे
भेटल्यावर ओढून ताणून तारीफ़ करणारे
कसे ओळखायचे कोण आपले
कसे ओळखायचे मित्र यातले
मोजण्यासाठी काही परिमाण आहे का?

कुणाचा जीव तुटतो आपल्यासाठी
कोण हळहळतो आपल्या दु:खासाठी
खोटा कळवळा कोण दाखवतो
संकट येता कोण पाठ फ़िरवतो
कधी खरं खरं आपल्याला कळेल का?

कशाला हवेत हे जमाखर्च....
कशाला हवेत हे तर्ककुतर्क
समोर येईल त्याला म्हणावा आपला
बाकी सोडून द्यावा देवावर हवाला
असं काहीसं करता येईल का?

नाही देता आला पैसा जरी
द्यावा निर्भेळ आनंद परी
जीवन आपलं अमूल्य समजून
फुलवत जावं हास्य पसरुन
असं हसणारं फुल कधी बनता येईल का?

प्रेमाचे गणित!

तुझ्या माझ्या प्रेमातला संबंध,
एक कोम्प्लेक्स नंबरच आहे,
प्रेमाचा भाग रियल आहे,
पण लग्नाचा भाग जरा इमेजनरीच आहे,

एकमेकांशिवाय रहावतहि नाहि,
बाब अगदि बेरजेचि आहे,
आंतर्जातिय विवाहचा मुद्दा खटकतो,
त्याची वजाबाकि करणे मात्र गरजेचे आहे,

तुझं मझ्यावर अनं माझं तुझ्यावर,
प्रेम अगदि कसं रिलेशन मधे आहे,
आत्ता आपले ते एक्स्पोनेन्शिअल आहे,
पण लग्नानंतर म्हणे ते प्रपोर्शनल ग्राफ़च आहे,

३६ गुण जुळवणे ह्यांना बरे कळतं,
नाहि जुळले तर असं कोणचं आभाळ कोसळतं?
कधी ह्यांना कळणार, ३६ चं वैर जरी असलं,
तरी प्रेमात सगळे इक्वल इक्वल असतं,

खरच का लग्नाचे समीकरण एवढे अवघड आहे?
पण आपल्या प्रेमाचे गणित कुठे तेव्हा एवढे जड आहे?
तुलाहि कळाले अन ते मलाहि कळाले,
मग ह्या समाजाला कळायला काय गड्बड आहे?

म्हणुनच म्हणतो, तुझ्या माझ्या प्रेमातला संबंध,
एक कोम्प्लेक्स नंबरच आहे.

Monday, June 11, 2007

एक प्रवास

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
इथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रवास

या जगातील १० सत्य

या जगातील १० सत्य

1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या
लोकांनी सरळ दुपारीच उठावे.

२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा
मारण्यासारखे आहे.

३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.

४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी

५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने
बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.

६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.

७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.

८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!

९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!

१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी

Friday, June 08, 2007

राहीलयं काय आता

लाख वाटल लपवाव जगापासुन या मनाला
तरीही आज तुझी कहाणी कळाली या जगाला
सगळ्यांनी वाचल दुःखं या प्रत्येक शब्दांतुन
काय लपवु राहीलयं काय आता लपवायला.

लाख मन सागंत होत कुठेतरी थाबांयला
वळण निघुन गेली नाही जमल वळायला
सारेच धावले एकदम सुखाच्या मागे
मी काय करु मला नाही जमल पळायला.

आज काय झाल तुला उगाच असं रडायला
कुठे चुकल्यासारखं नाही ना वाटत मनाला
अशी कीती सुखं तुझ्या पदरात पडली
जी कारणं होती तुझी तेव्हा मला सोडायला.

आजही कुठे जमतय मला तस जगायला
एक वणवा कमीच होती मला जळायला
कालच्या पुरातून कसाबसा वाचलो मी पण
डोळ्यातल्या पाण्यात नाही जमत पोहायला.

एक आठवण चाळून घे

नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.

जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे

आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.

मी तिच्यात नव्हतो

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती.

Wednesday, June 06, 2007

हरवलेला मी

स्वप्नील डोळ्यांची उघडझाप करत
जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी
कान माझे चक्क फितूरी करायचे
मात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी

अखंड उत्साही बडबड तुझी
कानावरुन जायची वाहून
पण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा
न्यायचा माझं मी पण पळवून

'असा काय रे बघतोस हरवल्यासारखा........'
तू म्हणायचीस नेहेमी
'अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी'.

'तुझं आपलं काहीतरीच......'
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
खरं खरं बोलायचं माझ्याशी

सूर्याचं अस्ताला घाईघाईने जाणं
अन तुझं गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं

'येते रे' म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन अजूनही हरवलेला मी
अन अजूनही हरवलेला मी

तू हवा..... तू हवा!

स्वप्नातील गोड भास
सत्यातील आस तू
हवीस तू.... हवीस तू

मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ
बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू

गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू

स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू

ही वाट दूर जाते

खूप दूरवर जाणारा रस्ता
कां वाटतो आपलासा
कायम वाट बघणारा
केविलवाणा बराचसा

सोबत त्याच्या एकदा मला
तुझ्या साथीनं जायचंय
खरंच कुठे जातो ते
शोधून काढायचंय

विरक्त साधूसारखा
असतो तो अलिप्त
साथ मात्र देतो तो
समजून सकला आप्त

येशील तू माझ्यासोबत...
जगाच्या अंतापर्यंत...
रस्ता फक्त निमित्त रे....
खरं तर साथ तुझी हवीये
जीवनाच्या अस्तापर्यंत.

तुझा हळवा पाऊस

आज आठवतो मला
चिंब सरीनं तयाच्या
आज भिजवतो मला

कधी बरसणं तुझं
रिमझिम अलवार
नखशिखान्त भिजते
त्यात मी रे हळुवार

कधी तुफानी कोसळ
गरजत बरसत
कधी झिम्माड झिम्माड
द्वाड प्रीत फुलवत

आता कधी रे येशील
मनी सारखा सवाल
घन दाटता नभात
पुकारते वेडी प्रीत

तुझ्याविना हा पाऊस
आसू आणतो डोळ्यात
धरा कोरडी कोरडी
परी डोळे वाहतात

तुझ्याविना हा पाऊस

तुझी इतकी सवय झालीये ना.........
की कुठलाही रंग तुझ्याविना अगदी बेरंग असतो.
त्यात पाऊस तर आपल्या दोघांचाही आवडता.
किती मनसोक्त आस्वाद घेतलाय ना आपण ह्या पावसाच्या स्वच्छंदीपणाचा....!
पण आज तू नाहीयेस........
आणि नेमका तो आलाय रे..........

सारे तुझ्यात आहे

आभास चांदण्याचा या लाजण्यात आहे
जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे

तेजाळती कशा या बंदिस्त दोन ज्योती
ही आगळी दिलेरी तव काजळात आहे

ह्या सावळ्य़ा मुशीचे सौंदर्य जीवघेणे
जादू परी तुझी या साधेपणात आहे

स्वीकारुनी गुलामी बेचैन रात आहे
चंद्रात आज माझ्या ही खास बात आहे

संकेत हे गुलाबी, आवेग हा शराबी
केसात माळलेल्या या मोगर्‍यात आहे

ही आग मारव्याची ह्या गारव्यात आहे
गाफ़ील यौवनाची संपूर्ण मात आहे

हुंदका साधा तुझा

हुंदका साधा तुझा सांगून गेला
झाकलेली वेदना बोलून गेला

पाहुनी तव लोचनी आभाळ काळे
अंतरी पाऊस हा बरसून गेला

सावरु मी हा कसा संसार माझा
मांडलेला डाव तो उधळून गेला

प्रीत माझ्या अंगणी बहरेल कैसी
कोवळे अंकूर तो जाळून गेला

ओळखीचे हास्य तो विसरुन गेला
राहता तो ही दुवा निखळून गेला

वावडे होते जरी तुज मैफ़लीचे
सूर का मग आगळे छेडून गेला

मी अशी दुबळी पुन्हा त्याच्यासमोरी
चेहरा संपूर्ण तो वाचून गेला

वाट माझी ही अशी अंधारलेली
आठवांनी का अशी उजळून गेला

Tuesday, June 05, 2007

ती जेव्हा दिसते तेव्हा.....

ती जेव्हा दिसते तेव्हा ....मी रॉकेलच्या रांगेत असतो
अणि बिन बाह्यांचा मळका बनियान नेमका माझ्या अंगात असतो
कर्वे रोडचा पौड फ़ाटा तेव्हा माझ्या भांगात असतो
पण तरीही तोरा 'शाहरुख'चा माझ्या ढंगात असतो......

ती जेव्हा दिसते तेव्हा हातात माझ्या दळण असते,
मागे तीची आई आणि पुढे धोक्याचे वळण असते
वळणावरचे धोके टाळुन मी हळुच तीला हात करतो
आणि गीरणी मधला गद्दार बुटस ह्या सीझरचा घात करतो
मी पीठासकट आडवा होतो, माझा चेहरा रडवा होतो
माझा रडका चेहरा लपलेला पीठाच्या रंगात असतो
पण तरीही तोरा 'शाहरुख'चा माझ्या ढंगात असतो......

सध्या ती दिसते तेव्हा तिच्या बरोबर 'तो' असतो
आणि सध्या आमचा पिक्चर 'पति पत्नी और वो' असतो
मी आता 'मज़नू ' बनतो, ती वधु आणि तो वर असतो
ती त्याला 'बाझीगर' म्हणते आणि माझा मात्र 'डर' असतो

पण लव्हस्टोरी म्हटली की त्यात व्हिलन येणारच
उशीर होतो खरा पण तुमचे मिलन होनारच
मी मात्र दिवस - रात्र तिच्याच आठवणिंत जगत असतो
तीचा नवरा, तीची मुले, तीचा संसार बघत असतो

माझे हे स्वप्न एकुन ती मला खुप हसते
पण हसणाऱ्या डोळ्यांत तीच्या अश्रुंची एक लकेर असते

थरथरत्या ओठात तीचे शब्द तिथेच थांबतात
ओघळणारे अश्रु मग मुक्यानेच सांगतात,

"बागेत असो वा चिखलात शेवटी ग़ुलाब फ़ुलांचा राजा आहे
आणि रॉकेल असो वा दळण तु फ़क्त माझा आहेस."

Saturday, June 02, 2007

एकाकी चाफा..!

- प्राजु.


काय म्हणता माझे नाव
चाफा म्हणूनी वदती सर्व
जात कुळी मध्ये मी एकला
पांढरा चाफा म्हणती मजला

रूप माझे असे की सुंदर
शुभ्र तनू अन नाभी शेंदूर
तारूण्याची लेऊन झालर
एकटेच जग़णे कसला हा वर

जीवन माझे सरता सरता
बहरून येतील वसंत-वर्षा
नवी विरूधा जन्म घेईल
उजळून निघतील दाही दिशा

साथसंगत सोडली त्यांनी
पानगळ आली म्हणोनी
खरट्यावरचे फूल होऊनी
काय पावलो जन्मा येऊनी

वाटते मग असेच करावे
जीवन आपुले सार्थ करावे
उतरूनी अलगद फांदीवरूनी
शिवचरणी त्या अर्पित व्हावे...

इतकी सुंदर का दिसते ती?

इतकी सुंदर का दिसते ती?
मनात माझ्या का ठसते ती?...

विचारता मी, टाळे उत्तर--
आणि खळाळुन का हसते ती?...

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...

मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसते ती?...

भेटत नाही कधी तिला मी
तरी खुशाली का पुसते ती?...

कसे वागणे 'अजब' तिचे हे?
'नसताना'ही का असते ती?...

या बायडीस माझ्या (विडंबन)

- सुभाष डिके (कुल)


खादाड एका घरची , वारस शोभे त्यांची
पेहराव बारा इंची, या बायडीस माझ्या ॥१॥
खाटेवरी पडावे, 'बाई'स ओरडावे,
अन वेड नित्य खावे, या बायडीस माझ्या ॥२॥
खानावळीत जाई, चाखून सर्व पाही,
पैशाची पर्वा नाही, या बायडीस माझ्या ॥३॥
खर्चाने आली गरिबी, हे रत्न माझ्या नशिबी,
गांजून गेले धोबी, या बायडीस माझ्या ॥४॥
पोटात आणि ओठात, आजार नाही शरीरात,
सगळेच घास पचतात, या बायडीस माझ्या ॥५॥
खचले पलंग सोफे, खुर्ची दमून झोपे,
पाहता शिंपी कापे, या बायडीस माझ्या ॥६॥
खाण्याचे असू दे काम, मज वाटतसे प्रेम,
जपणार साती जन्म, या बायडीस माझ्या ॥७॥

कशी असावी माझी प्रिया...

-मर्द मराठा

ओठावर किंचित हसू, अन गालावरती खळी...
शोभतसे ती चंद्रकोर, रुंद तिच्या भाळी...
मूखकमळ ते उमलूनी यावे सोनेरी सकाळी
लखलखावी तेजोमय कांती रम्य सांजवेळी

वेणीतुनी निसटून यावी, हलकेच एक बट,
नजरेच्या त्या किरणांनी, खुलावा मनाचा पाट
"किस्मत ने साथ दिया तो" .. होईल माझीही भेट
आम्ही दोघे राजा-राणी, रम्य नदीचा काठ

ते नवयौवन ते सुखलोचन, सदैव करतो तिचेच चिंतन
निशाचरापरी रात्र काढतो, आठवणीने व्याकुळ होऊन
रोज पाहतो स्वप्न सुखाचे, प्रचंड आशा उरी बाळगून
सांग सखे तू प्रसन्न होशील का ह्या आहुतीतून ?

तरुणांच्या ओठातील ओळी , लेखणितुनि अवतरल्या...
तयामधला मी ही एक, म्हणुनी मला ह्या आठवल्या..
स्वप्नामधल्या ललना, ज्या तुजला आवडल्या..
नियतीचाही खेळ निराळा, त्या केव्हाच्या खपल्या...

मी वाटसरु...

- मर्द मराठा

अवघड माझी जीवन गाथा, खडतर माझा मार्ग...
असे दु:खाचे डोंगर, सहन किती मी करू
आयुष्याच्या वाटेवरला मी एक वाट्सरू

सुखाच्या शोधार्थ निघालो, मात्रुभूमिसिही मुकलो,
प्रियजनांच्या आठवणिने, मी ही थोडा व्याकुळ झालो

व्याकुळता ही आता कशी मी आवरु
आयुष्याच्या वाटेवरला मी एक वाट्सरू

काळाचा हा खेळ निराळा, नियातिनेही डाव उधळला
कोलमडलेल्या मनास माझ्या कसे मी सावरू
आयुष्याच्या वाटेवरला मी एक वाटसरु

मराठ्याची जात माझी, शिवप्रभू ला स्मरू
कळाची ही कुरघोडी काळावर उलतवू

पुन्हा एकदा श्री गणेशा, पुन्हा लढाई सुरु
आता पिछे हटने नाही "जिन्कू किंवा मरु"

आयुष्याच्या वाटेवरला मी एक वाटसरू

मध्यरात्री दाटले घन

मध्यरात्री दाटले घन, नीज झाली वैरिणी
काय करु, सांगा कुणी
मध्यरात्री दाटले घन, नीज झाली वैरिणी

सर्व दारी दीप जळती जीव माझ्या अंगणी
पवन वाटे सूळ, मारी टोमणे ही ओढणी
सांगु कोणा मी मनोगत? नीज झाली वैरिणी
काय करु, सांगा कुणी
मध्यरात्री दाटले घन नीज झाली वैरिणी

तू जिथे जिथे विहरशील

-नरेंद्र गोळे

तू जिथे जिथे विहरशील, माझी छाया साथ देईल || धृ ||

कधी माझी सय येऊन, जे ढळतील तुझे अश्रू |
तिथे येऊन रोखतील त्या, पुढे होऊन माझे अश्रू |
तू दिशेने ज्याही जाशील, माझी छाया साथ देईल || १ ||

तू उदास होशी कधी जर, तर उदास मीही होईन |
मी दिसो तुला, दिसो ना, तरी जवळी तुझ्याच राहीन |
तू कुठेही जात असशील, माझी छाया साथ देईल || २ ||

मैत्री

-सागरसमुद्र

मैत्री म्हणजे काय असते ?
मैत्री म्हणजे काय असते ?
वाळवंटा एवढ्या दुःखात मायेचे एक झाड असते
खवळलेल्या समुद्रात पैलतिरी नेणारी नाव असते
अस्वस्थ मनास दिलसा देणारी एक शक्ती असते

मन आवर मन आवर..

-सतीश

मन आवर मन आवर
माझ्या शब्दांच्या जाळ्यात अडकू नकोस
अशी माझ्या मोहात पडू नकोस
हे प्रेम नाही तर काय आहे
भावनांना उचंबळून देऊ नकोस
मन आवर मन आवर

न सुचलेली कविता

-राहुल

खूप प्रयत्न करून पाहिला,
पण कविता काही सुचली नाही.
तत्वांची असो वा सत्वांची,
शब्दांची सीमा अजूनही रूचली नाही.

न पाहिलेला मित्र

-राहुल

कधीकधी उगीचच कुणाचीतरी कमरता जाणवते.
त्या नसलेल्या, न भेटलेल्या किंवा कदाचित भेटून दूर गेलेल्या
माझ्या मित्रासाठी या चार ओळी..

असा कोण हा मित्र माझा,
ज्याची हुरहुर लागलीय क्षणोक्षण
न पाहिलेला स्वप्नसखा
त्याचा विरह भोगतोय मनोमन.

चिंब भिजलेली रात्र

-राहुल

चिंब भिजलेली एक रात्र
अजुनही निजली नाही
तुझ्या आठवणींची एक सर
अजूनही सरली नाही

किती वारे आले अन् गेले कितीतरी
तुझ्या श्वासाने दरवळलेली एक झुळुक
अजूनही विरली नाही

शिंपडू देत मनसोक्त आज मला
माझीच आसवे
तुझ्या विरहाची अग्नी
अजूनही शमली नाही

श्रावणमास

-बालकवी

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणांत येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे !

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! ती उघडे
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळेपिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा;
सर्व नभावर होय रेखिले सुंदरेतेचे रूप महा.

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरे सावरिती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारेही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे.
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे

सुवर्णचम्पक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;
पारिजातही बघता भामारोष मनीचा मावळला!

सुंदर परडी घेउनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले-पत्री खुडती,

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत!

मी भाग्यवंत...

-Rahul Bhalerao
कधी कधी दुसऱ्याचे बोलसुद्धा स्वतःचेच वाटतात... अशीच एक मनाला भिडलेली..
forward होऊन आलेली.. एक कविता..

मी भाग्यवंत...

संध्यादेखील करतो मी, दारूसुद्धा पितो मी,
पुरणपोळी चापतो मी, तंगडीदेखील तोडतो मी

हिंदी सिनेमे पाहतो मी, विंग्रजीसुद्धा झाडतो मी,
'दादांना' मात्र तोड नाही, एवढेच फक्त मानतो मी

शिव्यादेखील देतो मी, कवितादेखील करतो मी,
कधी कुणालाही हरवतो मी, कधी जिंकता जिंकता हरतो मी

आध्यात्मावर बोलतो मी, फ्लर्टिंगसुद्धा करतो मी,
'मी मी' करतो मी, कधी 'selfless' देखील होतो मी

प्रेम करत नाही कुणी, म्हणून 'डिप्रेस' देखील होतो मी,
स्वतःलाच समजावतो मग, "नाही रे, त्यांच्याच नशिबात नाही मी!"

कधी देवाशी बोलतो मी, कधी मौनाला धरतो मी
जिवलग एखादा चुकलाच तर, लेक्चरसुद्धा झाडतो मी

सगळ्या जगाचे प्रश्न सोडवायला, असतो नेहमीच उत्सुक मी
स्वतःचे प्रश्न सोयीने मात्र, अनुत्तरीतच ठेवतो मी

"आपलं आयुष्य वेगळं, आपली दुखः वेगळी.."
नेहमी स्वतःच्याच कक्षेत फिरतो मी...
सभोवती मात्र जेव्हा असहाय्य दीन पाहतो मी,
खरंच, स्वतःला खूप भाग्यवंत समजतो मी.

प्रकाशधारा

-राहुल
चला वर्षवू प्रकाशधारा, तिमिरांच्या जगती।
चला फैलवू स्नेहसुगंधा, दुरितांच्या जगती।।

याच दलदलीतुनी उगवतील
पंकज ज्ञानाचे
याच गलबलीतुनी झेपवतिल
पक्षी स्वातंत्र्याचे

समतल, उज्वल, उदात्त धेय्य तव
पर्वतही झुकती ।।१।।
चला वर्षवू...

कोटि-कोटि कर किरणांसम तव
अवगत प्रज्ञाने
उजळुनी टाकी सुवर्णापरी
उजाड उद्याने

आकांक्षेने आज उद्याची
इतिहासे घडती ।।२।।
चला वर्षवू...

आज जागवू धम्मसविता
विश्वबंधुतेने
आज जोडुया मने मनांशी
मातीच्या धाग्याने

अवखळ वाटा मार्ग सोडिती
मानवा पुढती ।।३।।
चला वर्षवू...

सागरी-सांज

-राहुल
साद देती सखे गं या सागरी लहरी
येशील सांजवेळी या सागरी किनारी ।।धृ।।

येती किती तरी गं या सागरा उभारे
केस कुरवाळताना उठती किती शहारे
बोल छपवू नको गं ओठांच्या तिजोरी ।।
......येशील सांजवेळी

क्षितिजावरी अभाळ धरेवरी झुकले
प्रेम या सागराचे किनारी धडकले
भेटीस साक्ष देईल चांदणे रुपेरी ।।
......येशील सांजवेळी

रेंगाळला इथे गं हा रेशमी समीर
जात्या क्षणासवे होतोय जीव अधीर
आहे तुझ्याचसाठी हा श्वासही अखेरी ।।
......येशील सांजवेळी

तांबे-सोन्याची नांद

- ग्रेस

निळसर डोंगर घळीघळीतुन धूर धुक्याचा निघत असे
खेड्यामध्ये गांव पुरातन तसा वसविला मला दिसे

खडकसांधणी परी नदीचे वळण पुलातुन निघे पुढे
पारदर्शनी पाण्याखालून माशांचाही जीव रडे

हातामध्ये रिक्त कमंडलु, तहान गळ्यावर घे जोगी
गावापासुन दूर अरण्ये वणवा वणव्याच्या जागी

अग्नीशी संगनमत सोडूनिया वाराही ईकडेच फिरे
पंथ सोडुनी जशी प्रणाली एकट कवितेतून झरे

मनगट उसवी लख्ख तांबडे कडे चमकते की जळते
जळते तांबे कनकदिप्तीवर खरेच का सोने होते?

वाळुवरुनी पाय उचलिता गुडघे कोपर झांझरती
मेंदुमधुनी शिळा अहिल्या झर्रकन ये चरणावरती

इथे मेघ झरण्याच्या पुर्वी वाकुन बघतो रे खाली
पात्र नदीचे किती भयंकर किती तळाची रे खोली?

उडे कावळा चिमण्यांनीही भुर्रकन अंगण सावरले
खेड्यामधले गावामधले लोक भाबडे बावरले

या पाणवठ्यावर

- रॉय किणीकर

या पाणवठ्यावर आले किती घट गेले
किती डुबडुबले अन बुडले वाहुनि गेले
किती पडले तसेच काठावरती
किती येतील अजुनि नाही त्यांना गणती

हा असा राहु दे असाच खाली पदर
हा असा राहु दे असाच ओला अधर
ओठात असु दे ओठ असे जुळलेले
डोळ्यात असु दे स्वप्न निळे भरलेले

संपेल कधी ही शोधायाची हाव
फोडिले दगड दशलक्ष दिसेना देव
पसरतो शेवटी हात तुझ्या दारात
अश्रुत भिजावी विझताना ही ज्योत

ही वाट वेगळी तुझी नसे रे त्यांची
ही दुनिया आहे केवळ हसणाऱ्यांची
दाखवू नको रे डोळे ते भिजलेले
जा तुडवित काटे, रक्ताने जरी भरलेले

काळोख खुळा अन खुळीच काळी राणी
संकोच मावला मिठीत सुटली वेणी
अंजिरी चिरी विस्कटे सुटे निरगाठ
ओठात चुंबने भरली काठोकाठ

गुदमरली काजळकाठावरची धुंदी
कळवळली हिरवी तळटाचेवरची मेंदी
पाळणा झुले मांडीवर मिटले ओठ
पदरातुनी फिरली एक तान्हुली मूठ

ओठात अडकले चुंबन रुसले गाल
कोयरीत हिरवा चुडा विरघळे लाल
घालता उखाणा फणा रुपेरी खोल
अंकुरले अमृत ढळता नाभी कमळ

असाच

- ना. घ. देशपांडे

वेगळीच जात तुझी;
वेगळाच ताल
तूं अफाट वाट तुझी
एकटाच चाल.

एकटाच चालत जा
दूर दूर दूर
गात गात तूंच तुझा
एकटाच सूर

एकटाच चालत जा
उंच आणि खोल;
बोल आणि ऍक पुन्हा
तूं तुझा बोल.

तूं असाच झिंगत जा
विस्मरून पीळ
तूं असाच फुंकीत जा
अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा
भास तूं तुझेच्;
शांततेत ऍकत जा
श्वास तूं तुझेच.

खोल या दरीत अशा
गर्द साऊलीत
हो निमग्न तूंच तुझ्या
मंद चाहुलीत.

तुझे नाम मुखी

- केशवसुत

केशवसुतांनी त्यांच्या अखेरच्या काळात केलेली ही शेवटची कविता (अभंग)

तुझे नाम मुखी ध्यान तुझे डोळा
व्रुत्ती या चंचळा स्थिरावल्या॥

चिंता भय दुःखे अवघी दूर झाली
अनाथांचा वाली जवळी केला॥

भिकार या जगी इच्छित न मिळे काही
म्हणुनी तुझे पायी भिक्शां-देहि॥

केशवसुत म्हणे देवा दीन-नाथा
तुझे पायी माथा वाहियेला॥

स्फूर्ती

- केशवसुत

काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या !

अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपि पर्वा कसली मग याची !
जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगाने !
होउनिया मग दंग मनी,
व्हावे ते आणा ध्यानी,
गा मग सुचतिल ती गाणी,
परिसुनी त्यांचे शब्द, रुढीचे द्यास झणी ते खवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उकळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हाला !
औचित्याच्या फोल विवेका, जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरी जाऊ
उडुरत्ने ती गरीब धरेला तेथुन फेकुनिया देऊ !
अडवतील जर देव, तरी
झगडू त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतीभरी !
देवदानवा नरे निर्मीले हे मत लोकां कवळू द्या !
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

पद्यपंक्तीची तरफ आमुच्या की विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसे !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे.
उडवुनि देऊनि जुलुमाचे या करु पहा तुकडे तुकडे !
महादेव ! हरहर ! समराचा गर्जत तो वाऱ्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णी ..निजती ते ठारची मरती !
उठा उठा बांधा कमरा
मारा किंवा लढत मरा
सत्वाचा उदयोस्तु करा !
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तीमित जगाला ढवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

कोलंबसाचे गर्वगीत - कुसुमाग्रज

- कुसुमाग्रज

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

दूर

दूर

दूर तेथे...दूर तेव्हा सांज झाली
दूर तेथे आपलीही लाज गेली
एक तूं अन एकला मी एक झालों
एक होतांना घनाच्या आड गेलों
झाकला लाजून तूं गे गाल डावा
त्या घनाच्या आड होता चंद्र तेव्हा...

-आरती प्रभू

मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे

तू गेलीस तेव्हा 'थांब' म्हणालो नाही
'का जाशी' ते ही 'सांग' म्हणालो नाही.
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
'हे अंतर आहे लांब' म्हणालो नाही ...

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का ही नजरच ओली होती
निपटून काढता डोळ्यांमधले पाणी'
जा! फिटले सारे पांग!'- म्हणालो नाही

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे!
असहाय लागला आतून वणवा सारा
पण वणव्याला त्या आग म्हणालो नाही...

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग- म्हणालो नाही...

हे श्रेय न माझे तुझेच देणे आहे!
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग- म्हणालो नाही...

मुली

मुली

'मुलीची जात'
हे शब्द उच्चारवत नाही मला!
मुली कशाही वागल्या
तरीही...
मुली मुलीच असतात!
किती तन्मयतेनं
त्या सजवित राहतात घर!
त्यांच्या नुसत्या असण्याने
बोलू लागतात भिंती
नि डोलू लागते छप्पर...
मुली भरुन टाकतात अंगण
नि वळचणीतले रांजण
मनातल्या स्वप्नांनी-रंगांनी
शाश्वत रंगांनाही रंग देण्याचे
कौशल्य असते त्यात.
हा सोस नसतो मुलींचा
तर ध्यास असतो नव्या उर्मींचा!

मुली असतात
उन्हाची कातरछाया
लहरती.. बहरती कापूर काया
त्या सुखाचा मंद प्रकाश
नि मायेचं झुलतं.. धुंद आकाश
त्या विश्वाचा कोवळा हात
जगाची अधाशी तहान
त्या असतात
काळाचे फडफडते
कोरे करकरीत पान...
म्हणून मुलींना
करु द्यावेत हट्ट
नि होऊ द्यावे स्वच्छंदी
हीच तर असते
त्यांच्या प्राक्तनात पेटलेल्या
निरांजनातील असोशीची नांदी.

- अशोक कोतवाल

Thursday, May 17, 2007

अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे

अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे
विझलेल्या दिव्यांना उजळायला हवे
नाही आठवले शब्द तरी गीत गायला हवे
नसेल जरी खुष तरी हसायला हवे
नको समजूस तुझ्याशीवाय सुखी आहे मी
जगासाठी पण खुष दिसायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे

पुन्हा घेऊन शपत खोटी
तू भेटीस आली नाहीसच
मजबुरी असेल तुझीही काही
खोटेच मनाला समजवायला हवे
तरफडत असशील तू ही भेटीसाठी
स्वत:लाच बजवायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे

तुटलेल्या स्वप्नांना कुरव ळायला हवे
नाही जमत तुझ्याशीवाय तरी जगायला हवे
नसेल जरी सुखी तरी हसायला हवे
नाही भेटलीस सत्यात तु
स्वप्नात तरी तु यायलाच हवे
वाग कशीही तु तरी पण
आपलीच तुला मानायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे

शब्द

शब्द हसणारे,शब्द हसविणारे
शब्द रडणारे,शब्द रडविणारे

कधी मधाळ,तर कधी रसाळ
वेगवेगळ्या तर्हेचे,वेगवेगळ्या स्वभावाचे
कधी सागराप्रमाणे उसळ्णारे
तर् कधी झरयाप्रमणे खळखळणारे

शब्द,कधी भांडतत,कधी कुजबुजतात
कधी रुसतात,कधी उमलतात
आणि कधीतरी फक्त डोळ्यातूनच कळतात

भावनेच्या पोटी जन्म घेउन
तिचे अस्तीत्व दाखवतात
आणि कधी कधी मात्र शब्दच
निशब्द होतात........

अद्यापही सुर्याला माझा सराव नाही

अद्यापही सुर्याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही

येथे पिसून माझे काळीज बॅसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही

हे दु:ख राजवर्खी .. ते दु:ख मोरपंखी
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही

त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तणाव नाही

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

सुरेश भट

मी पुन्हां घराकडे...

मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढे
स्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडे
वाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारं
आज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.

पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडे
ता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडे
तु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातली
आता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.

ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढे
उधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडे
आठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतं
आज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे....

निर्व्याज मैत्र हरवलं होतं

सकाळी साखरझोपेत असतानाच मला हलकसं कळालं होतं
आमच्या शेजारी म्हणे कुणी नवं बिऱ्हाड रहायला आलं होतं
" जराशी मदत कराल ?" म्हणत काकूंनी आईला विनवलं होतं
त्यांच्या पदराआडून एक चाफ़ेकळी फ़ुल हळूच डोकावलं होतं
कुणीतरी खेळायला मिळणार म्हणून मन कोण आनंदलं होतं

घर लावता लावता कधी दोघांची गट्टी जमली कळालंच नव्हतं
लुटूपुटूचाच संसार , पोळी करपली असं मी तिला चिडवलं होतं
चिडून मग तिनं गोबरे गाल अन आपलं नपरं नाकं फ़ुगवलं होतं
गंम्मत केली तुझी , असं समजावता तीनं नाकी नऊ आणलं होतं
पत्यात मागच्या आरश्यात पाहून तिला मी हवं ते पान टाकलं होतं
" कस्स हरवलं ", तिची टूणकन ऊडी पाहून मन हर्षानं दाटलं होतं

गप्पाटप्पा , स्नेहभोजन , सहली हे आता नेहमीचंच झालं होतं
मी मुळात खोडकर , सागरकिनारी तिचं वाळूचं घर मोडलं होतं
व्रात्य कार्ट म्हणून बाबांनी काय बेदम बडव बडव बडवलं होतं
खबरदार , पुन्हा तिच्या वाटेला जाशील तर असं दटावलं होतं
तिनं " फ़ार दुखतय का रे ? म्हणून गुडघ्याला मलम लावलं होतं
माझी जोरात किंकाळी , त्या टपोऱ्या डोळ्यात पाणी तरळलं होतं

पण एकदा का कोण जाणे थोरामोठ्यांच काहीतरी बिनसलं होतं
तिच्या बाबांनी आमचा शेजार कायमचा सोडायचं असं ठरवलं होतं
हातातून हात सोडवताना आईनं तिला अस्स जोरात खेचलं होतं
तिला जाताना पहावणार नाही , मी स्वतःला दारामागे लपवलं होतं
मला सोडून जाताना , ते चिमण - पाखरू काय मुसमुसून रडलं होतं


कालौघात ते निष्पाप बालविश्व केव्हाच अलगद पुसलं गेलं होतं
अधुन मधुन तिची आठवण , मी एक सविस्तर पत्रही पाठवलं होतं
पत्ते बदललेले , इच्छीत स्थळ सापडलं नाही म्हणून परत आलं होतं
पोटापाण्याच्या धावपळीत , धुक्यात ते निर्व्याज मैत्र कुठेतरी हरवलं होतं
प्रत्येक वळणावर , वेडं मन मग त्या निरागस बालमैत्रीणीला शोधत होतं ….

मी आहे हा असा आहे

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...

अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नहितर नीघून जा...

कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही,
समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा...

तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य,
जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा...

तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास,
कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय...

करावस वाटलं तर एकच् करा
मी जगतोय तस मला जगू द्या...
का नवं ठेवता उगाच
मी करतोय ते मला करु द्या...
म्हणूनच म्हणतो..

मी आहे हा असा आहे,

मराठी मुलगा

कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वात साधा सुधा दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पन जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सिगरेट पिऊन येतात
पन जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पन जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो !!

पुन्हा एकदा....

पुन्हा एकदा....
(ह्या कवीतेतुन कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतु नाही तुमचे ह्या बाबतीतले विचार प्लिज मला रिप्लाय करा.)

आजकालचे राजकारणी साले असेच खेळ खेळतात,
दुसरयाच्या खांद्यावर बंदुक ठेवुन आपल्यावरच वार करतात,
गरीबांच्या जिवावरच ते निवडणुका लढवतात,
निवडुन आल्यावर मात्र आपल्यावरच पलटतात.

निवडुन यायच्या आधी त्यांना मायबाप बोलतात,
निवडुन आल्यावर त्यांच्याच जिवावरच उठतात,
वेगवेगळी नाटके करुन पैसा फक्त लाटतात ,
समाजसेवेचे व्रत घेऊन पैसा फक्त खातात,
समोर आल्यावर पैसा जनतेला विसरतात.

वेगवेगळ्या नावाने अनेक धंदे करतात,
पकडले गेल्यानंतर फक्त हॉस्पीटलचा रस्ता धरतात,
पकडायच्या आधी जे हट्टे खट्टे असतात,
त्यानंतर आजारीपणाच्या नावाखाली जामीनीवर सुटतात.

चारा ,धान्य अगदी शवपेट्यांचे घोटाळे करतात,
सगळा माल पचवुन मग सुखाची ढेकरही देतात,
आपण मोकाट सुटुन मग निरपराधांना त्यामध्ये फसवतात,
स्वतःहा एसी गाडीत बसुन ते फक्त इंटरव्यु देतात.

सरावलेले चोर साले ते मग चौकशीचे आदेश देतात,
आता अजुन काय बाकी ह्याचाच विचार करतात,
प्रत्येक महीन्याला काहीतरी नवीन बातमी पसरवतात,
मोर्चे काढयला लावुन जनतेची दिशाभुल सहज करतात.

मागेपुढे न पाहाता पोलीसांना लाठीचार्जचा आदेश देतात,
नंतर विचारपुस करुन जखमींची सहानभुतीही मिळवतात,
जनतेच्या डोळ्यांत किती सहजतेने धुळ फेकतात,
हे साले भामटे स्वतःला राजकारणी म्हणवतात.

विकासाच्या नावाखाली सगळे मते मागतात,
आपल्या घराचा विकास करुन देश विकायला लावतात,
कर्जे घेऊन भरमसाठ ति तशीच ठेवतात,
शेतकरयांना पँकेजेचे म्रुगजळ दाखवत राहातात.

निवडणुकीच्या वेळी तर मोठा चमत्कारच करतात,
जिंकुन आलो तर हे करीन ते करीन असे सांगतात,
जिंकेले तर सारे सहजपणे विसरुन जातात,
हरले तर विरोधी पार्टीचा डाव घोशीत करतात.

नागरीकांवर अघोषीत सम्राटशाही करतात,
भारत आहे प्रजासत्ताक ह्याचे सर्वत्र गुणगान करतात,
पकडुन ठेवलेल्या आतंकवाद्यांची देखभाल करतात,
आणी मग आतंकवादी हल्याची निंदा करतात.

गेंड्याची कातडी आपली फार जपून ठेवतात,
आणी मग सफेद कपडे घालुन वर समाजामध्ये वावरतात,
आपल्या देशाचे नेते असे गुणी असतात,
पापे करतात अनेक आणी गंगास्नान करतात,
तेच गंगेचे पात्र साफ करण्यासाठी परत टेंडर मागवतात,
का झाली अशुध्द ह्याचा मग विचार करत बसतात.

आता खरी वेळ आलीय जनतेने आवाज उठवण्याची,
ह्या समाजाच्या किडींना दुर फेकुन देण्याची,
आठवण करा त्या स्वातंत्र लढ्याची,
अनेकांनी डेशासाठी केलेल्या प्राणार्पणाची,
चला सर्व मिळुन सुरु करु तयारी परत त्या लढ्याची,
पुरे झाली तानाशाही ह्या भारतीय गेंड्यांची,
साथ जर असेल ह्याला आपणां सर्वांची,
होईलही भारतात नांदी पुन्हा एकदा शांतीची.

आठवते तुला ती पहीली भेट

आठवते तुला ती पहीली भेट
माझ्या सारखंचं तुझंही झालं होतं
नेमकं काय बोलायचं
एक अनामिक ओझंही आलं होतं

आठवते तुला ती पहीली भेट
तुझ्या डोळ्यात रहस्य दडलेलं
सात जन्माचं नातं
मी पहील्या नजरेतचं अनूभवलेलं

आठवते तुला ती पहीली भेट
किती गोडवा दाटलेला
दिवस तो अमेचा होता
तरी पाडवा वाटलेला

आठवते तुला ती पहीली भेट
भावनांच्या चांदण्याने भरलेली
एका चंद्राने अलगद एका
चांदनीला मिठीत धरलेली

आठवते तुला ती पहीली भेट
भावनांनी कशी गर्दी केलेली
गर्दीत हरवताना कळलचं नव्हतं
रात्र कुठे अर्धी गेलेली

आठवते तुला ती पहीली भेट
दाटून आलेला चांदण्यांचा पहारा
अंतर दोघात होतं तरीही
चढत गेलेला देहाचा पारा

आठवते तुला ती पहीली भेट
किती हायसं वाटलेलं भावनांना
कवटाळलं होतं एकमेकांच्या
विचारांनी विचारांना

आठवते तुला ती पहीली भेट
मुक्या भावनांचं एक तळ साचलं होतं
दोघही तसे अज्ञानच होतो, तरीही
एकमेकांच अंतर्मन वाचलं होतं

हक्काचा खांदा

हल्ली काही बोलणे मी टाळत असतो

ओठांवरले शब्द नरड्य़ामधेच गाळत असतो

खरे आणि स्पष्ट बोलणे हा माझा गुन्हा आहे

त्याच त्याच वादात सापडलो मी पुन्हा आहे

लोकांवर प्रेम केले किती तरी ते "निरपेक्ष" आहे

हे न पटवून घेवुन नवे रंग दाखवतो .... प्रत्येक दोस्त ...जुना आहे !

मी माझे अश्रू गाळायला त्यांचा खांदा मागितला

त्यांनी माझ्या लोकांच्या डोळ्यांत अश्रू आणि मलाच खांदा दिला !



कवी - उदय गंगाधर सप्रे - ठाणे - ०८ मे २००७

आता तु पुर्वीसारखी नव्हतीस

आता तु पुर्वीसारखी नव्हतीस
आता तु पुर्वीसारखी नव्हतीस
मला पाहुन फ़ुलणारी, मला पाहुन हसणारी
एकान्तात माझी असणारी,
माझ्या खान्द्यावर डोक ठेवुन स्वत:ला विसरणारी

आता तु पुर्वीसारखी नव्हतीस
भेटीसाठी हुरहुरणारी,
अवचितशा स्पर्शाने काहुरणारी,
साद न घालता वळुन पाहणारी,
विजेला घाबरुन माझ्या मिठित सामावणारी

पण,
दैवान म्हणाव की दुर्दैवान
तु त्या सन्ध्याकाळी आलिस
त्याच वाटेवरुन, त्याच काठावर
गळ्यातल्या मन्गळ्सुत्राशी चाळा करित म्हणालीस,
तु इथ एकटाच येतोस?

खर तर, तुझ्या त्या चार शब्दान्नी
आठवणीन्च्या खोल गर्तेत ओढुन घेतलेल
त्यातुन कसाबसा सावरुन मी एव्ढ्सच बोललो,

हो, मी इथ एकटाच येतो.
कारण हिच ति वाट तशीच जिवन्त आहे,
तोच नदिचा काठ अजुनही हिरवा आहे,
आणि त्यान्ना पाहुनका होइना
मला आणखी थोड जगावस वाटत म्हणुन

तु जायला निघालीस,
मी पुर्वीसारखी लडिवाळ साद मारली
पण, खरच तु पुर्वीसारखी नव्हतीस........

मैत्री ठरवून होत नाही

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....१
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....२
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....३
तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा

अंदाज आरशाचा

अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा...

काठावरी उतरली, स्वप्ने, तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा...

ज़खमा कशा? सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने ,तो मोगरा असावा...

माथ्यावरी नभाचे ,ओझे सदा इलाही
दाही दिशा कशाच्या?हा पिंजरा असावा...

मी बरसलो आज शब्दांतुन

मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन , तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी.

बोलकी फुले

बोलकी फुले
कधी कधी बागेत चालत असता
अनेक सुगंध दरवळती
अनेक रंग उधळती
जणू ती फुल काहीतरी सांगत असावी
चालत असतो मी त्या फुलांना पाहत
समोर येते ते पारीजातक
म्हणते मला माझ्या नाजूकपणावर नको जाऊस
ते पारिजातक असेच बोलता बोलता कोमेजून जाते
सुंदर सुंदर चाफा बोलती
मला जवळ घ्या
त्या चाफ्याने मन माझे सुगंधित होई
मग माझे मन मलाच म्हणे प्रीतीला जवळ करी तो चाफा
समोर येई ते गुलाब
त्या ठिकाणी मला अनेक गुलाबं दिसे
रंग अनेक पण साम्य एकच असे
ते फुल होते काट्यानी बहरलेले
हा गुलाब खूप काही सांगे
सफ़ेद गुलाब म्हणे मला जवळ घ्या
तुमच्या नाजूक मनात
माझा सुवास दरवळू दे
अन मैत्री अजून घट्टटट वाटू लागे गुलाबी गुलाब म्हणे
जा मला जाऊ द्या कोणाकडे
अन हळूच प्रीतीची भावना मनात जागवे
शेवटी उरला तो लाल गुलाब
तो हातात आला की सारखे सांगत असतो की
मला जवळ ठेवू नकोस
मी जितका कोमल नी सुंदर दिसतो
तेवढाच दु:ख ही देऊ शकतो
खरच असते की म्हणा
तोच की तो गुलाब जो प्रिती मैत्री अन शांतता दर्शवीत असतो
अन तोच का तो गुलाब जो आपल्या काट्यानी आपल्याला दु:ख देत असतो
तोच लाल गुलाब आपल्या काट्यांनी आपले जीवन काट्यमय करी
तोच तो गुलाब त्या प्रितीची आठवण मनात नेहमी जागवत असे