उमलत्या कळ्या
फान्दीवर उरलेला
एखादाच काटा..!
शब्दही असेच कधी
डवरतात...
...बहरतात
पडतात सडा होउन..किन्वा
नुसतेच सलतात!
तेव्हा...
कुठून तरी एक
हळवी दाद...
समजाव
मोहरण, बहरण
कुणीतरी टिपलय!
झेललाय कुणीतरी
...काळजावर सडा
निदान...
..एखादा ओरखडा!!!
चांगल्या कवितांचा संग्रह
शब्दही असेच कधी
डवरतात...
...बहरतात
पडतात सडा होउन..किन्वा
नुसतेच सलतात!
तेव्हा...
कुठून तरी एक
हळवी दाद...
समजाव
मोहरण, बहरण
कुणीतरी टिपलय!
झेललाय कुणीतरी
...काळजावर सडा
निदान...
..एखादा ओरखडा!!!
चमत्कार चमत्कार, पीर बाबाला नमस्कार,
बाबाची करणी, समुद्रात गोड पाणी.
सब रोगोंका एकही इलाज.....
लोक गाऊ लागली गाणी, पिऊन घाणेरड ते गटाराचे पाणी.
हीच आपली थोर संस्कृती, तरी थांबली आहे विकासाची गती.
आता विकास म्हणतात ते तरी काय?
कशा पाई करतात कष्ट? का बोलू मी स्पष्ट!!
मी स्पष्ट बोलून कुठच जग हलणार आहे,
दीड अब्जांच्या गोंगाटात लगेचच विरून जाणार आहे!
सर्व नाक डोळे मेंदू कान, झुकवितात केवळ अंधश्रद्धे साठी मान.
अशी श्रद्धा काय कामाची, जी घेऊन येई महामारी.
मला सगळे दिसते स्पष्ट, सर्व होणार आहे नक्किच नष्ट.
निसर्ग हा कृती अपेक्षितो, बलवान हा दुर्बलाला भक्षतो.
जगात बलवान किती, दुर्बल किती, मांडता येतील का आकडे?
सगळ्यात सोप्पे, व्हा मोकळे, घालून देवाला साकडे.
मुख्यमंत्री करतात महापूजा. घालून बारा अंगठ्या दहा बोटात.
चिंता नसते जनांची, तर नवीन वर्षात काय भरायला मिळेल पोटात.
या अंधश्रद्धेची वाटते मला लाज, अंगावर नसते चिंधी तरी चढवतात देवीवर साझ.
मुंबई-शांधाई, पुणे- बॉस्टन,
हे बोलणे केवळ मिठाईचे वेष्टण.
बिन्डोक जनतेला दाखवतात आतल्या मिठाईची लाच,
लावून IT Park ला भिंतभर काच.
त्या काचेपलिकडे दडली आहे वैचारिक कमकूवत,
असाध्य-साध्य कसे होईल, पाश्चात्य शैली अनुकरत!!
IT मधून आला पैसा, तळागाळात कसा पोचणार?
नवे मम्मी-डॅडी मुलांसोबत केवळ BIG Mac खाणार.
नव्या गाडीतून घरी जाता जाता, येई दत्त मंदिर आडवे,
गाडीतूनच "ओठ-कपाळ" करून गातात Indian cultural गोडवे.
लायकी तसे मिळते, अजूनही निम्मी जनता दोन घास कमीच गिळते.
उपाय काय?? वैतागून टेबलावर घट्ट मूठ आपटली,
बिचारी मुंगी त्याखाली सापडली.
मेल्या मुंगीने दिली कल्पना, चिरडून टाका त्यांना,
ज्यांना नाही फिकीर कोणाची, ना मनाची ना जनाची.
सुचून असली कल्पना, मी गालातल्या गालात हसलो,
काम सोडून या नव्या कुठल्या फंदात मी फसलो!!!!
समस्येचे कळले बहुतेक मला मूळ,
काळच ठरवेल, हे माझे ध्येय का माझे खूळ.
कामे करून घ्यायला, झिजवीन माझ्या बुटाची टाच,
तरी देणार नाही, एक दमडी देखिल मी कोणाला लाच!!!!!
---------------शिरीष माधव गानू
अखंड उत्साही बडबड तुझी
कानावरुन जायची वाहून
पण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा
न्यायचा माझं मी पण पळवून
'असा काय रे बघतोस हरवल्यासारखा........'
तू म्हणायचीस नेहेमी
'अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी'.
'तुझं आपलं काहीतरीच......'
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
खरं खरं बोलायचं माझ्याशी
सूर्याचं अस्ताला घाईघाईने जाणं
अन तुझं गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं
'येते रे' म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन अजूनही हरवलेला मी
अन अजूनही हरवलेला मी
मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ
बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू
गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू
स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू
डोळ्यांनी का होईना आता बोलुन् घे प्रिये
तुला शब्द सुचतील तेव्हा कुठे असेन कुणास् ठाऊक?
तुला सुर सापडेल असे काहीतरी आत्ताच कर
तुल शब्द सुचती ल तेव्हा असेन नसेन कुणास् ठाऊक?
तु आहेस म्हनुन माझ्या आयुष्याला आहे अर्थ,
तु नसशिल् तर् माझे जिवन आहे व्यर्थ .
मेघानवाचुन नभामध्ये पाणी कधी जमेल् काय् ?
तुला वजा केल्या नतर माझ्यासाठी जगात काही उरेल काय् ?
डोळ्यांमध्ये वादळ आणी ह्रुदयामध्ये घाव् आहे,
त्या घावाच्या पाठीमागे वेदनेचा एक् गाव आहे.
तिथली लाल गुलाबे पाहुन सर्व माणसे फसतात्,
प्रेमामध्ये ह्या पडुन सर्व भान् विसरतात्.
धूके दाटलेले उदास उदास
धूके दाटलेले उदास उदास
मला वेढीती हे तुझे सर्व भास ॥धृ.॥
उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन फिरे आर्त वारा
कुणी ही ना इथे दिसे आसपास ॥१॥
कुठे चालल्या या दिशाहीन वाटा
कुणा शोधिती या उदासीन लाटा
दिशांतून दाटे, तुझा एक ध्यास ॥२॥
क्षणी भास होतो, तुझे सूर येती
जीवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास ॥३॥
ती हो म्हणेल की नाही म्हणेल की देईल ठेवून एक मुस्काटात,
हा अशुभ विचार करता -करता हवं ते घडायचं राहून गेलं .
नुसताच बघत बसे मी तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये
तिच्या डोळ्यात स्वतःला शोधतांना माझ्याविना तिचं अडायचं राहून गेलं .
तिच्या ओढणीचा , खांद्याचा स्पर्श हवा- हवासा वाटतसे नेहमी,
सांगीन तिला कधीतरी म्हणतांना हा विषय काढायचं राहून गेलं .
प्रत्येक भेटीनंतर ती जातांना घालमेल जीवाची असह्य होई ,
त्या दिवशीही ती निघाली अन..... तिला अडवायचं राहून गेलं .....
अवचित भेट कशी रे घडली
ध्यानी मनीही नसताना
नकळत प्रीत कशी ही फुलली
गाफिल मन हे असताना
क्षणात बदले सारी दुनिया
गुलाब पखरण चोहीकडे
फुले पिसारा मनमोराचा
नर्तन त्याचे तुझ्यापुढे
एकांती मग उगाच हसणे
तुला आठवून उगीच झुरणे
स्वप्नामधल्या सहवासाने
पुन्हा पुन्हा ते पुलकित होणे
समय गुलाबी पंख पसरुनी
असाच अलगद विहरावा
चिंब भिजावे प्रीतसरींनी
मनात दरवळ पसरावा
स्वप्नातली मुर्त तीही
राहीली स्वप्नांतरी
ओठातले हे शब्द माझे
राहीले ओठांवरी
साहवेना ही व्यथा तू
भेट ना रे क्षणभरी
ओठातले हे शब्द माझे
राहीले ओठांवरी
ऐक ना अखेर ही रे
चालले मी दुसर्या तीरी
ओठातले हे शब्द माझे
श्रावणधारा
रंगत येती तरंगत येती
जलदांमधूनी धावत येती
श्रावणधारा, जलदाधारा
धुंद वादळी, कापीत वारा
बहरत येती, मोहरत येती
सप्त सूर ते छेडीत येती
लाटा धाडून सागर मग तो
आसूसून ही वाट पाहतो
सरीता वाहे भान हरपूनी
सवे तयाच्या मीलन पाही
इंद्रधनूच्या कमानीतूनी
घेई चुंबन वेडी अवनी
भारुन जाई सारी धरती
पावसास त्या घेऊन कवनी
नि:शब्द आता सारा परिसर
मृद्गंधाचा ओला गहिवर
आठवणी त्या व्याकुळ नयनी
ठेवूनी जाई रंगीत गगनी
हृदय पाखरु
रुंजी घालती तुझ्या सयी रे, माझ्या या हृदयी
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही
तो जर असता आज इथे तर
तो जर नसता आज तिथे तर
जर तरच्या द्वंद्वात अडकले, खिन्न दिशा दाही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही
मन लागेना कशात माझे
सूर तयाचा कानी वाजे
देहभान रे हरपून आता, वाट तुझी पाही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही
धावत ये ना, मिठीत घे ना
तोडीत ये ना वृथा बंधना
माझी नव्हते कधीच मी रे, फ़क्त तुझी राही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही
अजाण त्या कळीस तो
भमर कसा भेटतो
गूढ उकले ना परी
कितीही शोधिले जरी
जशी धरा आतूरते
गगनाच्या मीलना
जशी सरीता धावते
सागराच्या वळणा
कसे कुणी अनुसरीले
कुणी कुणा शिकवीले
प्रकृतीच्या आर्तक्याचे
चलन कुणी लाविले
काय शोधी तू मना
गुपीत का करी खुले
गूढ अंतरातले
कुणा कधी न सापडे
वारा नांदी घेऊन आला
हसू गालावर खुलवून गेला
मिटूनी डोळे वाट पाहते, हरवूनी सकला येशील का
आसमंत तो धुंद जाहला
तुझ्याचसाठी व्याकुळ झाला
अलगद येऊनी, हळूच स्पर्शूनी, मोरपीस तू होशील का
रातराणीचा सुगंध आता
गात्रातून या वाहू लागला
मिठीत तुझिया विसरुनी सारे, बेहोश मला तू करशील का
या वेडीला काही ना कळे
तुझ्याविना ना काही उकले
एकदाच रे फ़क्त एकदा, माझा तू रे होशील का
लकाकतात रे ती
डोळ्यातली निरांजनं
अन पापण्या ही जपतात
ती प्रकाशाची स्पंदनं
उजळलेला मुखचंद्रमा
अधिकच होतो लाजरा
मनातले भाव बोलून
होतो कावराबावरा
जीवाची तगमग
वाढवते हुरहुर
तुझ्या आगमनाचे वेध
करतात मन आतूर
दिसताच तू रे मग
सुखावतात ही नेत्रं
परीसस्पर्शाने तुझ्या
उजळतात गात्रं
स्पर्शातून तुझ्या रे मोरपीस फुलले
मनातले तरंग सारे अधरांवर उमटले
सारं विश्व माझं व्यापून तू टाकलंस
मला मात्र पुरतं वेडं करुन सोडलंस
सूर्य, चंद्र, तारे, आकाश सारं काही तूच
हृदयातली छेडली जाणारी हर एक तार तूच
तुझ्यापासून सुरु आणि तुझ्यापर्यंतच सारं
वृथा आता माझ्यासाठी बाकी जग सारं
चंद्राची धुंद साथ होती
मौनाची नीरव साद होती
दिलात तुझी रे याद होती
सोबतीच्या तुझी आस होती
अनिवार अशी ती रात्र होती
फितूर सारी गात्रं होती
श्वासात आर्जवी ओढ होती
उरात हुरहुर गूढ होती
रात सरता सरत नव्हती
तुझ्याविना जणू व्याकुळ होती
नि:शब्द उसासे टाकीत होती
उष:काल ती मागत होती
उधाणलेला समुद्र
बेछूट पिसाळलेला वारा
उठवतो मोहोळ आठवणींचे
पसरुन सैरावैरा
विचारांचं काहूर
घालतं मनात थैमान
कुरतडून टाकतं काळीज
होऊन दुष्ट सैतान
काहीतरी करायचं राहून गेलेलं
खूपसं उपभोगायचं विसरुन गेलेलं
हातातून वेळ निसटून गेलेली
अपुरेपणाची जाणीव देऊन गेलेली
आभाळ निरभ्र झाल्यावर
स्व्च्छ प्रकाशाची कवाडं उघडल्यावर
आरंभ होईल नव्या दिवसाचा
तृप्तीचं तेज ल्यालेल्या एका नव्या आयुष्याचा
माझं अस्तित्व तुझ्याशिवाय
एक मोठं शून्य
जगातलं सारं काही व्यर्थ
तुझ्याशिवाय अन्य
जाणीव होताच ह्याची मला
कासावीस होतो जीव
तुझ्याविना माझ्या जगण्याची
मलाच येते कीव
कसली ती तगमग
कसली ती तडफ़ड
तुझ्याविना जगण्याची
कशासाठी ही धडपड
उधळून द्यावी सारी
बंधने वाटे आज
भिरकावून द्यावी ती
पांघरलेली लाज
धावत तुझ्याकडे येऊन
मनसोक्त रडून
सारं काही करावं मोकळं
कुशीत तुझ्या शिरुन.
पाहू नकोस ना रे
मजसी असा गडे तू
मी विरघळून जाते
समजून घे जरा तू
आमंत्रणे तुझी ती
नजरेतूनीच येती
नि:शब्द आर्जवे ती
डोळेच व्यक्त करीती
करी पाठलाग माझा
मिश्कील भाव त्याचे
हळुवार सोडती ते
शर प्रेमबंधनाचे
लटका विरोध आता
किती वेळ भासवू मी
ओढाळ ह्या मनाला
किती वेळ थांबवू मी
तू जिंकलास जानू
हरले तुझी प्रिया मी
समरात ह्या मनाच्या
हरुनीही जिंकले मी
श्वासांच्या त्या हिंदोळ्यांवर
झुलते मी ही तुझ्यासवे
स्पंदनात त्या अनुभवते मी
तुझ्या छबीचे रंग नवे
हळुवार त्या निश्वासांच्या
गोड गुलाबी स्पर्शाने
लाली चढते गो-या गाली
नकळत कशी ही लज्जेने
उमले ओठी हास्य चोरटे
आठवून त्या गुजगोष्टी
काटा फुलतो अंगावरती
तुझीच स्मरुनी गोड मिठी
रिती जाहले आहे पुरती
विना तुझ्या त्या श्वासांनी
दे ना आता श्वास नवे ते
घेऊनी मजसी तव कवनी
रोज भेटणारे, बेगडी हसणारे
भेटल्यावर ओढून ताणून तारीफ़ करणारे
कसे ओळखायचे कोण आपले
कसे ओळखायचे मित्र यातले
मोजण्यासाठी काही परिमाण आहे का?
कुणाचा जीव तुटतो आपल्यासाठी
कोण हळहळतो आपल्या दु:खासाठी
खोटा कळवळा कोण दाखवतो
संकट येता कोण पाठ फ़िरवतो
कधी खरं खरं आपल्याला कळेल का?
कशाला हवेत हे जमाखर्च....
कशाला हवेत हे तर्ककुतर्क
समोर येईल त्याला म्हणावा आपला
बाकी सोडून द्यावा देवावर हवाला
असं काहीसं करता येईल का?
नाही देता आला पैसा जरी
द्यावा निर्भेळ आनंद परी
जीवन आपलं अमूल्य समजून
फुलवत जावं हास्य पसरुन
असं हसणारं फुल कधी बनता येईल का?