Wednesday, July 25, 2007

राजे

-कमलेश भान्ड्वलकर
मोघलान्नी हिन्दुन्ना
केल होते गुलाम
आपल्या प्रत्येक श्वाशाचा
हाति त्यान्च्या होता लगाम

हिन्दुन्ना नव्हती अब्रु
नव्हता त्यान्ना मान
स्त्रियान्ची नव्हती कदर
लान्घयचे होते पारतन्त्राचे रान

अशातच तुतारीन्च्या आवाजने
अवघे शिवनेरी दुमदुमले
सन १६२६ अक्शय्यत्रुतियेला
राजे प्रुथ्वीवर अवतरले

राजान्ना होती पुर्ण
परिस्थितिची जाण
सशपथ राज्याभिशेक
करुन झाले मराठ्यान्ची शान

गनिमी कावा हेच
त्यान्चे परिपुर्ण अस्त्र
विश्वासाने सन्घटित मावळे
हेच त्यान्चे अस्त्र

शाहिस्तेखानाची कापली बोटे
अफ़झलखानाचा केला अन्त
मोघलशाहिला पुर्ण हलविले
पराक्रम त्यान्चे अनन्त

राजे तुम्ही होता म्हणूनच
आज आहेत मन्दिरान्चे कळस
गळ्यात डोलते मन्गळ्सूत्र
अन्गनी शोभते तुळस

राजे तुम्ही होता म्हणूनच
आज आहे कुन्कु कपाळी
आशीर्वाद आहेत
प्रसन्न आहे माती काळी

राजे तुम्ही होता म्हणूनच
कमरेला आहे करदोरा
हिन्दु आहेत जगाच्या पुढे
चालतोय त्यान्चाच तोरा

राजे तुम्ही होता म्हणूनच
आज आम्ही आहोत
आमचे शत:कोटी प्रणाम
तुमच्या चरणी जावोत

एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला

एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला
तुझ्या नकळत मी तुझ्यावर प्रेम केलं
तुझ्या बरोबर आयुष्यभर राहण्याचं स्वप्न पाहीलं
तुझ्यामुळेच प्रेमाचा खरा अर्थ मला कळला
पण या प्रेमाची जाणीव कशी करुन देऊ तुला


जिथे जिथे पाहतोय तु आणि फ़क्त तुच दिसतेस
नजरेस नजर देता खट्याळ हसतेस
तुझं बरोबर असणं जणू स्वप्न वाटे मला
मला सगळीकडे तुच दिसतेस
पण मग मीच कसा गं दिसत नाही तुला


तु अजाण आहेस माझ्या या प्रेमाने
सांगितल नेहमी मुक्या ईशा-याने
पण तो ईशारा तुला कधीच कसां ना कळला
कधी मी सगळ शब्दात सांगु शकेन का तुला?


एकदा निश्चयच केला होता तुला विसरण्याचा
हजारदा केला प्रयत्न सगळं संपवण्याचा
पण प्रत्येक प्रयत्न माझा, माझ्याच प्रेमापुढे फ़ोल ठरला
जणु हे वेडं मन कधी विसरुच शकत नाही तुला


आता तर फ़क्त एकच स्वप्न आहे या मनाचं
तुज्यासोबत शेवटपर्यंत जगण्याचं
एक दिवस नक्कीच जिंकेल
हा वेडा जीव आज जो या खेळात हरला
एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला

तुलाच शोधतोय!

तुलाच शोधतोय!

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना......
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना... कण-कण मरतांना.......

आयुष्य म्हणजे हेच असत......

....सई(सुप्रिया पाटील)
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
प्रवाहासारखं...येईल त्याला सोबत घेत जाणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
स्व:तची दु:ख विसरून दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
भूतकाळाच्या गोड आठवणीं सोबत वर्तमानात जगणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
एकटं येऊन गर्दीत जगून पुन्हा एकटं निघून जाणं........

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
थोडसं रडणं आणि खूपखुप हसणं.......

निर्णय

@मोनिका घरत.
मनात होते कधी एकदा
तुझ्यासवे वाळूत फिरावे
विसरूनी या सार्‍या जगताला
प्रेमगीत हे मिळुनी गावे

आयुष्याच्या एका संध्याकाळी
एक आठवण मनात सलते
अधुरे राहीले स्वप्न माझे
जुळले नाही अपुले नाते

विनंती एकच विसरूनी जा हे
तुझ्या परीने उणी आहे मी
सुखी रहा तू सार्‍या जन्मी
तव मार्गातुन दूर उभी मी

धागा द्या धागा द्या

ही कविता मी कोणालाही उद्धेशून लिहीलेली नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका.
हवं तर ह्या कवितेचा संबंध माझ्याशी जोडा.
@सनिल पांगे

धागा द्या धागा द्या (धागा = THREAD, -- इति ओर्कुत)
आम्हालाही थोडा धागा द्या
आमच्या शब्दांनाही इथे
व्यासपीटावर जागा द्या

धागा द्या धागा द्या
प्रेत्येकाचं मन म्हणतं
तुमचं नाणं सोन्याचं असलं
तरी आमचं पितळेचंही खणंखणंतं

येऊ द्या येऊ द्या
आम्हालाही पुढे येऊ द्या
चढाओढीच्या खेळा मध्ये
आम्हालाही भाग घेऊ द्या (चढा-ओढ - माझाही वाटा मोठा आहे)

जिंकू द्या, जिंकू द्या
आम्हालाही मन जिंकू द्या
आमच्या शब्दांनाही थोडाबहूत
कवितेत प्राण फुंकू द्या

ऋणानूबंध, ऋणानूबंध
आम्हालाही ऋणी होऊ द्या
तुमचे आभार मनापासून माणून
आम्हालाही कोणि होऊ द्या

मिरवू द्य, मिरवू द्या
आमच्याही कवितेंना मिरवू द्या
आमच्या बावळट मुलांच्या डोईवर
कोणालातरी हात फिरवू द्या

निस्व:र्थ व्हा, निस्व:र्थ व्हा
आमचही घर वसू ध्या
मागच्या बाकावर पडलो आम्ही
कधीतरी पुढे बसू द्या

दान द्या, भिक्षा द्या
प्रतिसाद आम्हाला हकखास द्या
आमच्याही गुदमरत जाणाऱ्या कवितेना
जगवण्यासाठी एक श्वास द्या

मज आजहि उमगेना

मज आजहि उमगेना
प्रिये,सान्ग सखे कुठे चुकलो समजेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

मज जीवनास अर्थ दिलास खरा
तुच तु होतिस जिवनी चैतन्यचा झर
हा झरा आटतना मज आज पहावेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

तुझीच वाट पाहिली चातकासम
आज हा कसा पसरी जीवनतम?
मज चातका ह्या दुश्काळी अता रहवेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

मज जीवनी प्रवेश केलास गुपचुप
कसे सहावे नियतीचे हे क्रुर रुप
तुझ्यविन जिवन आता जगवेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

जिथे असशी रहा मान्गल्य सुखाने
कधी स्पर्श न करावा जीवनी दु:खाने
पण तुझ्यविन मज माझे अस्तित्वच जाणवेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

हे मुंबईकर

ही मी निघाले माझ्या रस्त्यावर
रोजचीच वाट, रोजचेच धावणे
रोजचीच गर्दी, रोजचेच पाहुणे
माझ्यामागे त्यांचे रोजचेच धावणे

मुंबापुरी माझ्याबरोबर झोपते उठते
माझ्यासोबतच दिवस जगते
माझ्या प्रत्येक फेरीबरोबर
त्यांचे जीवन वेग धरते

झुकझुक माझ्या श्वासाबरोबर
त्यांचे जीवन ताल धरते
कधी संगीत तर कधी विसंगत
सुरावटीत ते ऐकु येते

प्रत्येक प्रवासी हितगुज करतो
सुखदुखांची रास उधळतो
माझ्यासोबत मनास मने
जुळवण्याचे तो प्रयत्न करतो

मी नेहमीच धावते
उनपावसाची कशास तमा
हेच मझे सांगणे तुम्हासी
जीवनगाणे गात रहा

(सगळे व्यवस्थित चालले होते...
पण नजर लागली कोणाची...?
तारीखः ११ जुलै २००५)

ते नरधम माझ्या जीवावर उठले
चढले ते शस्त्रास्त्रांनी स्फोटक सोडुन गेले
मोठ्या धमाक्याने तेव्हा माझे अंग चिरटले
आणि माझ्या साथिदारांच्या जिवाचे कत्तल केले

एक धमाका एक स्फोट
किती जिवांची कत्तल
तो आक्रोश ती धावपळ
जगण्याची ती धडपड

ती शरीराची लक्तरे,
ते लटकलेले हात,
ते रक्ताचे थारोळे,
निर्दयांनी केला घात

ती पिळवटलेली नजर,
विचारते 'मीच का?'
पाहणार्याच्या नजरेलाही
असह्य होतो धक्का

पहा पहा त्या बाळाचा आक्रोश
निर्जीव आईच्या कुशीत
सहज गेला नसेल जीव तिचा
त्याच्या भविष्याच्या विचारत

मग दिसतात सरसावलेले
तत्पर मदतीचे हात
घायाळांना दिलासा देणारे
ते देवाचे अवतार

वर्षे उलटली काळही सरला
मागे व्रणही ठेवुन गेला
निर्दयतेच्या क्रुर प्रसंगी
जीवनात घाव सोडुन गेला

खचले तेव्हा मी ,म्हणाले आता माझे कोणी नाही
मझ्याबरोबर राहुन जीव गमावेल कोणी

परंतु..

माझे नमन तुझ्या चरणी
हे मुंबईकर,
तुझ्या धाडसाला माझा सलाम,
ठेंगा दाखवुन दहशतवाद्यांना,
तु सुरु केलेस आपले काम

पाउस असा हा झरतो

पाउस असा हा झरतो
पानांतुन गाणी गातो
नभ घेवुनी उशाशी
मोत्यांची स्वप्ने देतो

ओल्या मनात माझ्या
दडुनी खुशाल बसतो
रोमांच होवुनी वा
हातावरी उमटतो

थेंबात ये रुपेरी
घेई खुशाल झोके
मातीतुनी उगवती
त्याची अनंत रुपे

पाउस आसमंती
पाउस अंतरात
पाउस होवुनी मी
माझ्या मनी त्रुषार्त

माझे स्वप्नं माला हसतात.

माझे स्वप्नं माला हसतात.
मी त्याला भेटते आणि सर्वस्वं विसरुन जाते,
जशी वैशाखात ही धरा बहरुन येते.

तो बोलायला सुरुवात करतो,
आणि मी फ़क्तं त्याच्याकडे बघते,

मग प्रत्येक श्वसात,उदांत,
डोळ्यात त्याला सठवते.

थोड्या वेळानी,तो ही एकदा,
प्रेमाने नजर फ़िरवतो.

माझा हाथ,प्रेमाने
त्याच्या हथात घेतो.

मी पण माझं मन माझ्या
हाथात ठेउन त्याला देते,

आणि त्या क्शणी मनाला,
असलेली त्याची हुर हुर जणवते.

बराच वेळ असाच निघुन जातो,
एकमेकांच्या डोळ्यन्नी अवघं विश्वं फ़िरुन येतो.

मग वर्याच्या हळुवार वेगात मी त्याच्या कुशित शिरते,
आणि परत एक्दा स्वत:ला मी त्याच्या अधीन करते.

त्याच्या श्वसाचा सुगन्धं,मी कधिच माझा केलेला असतो,
आणि एकमेकांच्या प्रेमात आम्हि स्वत:ला विसरुन जातो.

अचानक सगळं सुन्दर दिसयला लगतं,
वारा काहीतरी कानात गुणगुणतो,

मग वतवरण उगाच बदलतं,
आकाशात काळे ढ्ग जमुन येतात,
सोबत पवसांच्या सरी घेउन येतात.

वीज चमकते,मी त्यच्या कुशीत शिरते,
आवाज होतो ढ्गांचा,मी मिट्लेले डोळे खाडकन उघडते.

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते............

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
मन चांदण्यात न्हावुन निघते
आशेच्या पावासाळी सरीने
डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते
माझ्या मनातल्या कोरया कॅनवास वर
तुझं चित्र मग आपोआपच उमटते

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
जणु श्रावणातली पहीली सर बरसते
तुझ्या आठवणींच्या सरीने
कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला
मग नवी पालवी फ़ुटते
रात्रीच्या गर्द काळोखी आभाळातली
शांत चांदणी जणु पुन्हा चमकते
माझी नजर मग
त्या चांदण्यातही तुलाच शोधिते

कधी कधी तर वाटते की जाऊदे
तु नाही तर तुझी आठवण तरी येते
कमीत कमी माझं उदास मन थोडंतरी हसते

भावना मनाच्या कोणा न कळल्या .............

शब्द बांधील ती प्रेम गुपिते
मी मुद्दामच नव्हती खोलली
उगवत्या मनाच्या स्वप्नांची
जणु ईच्छाच होती मावळली

तुझ्या आठवणीत तेव्हा
प्रत्येक रात्र मी जागवली
तुझ्या बरोबरच्या प्रत्येक
क्षणाला न विसरण्याची शपथ मी दिली

अविस्मरणीय त्या क्षणात आता
असहनीयशी वेदनाच फ़क्त ऊरली
त्या वेदनेची लहर मनाच्या
अंतरी खोलवर पोहोचली

आनंदाच्या गावची वेस जणू
आता खुप मागे राहीली
वाटतय ती भाग्यलक्ष्मी जणु
माझ्यावर कायमचीच रागवली

सहन मी एकट्यानेच केलं
तुझी सोबत जरी नसली
मन बिचांर एकटच जळांल
तुझी आठवण जेव्हा जेव्हा पेटुन उठली

एकतरी प्रेम कविता-हास्य कविता

एकतरी प्रेम कविता म्हटल करावी
दोन-एक सिनेमे पाहिले की जमावी
अलगद शब्द जुळवुनी ती घडावी
'ह' यात काय अवघड लेखणी म्हणाली

मग 'मुघले आझम'ची पारायणे केली
रटाळ'गणिते'सोडुन प्रेमकोडीन्ची सवय लावली
त्या कमिटेड मैत्रिणीची रोज आस्थेने विचारपुस केली
'ह' यात काय अवघड लेखणी म्हणाली

बागेत संध्याकाळी हटकुन राणीला खेळायला न्यायची
प्रेमभंगात बुडालेल्या मित्राची चोरुन डायरी
वाचायची
आर्चिजच्या दुकानात घुसल्यावर'तीच' पाहयची
'ह' यात काय अवघड लेखणी म्हणाली

दिवसामागुन दिवस ,महिन्या मागुन महिने
शब्द काही सापडेना ना जमेना.
.
.
कसे जमणार?प्रीत जणु निस्वार्थ 'त्याग'
एकाच प्रेमकवितेसाठी 'स्वार्थी'मला हे उमगेना
.
.
मंडळी
म्हणुन मी'ताज'ला व्होट देऊन मी मोकळी झाले
@भक्ती

एखादा पावसाळा............!!!!!!!!

पाऊस म्हणजे काय?
तर शरीराबरोबर मनालाही चिंब भिजावणारा,
जतन केलेल्या आठवणी अलगदपणे उलगडायला लावणारा.

मित्र-मैत्रीणिंबरोबर पाण्यात सोडलेल्या होड्या,
आणि ऐन वयात आल्यावर पावसात भिजून काढलेल्या खोड्या,
सगळ काही नजरेसमोर अचानक नाचू लागत,
अगदी कालच घडल्यासारख ते वाटू लागत.

पावसात भिजल्या नंतर मनाचा कोपर्‍यात दाडपूण टाकलेल्या गोष्टीही आठवू लागतात,
आणि त्याही मग नकळत चेहरयवर एक हसू आणतात,
ती पावसात भिजलेली आठवनही आपल्याला हविहवीशी वाटते,
लोकात नकार देउन सुद्धा आपल्या मनात तीच आठवं दाटते.

नेहमी चिक-चिक करणारा पाऊस ही आपल्याला सुखाऊ लागतो,
अशी भेट रोजच होईल का? आपण मनालच विचारू लागतो,
असे तर अनेक पावसाले येतात आयुष्यात,
पण काही पावसाले मनात घर करून राहतात.

भरपूर वेगळ घडत आयुष्यात,
पण या आठवणी नेहमी सारख्याच वागतात,
म्हणूनच सांगते मित्रांनो,
एखादा असा पावसाळा पुढचे अनेक पावसाळे काढायला पुरेसा असतो,
कारण तो पावसाळा मनाच्या कप्प्यात जपलेला असतो,
अगदी आयुष्यभारासाठी

क्रोधाग्नी..एक चटका

टिप : एका सत्यघटनेवर आधारीत......
-------------------------------------

उत्तरप्रहर, मी गाढ झोपेत,
अपरात्री फ़ोनची घंटा खणखणली
बाहेरगावच्या मैत्रीणीचा नंबर
पाहून मनात शंकेची पाल चुकचकली
"अत्यंत तातडीची मदत हवीय,
ताबडतोब निघ" तिनं आज्ञा सोडली

"सुमी, परवा रात्री न सांगताच
कूणाचा तरी हात धरून पळून गेली
विधात्याचा लेख बघ, दुर्दैवाने
तिथेही तिची पाठ नाही रे सोडली
अपघातात त्याच्यासकट बाकीची
जागीच ठार,ती गंभीर जखमी झाली
तीने घडलेली सारी हकीकत
एका श्वासात न थांबता सांगून टाकली

"माझ्या कडून काय मदत हवी आहे"
अनपेक्षीत धक्का पचवित मी विचारणा केली
तिला मदत करावी, सार्‍यांची मी किती
गयावया केली, कुणीच भीक नाही घातली
वाटलं तू काहीतरी करशील म्हणून
अपरात्री तुला साद, ती पार रडवेली झाली

प्रत्येकाच्या डोळ्यात अंगार,आप्त
नातेवाईक मंडळी कोंडाळी करुन बसलेली
घाव अगदी ताजा, नुकता काल-परवाचा
झाडून सारी जणूकाही सुडाग्नीने पेटलेली
"जखमी प्राण्याला पण आपण मदत
करतो, हे तुमचं रक्त" मी समजुत काढली

"मदत करण्याचा विषय सोडून बोल"
बापाने करारीपणे आपली भूमिका स्पष्ट केली
"परवा तिचं श्राद्ध होतं, ती आम्हाला मेली
ज्या दिवशी तिने घराची लक्ष्मणरेषा ओलांडली
पोरीने केलेला विश्वासघात आठवून, बापाने
बहूदा मनातल्या मनात जोरदार शीवी हासडली

पाहून सार्‍यांचा एकंदर रागरंग, खवळलेल्या
समुद्रात नौका घालण्याची कल्पना, मी टाळली
"या घडीला गरज तिची, नंतर करायचं
काय तिचं, निवड तुमची" मी विनवणी केली
आणि म्हणालो,"तिला वाचवू शकला असता
तुम्हाला उपरती नाही झाली म्हणजे मिळवली

कुठलंस फ़ुटकळ इस्पितळ, तोच तो
चिरपरिचित विचित्र औषधी गंध, अंधारी खोली
शरीरावर असंख्य जखमा, जुन्यापुराण्या
खाटेवर मुटकुळं करुन ती निपचित पडलेली
माझी हलकेच थाप, तीची गाढ निद्रा भंग
पावली, मला पाहून तिला थोडी हुशारी आली

"माझ्याकरीता फ़ुलं नाही आणलीस?"
ती करुण चेहेर्‍यावर मिश्किली आणत म्हणाली
"अग वेळच नाही मिळाला गडबडीत,
लगेच आणू का?" मी उगाच सारवासारव केली
"चल सोड रे, तुला माझ्या पार्थिवावर
वहायला उपयोगी पडतील" ती कसंनुसं हसली

तुलाच शोधतोय!

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना......
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना... कण-कण मरतांना.......

तुझांच????

गजर नामाचा

श्रीधर तिच्या ह्यांचे नाव
नामाने होते सकाळ
उठता बसता घेते नाम
सदान कदाहाती माळ
गजर सदा नामाचा
श्रीधर उठ्तोस ना
श्रीधर अरे उठलास का
श्रीधर किती वाजले बघ जरा
श्रीधर उशिर होईल ऑफिसला
श्रीधर चहा ठेवलाय
श्रीधर
श्रीधर पुन्हा उठवणार नाही हं
श्रीधर काय करु ब्रेकफ्हस्ट्ला
कॉन्फ्लेक्स चालेल की
ऑमलेट हव लवकर सांग हां
देवा चटका बसला मला
श्रीधर जरा ब्र्नॉल शोध ना जरा
श्रीधर एकतोयस का
श्रीधर
अरे श्रीधर
पाणी सोडलय अंघोळीला जा
मग माझ्या करता हि बादली लाव
श्रीधर चीनुला उठवतोस का
श्रीधर कुठे जाणार आहेस आज
डबा भरुना
श्रीधर चिनुचा होमव्र्क कुठे गेला
इथेच होता काल
चल बेटा उशिर होईल आपल्याला
बेटा बाप्प्ला नमस्कार कर
आणि पापा दे बाबाला
बाबाला लवकर ये सांग
श्रीधर निघतो रे आता
फोन करेन जमेल तेव्हा
ओट्यावर डबा ठेवलाय
श्रीधर
अरे सुट्टे अस्तिल तर देना
देवळात जाईन जाताना

अनामिक भट्कंती

रात्रिच्या निरव शांततेत
एखादा तरंग उठावा
आणि उलथा-पालथ होऊन
सगळ शांत निश्चल व्हाव तसच काहितरी हे

तिच आणि त्याच भांडण झालेल
चांगलच जोरदार
तिच माहेर आणि सासर
दोघांचाही उध्दार होण्याइतपत

आणि आता सर्वत्र
अबोल्याच राज्य...

सकाळ व्हावी
तिही भांडी आपटण्याच्या आवाजाने
त्यानेही द्यावे उत्तर
मग आपटण्याऱ्या दरवाज्याने...

नाश्ता व्हावा
पण अळणी लागावा
आणि चहा मात्र कपातच रहावा

दुपार तर झालीये
पण आज तो इकडे एकटाच
आणि तिही तिकडे

मागुन थोडीशी कुजबुज
आणि मन चाहुल घेण्यात दंग...

समोरच्या होटेलातली
नेहमीची जागा आज कोणीतरी
दुसऱ्याच जोडीने बळकावलेली

आणि मनात आठवणींनी
उडवलेली गर्दी
तिकडे तो
आणि इकडे ती....

कस बस काम उरकुन
दोघही घरी निघालेले
आताशा राग जरा गेलेला...

त्याने मग नाईट शो
बुक केलेला..
तिनेही पूल साईड टेबल
रीझर्व्हड केलेला..

कालच भांडण आताशा
हरवलेल...पण
त्याने येउन मनवाव
म्हणुन तिच मन रुसलेल...नाटकीच

त्याने येउन सांगावा बेत
अन तिने तिचा...

जुनच भांडण पुन्हा नव्याने सुरु व्हाव...
भांडता भांडता त्याने म्हणाव
रागवलीस ना की खुपच सुंदर दिसतेस

तिनेही मग लाजुन त्याच्या मिठीत शिराव
अन मग रात्रभर त्यांनी
चांदण्याच्याच संगतीत घालवावी...रुपेरी चांदणे मिठीत भरत ....

'काटा' अन 'मी'

फुलांच्या बागेत आज काटा बोलला,
नेहमीच्या भाषेत मी त्याला हाकलला,

आज एक फुल नाही मिळाले वाट्याला,
मग म्हंटले आता विचारुच या काट्याला

तो मलुल होता पण तरीही सांगु लागला,
"मित्रा, मी रक्षक होतो त्या फुलासाठी,
पण आज डोळ्यासमोर हारलो रे!"
मी म्हंटले, "नवीन काय रे यामध्ये??
रोज तर सगळेच असेच फुल खुडतात"..
तो म्हणाला, "अरे त्या त्या फुलात,
माझा जीव गुंतलाय ना!"
मी म्हंटले, "अरे वेड्या हा तर निव्वळ मुर्खपणा!!"

तो भडकला अन म्हणाला,
"अरे आईबापही रक्षक असतात ना,
त्यांना ही तर काटाच ठरवितात ना कधीतरी!!
मग त्यांनी त्यांनी आपल्या फुलास जीव नाही का लावायचा??

ते जाउदे असं बघ,

तुही तर असशील ना कुणासाठी 'काटा',
(कारण तुही रक्षक आहेस कुणाचा!!)

कोणीतरी तुझ्यासाठी ही असेल 'काटा'
(तुलाही कोणीतरी हवे आहेच ना!!)

तुही 'फुल' असशील ना कुणासाठी,
(तुझ्यावर जीव लावणारे आठव!!)

कोणीतरी 'फुल' असेल ना तुझ्यासाठी,
(तुझा जीव कुणासाठी तरी तुटतो ना!!)

आणि हो,

कधीतरी एक 'काटा' दुसर्‍या 'काट्याला'
भारी पडतोच रे!!"

एवढं ऐकुन जड पावलाने बागेतुन
बाहेर पडत होतो अन तेवढ्यात पायात एक
काटा रुतला...

अन या वेळी मात्र मी 'काटा' अलगद उचलला अन
हृदयापाशी बाळगला..

अन मग दोन काटे, दोन फुलं,
उरल्या फुलांकडे, उरल्या काट्यांकडे
परतु लागले.......

आधुनिक....."चांदोमामा चांदोमामा भागलास का?...... "

चांदोमामाचे नवे गाणे एका माझ्या गीता नावाच्या मत्रिनिने संगितले.....कोणी
बनवले माहीत नाही.....
पण मला जाम आवडले म्हणून पोस्ट करत आहे....ज्याने बनवले त्याची मान्यता
मिळाली असे समजून.......

चांदोमामा चांदोमामा भागलास का?
बिल्डिंगच्या मागे जाऊन लपलास का?

बिल्डींग ही आहे सात माजली....
मामाचा वाडा पाडून बांधली.....

बिल्डींगमधे मामाच्या येऊन जा...
पाव भाजी खाऊन जा...

पाव भाजीत पडली माशी...
चांदोमामा राहिला उपाशी.....

मी "थांब" म्हणालो त्याला

मी "थांब" म्हणालो त्याला
आवाज माझा ऐकताच
तो जागच्या जागीच थांबला

क्षणभर माझं भानंच हरपलं
पाहुन त्याच्या चालण्याला
सुख-दुख:, नाती गोती सगळ्यांच्या
ओझ्याने तो पार थकलेला
तेव्हा पाहुन त्याच्या थकव्याला
आवाज मी त्याला दिलेला...........

पण..... नंतर
विचार मनात आला
थांबुनतरी मिटेल का सगळा थकवा त्याचा ?
चालत राहणं हा धर्म आहे "जीवनाचा"
म्हणुन मग थांबवण्यापेक्षा
चालण्यास थोडा उत्साह देऊया त्याला

पण....... हे आधी उमगलंच नव्हत मला
म्हणून
मी "थांब" म्हणालेलो त्याला
आवाज माझा ऐकुन
तो जागीच थांबलेला.....................

एक ’ भेट ’ काय टळली..

- स्वप्ना

पहायचे होते मला..
तुझ्या डोळ्यांत , माझे प्रतिबिंब..
पहायचे राहून गेले..

ऐकायचे होते मला..
तुझ्या आवाजात , माझे नाव..
ऐकायचे राहून गेले..

अनुभवायचे होते मला..
तुझ्या श्वासांत , माझे श्वास..
अनुभवायचे राहून गेले..

तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे....राहून गेले....

भेटीचे तर होते................फक्त बहाणे ,
मजसाठी तर झाले असते ते , ' जगणे '..

तुझ्या डोळ्यांच्या तेजात ,
उजळले असते लक्ष दीप , माझ्या नेत्रांत
जे तेवत राहिले असते , उदास अंधा-या रस्त्यांत..

तुझ्या श्वासांच्या सुगंधात ,
फुलले असते संजीवन प्राण , माझ्या श्वासांत
जे भरत राहिले असते जीवन , श्वास रोखणा-या क्षणांत..

तुझ्या आवाजाच्या मारव्यात ,
गुंजले असते मधुर गीत , माझ्या आत्म्यात
जे देत राहिले असते साद , भग्न एकाकी आयुष्यात..

पण, पण....

एक ' भेट ' काय टळली..
अन ' जगायचे ' राहून गेले..

' तुझ्याबरोबर ' जगायचे राहून गेले..

Tuesday, July 17, 2007

मी जिंकलो आणि ती हरली...

-सचिन काकडे [जुलै १६,२००७]
मी जिंकुनही हरलो ती हरुनही जिंकली
तीची प्रत्येक अदा माझ्या वेड्या मना भावली
मला खुप गर्व होता माझ्या प्रेमावर
आता फ़क्त हसुन पाहतोय त्या गर्वाच्या राखेवर

प्रेम करणं कुठे जमलं मला
सांगुच नाही शकलो कधी मनातलं तिला
पण न बोलताच ती बरंच काही बोलुन गेली
"कधी कुणावर प्रेमं नको करुस" हे मात्र सांगुन गेली

जाताना तीने माझ्याकडे तीची आठवण मात्र गहाण ठेवली
जगण्याची तेव्हा ईच्छाच नव्ह्ती उरली
तिच्या त्या आठवणींना शब्दांनी आसु, एकटेपणाने साथ दिली

पण त्याचवेळी ही कविता मला भेटली
"एक गेली तर दुसरी येतेच"
ही म्हण आज जणु पुन्हा सार्थ ठरली
तिच ती शब्दसुदंरी मला खूप आवडली
मैत्रीचा हात पुढे करता तिने लगेच मैत्री स्वीकारली

ति गेल्यावर मी अंधारातच भटकत होतो पण
हिने माझ्या आयुष्याची विझली वाट पुन्हा पेटवली

ती मला दुख:त खोलवर बुडवुन गेली
पण आज हीने मात्र
मला त्या डोहातही आनंदाने पोहण्याची कला शिकवीली
या कवितेने मला जगण्याची ही नवी भाषा शिकवीली

आज असं वाटलं की
मीच खरंच जिंकलोय आणि ती हरली
कारण दु:खाबरोबर चालताना
सुखाची वाट मी या कवितेसोबत शोधली.........

धागा द्या धागा द्या

-सनिल पांगे
धागा द्या धागा द्या (धागा = THREAD, -- इति ओर्कुत)
आम्हालाही थोडा धागा द्या
आमच्या शब्दांनाही इथे
व्यासपीटावर जागा द्या

धागा द्या धागा द्या
प्रेत्येकाचं मन म्हणतं
तुमचं नाणं सोन्याचं असलं
तरी आमचं पितळेचंही खणंखणंतं

येऊ द्या येऊ द्या
आम्हालाही पुढे येऊ द्या
चढाओढीच्या खेळा मध्ये
आम्हालाही भाग घेऊ द्या (चढा-ओढ - माझाही वाटा मोठा आहे)

जिंकू द्या, जिंकू द्या
आम्हालाही मन जिंकू द्या
आमच्या शब्दांनाही थोडाबहूत
कवितेत प्राण फुंकू द्या

ऋणानूबंध, ऋणानूबंध
आम्हालाही ऋणी होऊ द्या
तुमचे आभार मनापासून माणून
आम्हालाही कोणि होऊ द्या

मिरवू द्य, मिरवू द्या
आमच्याही कवितेंना मिरवू द्या
आमच्या बावळट मुलांच्या डोईवर
कोणालातरी हात फिरवू द्या

निस्व:र्थ व्हा, निस्व:र्थ व्हा
आमचही घर वसू ध्या
मागच्या बाकावर पडलो आम्ही
कधीतरी पुढे बसू द्या

दान द्या, भिक्षा द्या
प्रतिसाद आम्हाला हकखास द्या
आमच्याही गुदमरत जाणाऱ्या कवितेना
जगवण्यासाठी एक श्वास द्या

घोळ झालाय च्यायला डोक्यात

घोळ झालाय च्यायला डोक्यात खूप घोळ झालाय

ऑफिस मध्ये काय करतो मला माहित नसते
घरामधे बायको काय बोलते मला माहित नसते
कुठल्या दिवशी कुणाचा वाढ़ दिवस असतो वगैरे सोडाच
च्यायला कुठल्या दिवशी माझा वाढ़ दिवस असतो ते पण मला माहित नसते

घोळ झालाय माझ्या डोक्यात खूप .... जाऊ दे

मित्रान्ना फ़ोन करायला मी विसरातो
ऑफिस मध्ये मीटिंग ला जायचे मी विसरतो
मीटिंग रूम्स ची नावे पण भारी "नर्मदा ",सिंधु असते कुठली तर कुठली असते
गोदावरी
कुठली फर्स्ट floor वर अणि कुठली सेकन्ड वर हे पण मी विसरतो

घोळ झालाय माझ्या डोक्यात खूप घोळ झालाय

सॉफ्ट वेअर मध्ये काम करून साली माझी एफ्फिशियंसी पण गेलिये
काहीही वेळेवर आणि चांगलं करायची इच्छा पण मेलिये
फक्त पैसा कमावयाचे मात्र छान जमले आहे
बाकी नितिमत्ता सगळी तेल लावत गेलिये
माझ्या कामाचा जगाला किती उपयोग होतो ते नाही माहित
पण बिल्डर्स अणि दुकान्दारांची मात्र चांदी झालिये
हे सगळं पाहून ....
घोळ झालाय माझ्या डोक्यात .... साला फार घोळ झालाय

एक ना दोन ....हज़ार विचार येतात
flat,गाडी ,नोकरी , लग्न बायको,नातेवाईक , मराठी बाणा,गाणे म्हणा ,पुण्याच्या
ट्रिपा , ट्रेन तिकिट्स ,US ला जायचय ,अजुन छापायचय, वजन वाढलय ते सम्भाळायचय
....
एक ना दोन हज़ार विचार येतात
दिवसाचे २४ तास त्यामुळे कमी पडतात .... काय काय करु ?
घोळ झालाय खरच घोळ झालाय

कधी कधी वाटत मेडिटेशन करावं
डोक्याला थोड़ शांत करुन त्याला ताळ्यावर आणावं
निसर्गाने इतकं डोकं दिलय ते कसं शांत असावं
प्रत्येक गोष्टिचं गणित डोक्यात फीट बसावं
पण मेडिटेशन चा हा विचार लक्षात च रहात नाही
कारण ....
डोक्यात घोळ झालाय ... इतका घोळ झालाय कि अजुन आठवत नाही काय काय घोळ झालाय
घोळ झालाय , डोक्यात , लाइफ मध्ये , इकडे तिकडे सगळीकडे नुस्ता घोळ झालाय