Wednesday, July 25, 2007

राजे

-कमलेश भान्ड्वलकर
मोघलान्नी हिन्दुन्ना
केल होते गुलाम
आपल्या प्रत्येक श्वाशाचा
हाति त्यान्च्या होता लगाम

हिन्दुन्ना नव्हती अब्रु
नव्हता त्यान्ना मान
स्त्रियान्ची नव्हती कदर
लान्घयचे होते पारतन्त्राचे रान

अशातच तुतारीन्च्या आवाजने
अवघे शिवनेरी दुमदुमले
सन १६२६ अक्शय्यत्रुतियेला
राजे प्रुथ्वीवर अवतरले

राजान्ना होती पुर्ण
परिस्थितिची जाण
सशपथ राज्याभिशेक
करुन झाले मराठ्यान्ची शान

गनिमी कावा हेच
त्यान्चे परिपुर्ण अस्त्र
विश्वासाने सन्घटित मावळे
हेच त्यान्चे अस्त्र

शाहिस्तेखानाची कापली बोटे
अफ़झलखानाचा केला अन्त
मोघलशाहिला पुर्ण हलविले
पराक्रम त्यान्चे अनन्त

राजे तुम्ही होता म्हणूनच
आज आहेत मन्दिरान्चे कळस
गळ्यात डोलते मन्गळ्सूत्र
अन्गनी शोभते तुळस

राजे तुम्ही होता म्हणूनच
आज आहे कुन्कु कपाळी
आशीर्वाद आहेत
प्रसन्न आहे माती काळी

राजे तुम्ही होता म्हणूनच
कमरेला आहे करदोरा
हिन्दु आहेत जगाच्या पुढे
चालतोय त्यान्चाच तोरा

राजे तुम्ही होता म्हणूनच
आज आम्ही आहोत
आमचे शत:कोटी प्रणाम
तुमच्या चरणी जावोत

एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला

एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला
तुझ्या नकळत मी तुझ्यावर प्रेम केलं
तुझ्या बरोबर आयुष्यभर राहण्याचं स्वप्न पाहीलं
तुझ्यामुळेच प्रेमाचा खरा अर्थ मला कळला
पण या प्रेमाची जाणीव कशी करुन देऊ तुला


जिथे जिथे पाहतोय तु आणि फ़क्त तुच दिसतेस
नजरेस नजर देता खट्याळ हसतेस
तुझं बरोबर असणं जणू स्वप्न वाटे मला
मला सगळीकडे तुच दिसतेस
पण मग मीच कसा गं दिसत नाही तुला


तु अजाण आहेस माझ्या या प्रेमाने
सांगितल नेहमी मुक्या ईशा-याने
पण तो ईशारा तुला कधीच कसां ना कळला
कधी मी सगळ शब्दात सांगु शकेन का तुला?


एकदा निश्चयच केला होता तुला विसरण्याचा
हजारदा केला प्रयत्न सगळं संपवण्याचा
पण प्रत्येक प्रयत्न माझा, माझ्याच प्रेमापुढे फ़ोल ठरला
जणु हे वेडं मन कधी विसरुच शकत नाही तुला


आता तर फ़क्त एकच स्वप्न आहे या मनाचं
तुज्यासोबत शेवटपर्यंत जगण्याचं
एक दिवस नक्कीच जिंकेल
हा वेडा जीव आज जो या खेळात हरला
एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला

तुलाच शोधतोय!

तुलाच शोधतोय!

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना......
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना... कण-कण मरतांना.......

आयुष्य म्हणजे हेच असत......

....सई(सुप्रिया पाटील)
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
प्रवाहासारखं...येईल त्याला सोबत घेत जाणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
स्व:तची दु:ख विसरून दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
भूतकाळाच्या गोड आठवणीं सोबत वर्तमानात जगणं.......

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
एकटं येऊन गर्दीत जगून पुन्हा एकटं निघून जाणं........

मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
थोडसं रडणं आणि खूपखुप हसणं.......

निर्णय

@मोनिका घरत.
मनात होते कधी एकदा
तुझ्यासवे वाळूत फिरावे
विसरूनी या सार्‍या जगताला
प्रेमगीत हे मिळुनी गावे

आयुष्याच्या एका संध्याकाळी
एक आठवण मनात सलते
अधुरे राहीले स्वप्न माझे
जुळले नाही अपुले नाते

विनंती एकच विसरूनी जा हे
तुझ्या परीने उणी आहे मी
सुखी रहा तू सार्‍या जन्मी
तव मार्गातुन दूर उभी मी

धागा द्या धागा द्या

ही कविता मी कोणालाही उद्धेशून लिहीलेली नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका.
हवं तर ह्या कवितेचा संबंध माझ्याशी जोडा.
@सनिल पांगे

धागा द्या धागा द्या (धागा = THREAD, -- इति ओर्कुत)
आम्हालाही थोडा धागा द्या
आमच्या शब्दांनाही इथे
व्यासपीटावर जागा द्या

धागा द्या धागा द्या
प्रेत्येकाचं मन म्हणतं
तुमचं नाणं सोन्याचं असलं
तरी आमचं पितळेचंही खणंखणंतं

येऊ द्या येऊ द्या
आम्हालाही पुढे येऊ द्या
चढाओढीच्या खेळा मध्ये
आम्हालाही भाग घेऊ द्या (चढा-ओढ - माझाही वाटा मोठा आहे)

जिंकू द्या, जिंकू द्या
आम्हालाही मन जिंकू द्या
आमच्या शब्दांनाही थोडाबहूत
कवितेत प्राण फुंकू द्या

ऋणानूबंध, ऋणानूबंध
आम्हालाही ऋणी होऊ द्या
तुमचे आभार मनापासून माणून
आम्हालाही कोणि होऊ द्या

मिरवू द्य, मिरवू द्या
आमच्याही कवितेंना मिरवू द्या
आमच्या बावळट मुलांच्या डोईवर
कोणालातरी हात फिरवू द्या

निस्व:र्थ व्हा, निस्व:र्थ व्हा
आमचही घर वसू ध्या
मागच्या बाकावर पडलो आम्ही
कधीतरी पुढे बसू द्या

दान द्या, भिक्षा द्या
प्रतिसाद आम्हाला हकखास द्या
आमच्याही गुदमरत जाणाऱ्या कवितेना
जगवण्यासाठी एक श्वास द्या

मज आजहि उमगेना

मज आजहि उमगेना
प्रिये,सान्ग सखे कुठे चुकलो समजेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

मज जीवनास अर्थ दिलास खरा
तुच तु होतिस जिवनी चैतन्यचा झर
हा झरा आटतना मज आज पहावेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

तुझीच वाट पाहिली चातकासम
आज हा कसा पसरी जीवनतम?
मज चातका ह्या दुश्काळी अता रहवेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

मज जीवनी प्रवेश केलास गुपचुप
कसे सहावे नियतीचे हे क्रुर रुप
तुझ्यविन जिवन आता जगवेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

जिथे असशी रहा मान्गल्य सुखाने
कधी स्पर्श न करावा जीवनी दु:खाने
पण तुझ्यविन मज माझे अस्तित्वच जाणवेना
तुज का मुकलो मज आजहि उमगेना

हे मुंबईकर

ही मी निघाले माझ्या रस्त्यावर
रोजचीच वाट, रोजचेच धावणे
रोजचीच गर्दी, रोजचेच पाहुणे
माझ्यामागे त्यांचे रोजचेच धावणे

मुंबापुरी माझ्याबरोबर झोपते उठते
माझ्यासोबतच दिवस जगते
माझ्या प्रत्येक फेरीबरोबर
त्यांचे जीवन वेग धरते

झुकझुक माझ्या श्वासाबरोबर
त्यांचे जीवन ताल धरते
कधी संगीत तर कधी विसंगत
सुरावटीत ते ऐकु येते

प्रत्येक प्रवासी हितगुज करतो
सुखदुखांची रास उधळतो
माझ्यासोबत मनास मने
जुळवण्याचे तो प्रयत्न करतो

मी नेहमीच धावते
उनपावसाची कशास तमा
हेच मझे सांगणे तुम्हासी
जीवनगाणे गात रहा

(सगळे व्यवस्थित चालले होते...
पण नजर लागली कोणाची...?
तारीखः ११ जुलै २००५)

ते नरधम माझ्या जीवावर उठले
चढले ते शस्त्रास्त्रांनी स्फोटक सोडुन गेले
मोठ्या धमाक्याने तेव्हा माझे अंग चिरटले
आणि माझ्या साथिदारांच्या जिवाचे कत्तल केले

एक धमाका एक स्फोट
किती जिवांची कत्तल
तो आक्रोश ती धावपळ
जगण्याची ती धडपड

ती शरीराची लक्तरे,
ते लटकलेले हात,
ते रक्ताचे थारोळे,
निर्दयांनी केला घात

ती पिळवटलेली नजर,
विचारते 'मीच का?'
पाहणार्याच्या नजरेलाही
असह्य होतो धक्का

पहा पहा त्या बाळाचा आक्रोश
निर्जीव आईच्या कुशीत
सहज गेला नसेल जीव तिचा
त्याच्या भविष्याच्या विचारत

मग दिसतात सरसावलेले
तत्पर मदतीचे हात
घायाळांना दिलासा देणारे
ते देवाचे अवतार

वर्षे उलटली काळही सरला
मागे व्रणही ठेवुन गेला
निर्दयतेच्या क्रुर प्रसंगी
जीवनात घाव सोडुन गेला

खचले तेव्हा मी ,म्हणाले आता माझे कोणी नाही
मझ्याबरोबर राहुन जीव गमावेल कोणी

परंतु..

माझे नमन तुझ्या चरणी
हे मुंबईकर,
तुझ्या धाडसाला माझा सलाम,
ठेंगा दाखवुन दहशतवाद्यांना,
तु सुरु केलेस आपले काम

पाउस असा हा झरतो

पाउस असा हा झरतो
पानांतुन गाणी गातो
नभ घेवुनी उशाशी
मोत्यांची स्वप्ने देतो

ओल्या मनात माझ्या
दडुनी खुशाल बसतो
रोमांच होवुनी वा
हातावरी उमटतो

थेंबात ये रुपेरी
घेई खुशाल झोके
मातीतुनी उगवती
त्याची अनंत रुपे

पाउस आसमंती
पाउस अंतरात
पाउस होवुनी मी
माझ्या मनी त्रुषार्त

माझे स्वप्नं माला हसतात.

माझे स्वप्नं माला हसतात.
मी त्याला भेटते आणि सर्वस्वं विसरुन जाते,
जशी वैशाखात ही धरा बहरुन येते.

तो बोलायला सुरुवात करतो,
आणि मी फ़क्तं त्याच्याकडे बघते,

मग प्रत्येक श्वसात,उदांत,
डोळ्यात त्याला सठवते.

थोड्या वेळानी,तो ही एकदा,
प्रेमाने नजर फ़िरवतो.

माझा हाथ,प्रेमाने
त्याच्या हथात घेतो.

मी पण माझं मन माझ्या
हाथात ठेउन त्याला देते,

आणि त्या क्शणी मनाला,
असलेली त्याची हुर हुर जणवते.

बराच वेळ असाच निघुन जातो,
एकमेकांच्या डोळ्यन्नी अवघं विश्वं फ़िरुन येतो.

मग वर्याच्या हळुवार वेगात मी त्याच्या कुशित शिरते,
आणि परत एक्दा स्वत:ला मी त्याच्या अधीन करते.

त्याच्या श्वसाचा सुगन्धं,मी कधिच माझा केलेला असतो,
आणि एकमेकांच्या प्रेमात आम्हि स्वत:ला विसरुन जातो.

अचानक सगळं सुन्दर दिसयला लगतं,
वारा काहीतरी कानात गुणगुणतो,

मग वतवरण उगाच बदलतं,
आकाशात काळे ढ्ग जमुन येतात,
सोबत पवसांच्या सरी घेउन येतात.

वीज चमकते,मी त्यच्या कुशीत शिरते,
आवाज होतो ढ्गांचा,मी मिट्लेले डोळे खाडकन उघडते.

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते............

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
मन चांदण्यात न्हावुन निघते
आशेच्या पावासाळी सरीने
डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते
माझ्या मनातल्या कोरया कॅनवास वर
तुझं चित्र मग आपोआपच उमटते

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
जणु श्रावणातली पहीली सर बरसते
तुझ्या आठवणींच्या सरीने
कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला
मग नवी पालवी फ़ुटते
रात्रीच्या गर्द काळोखी आभाळातली
शांत चांदणी जणु पुन्हा चमकते
माझी नजर मग
त्या चांदण्यातही तुलाच शोधिते

कधी कधी तर वाटते की जाऊदे
तु नाही तर तुझी आठवण तरी येते
कमीत कमी माझं उदास मन थोडंतरी हसते

भावना मनाच्या कोणा न कळल्या .............

शब्द बांधील ती प्रेम गुपिते
मी मुद्दामच नव्हती खोलली
उगवत्या मनाच्या स्वप्नांची
जणु ईच्छाच होती मावळली

तुझ्या आठवणीत तेव्हा
प्रत्येक रात्र मी जागवली
तुझ्या बरोबरच्या प्रत्येक
क्षणाला न विसरण्याची शपथ मी दिली

अविस्मरणीय त्या क्षणात आता
असहनीयशी वेदनाच फ़क्त ऊरली
त्या वेदनेची लहर मनाच्या
अंतरी खोलवर पोहोचली

आनंदाच्या गावची वेस जणू
आता खुप मागे राहीली
वाटतय ती भाग्यलक्ष्मी जणु
माझ्यावर कायमचीच रागवली

सहन मी एकट्यानेच केलं
तुझी सोबत जरी नसली
मन बिचांर एकटच जळांल
तुझी आठवण जेव्हा जेव्हा पेटुन उठली

एकतरी प्रेम कविता-हास्य कविता

एकतरी प्रेम कविता म्हटल करावी
दोन-एक सिनेमे पाहिले की जमावी
अलगद शब्द जुळवुनी ती घडावी
'ह' यात काय अवघड लेखणी म्हणाली

मग 'मुघले आझम'ची पारायणे केली
रटाळ'गणिते'सोडुन प्रेमकोडीन्ची सवय लावली
त्या कमिटेड मैत्रिणीची रोज आस्थेने विचारपुस केली
'ह' यात काय अवघड लेखणी म्हणाली

बागेत संध्याकाळी हटकुन राणीला खेळायला न्यायची
प्रेमभंगात बुडालेल्या मित्राची चोरुन डायरी
वाचायची
आर्चिजच्या दुकानात घुसल्यावर'तीच' पाहयची
'ह' यात काय अवघड लेखणी म्हणाली

दिवसामागुन दिवस ,महिन्या मागुन महिने
शब्द काही सापडेना ना जमेना.
.
.
कसे जमणार?प्रीत जणु निस्वार्थ 'त्याग'
एकाच प्रेमकवितेसाठी 'स्वार्थी'मला हे उमगेना
.
.
मंडळी
म्हणुन मी'ताज'ला व्होट देऊन मी मोकळी झाले
@भक्ती

एखादा पावसाळा............!!!!!!!!

पाऊस म्हणजे काय?
तर शरीराबरोबर मनालाही चिंब भिजावणारा,
जतन केलेल्या आठवणी अलगदपणे उलगडायला लावणारा.

मित्र-मैत्रीणिंबरोबर पाण्यात सोडलेल्या होड्या,
आणि ऐन वयात आल्यावर पावसात भिजून काढलेल्या खोड्या,
सगळ काही नजरेसमोर अचानक नाचू लागत,
अगदी कालच घडल्यासारख ते वाटू लागत.

पावसात भिजल्या नंतर मनाचा कोपर्‍यात दाडपूण टाकलेल्या गोष्टीही आठवू लागतात,
आणि त्याही मग नकळत चेहरयवर एक हसू आणतात,
ती पावसात भिजलेली आठवनही आपल्याला हविहवीशी वाटते,
लोकात नकार देउन सुद्धा आपल्या मनात तीच आठवं दाटते.

नेहमी चिक-चिक करणारा पाऊस ही आपल्याला सुखाऊ लागतो,
अशी भेट रोजच होईल का? आपण मनालच विचारू लागतो,
असे तर अनेक पावसाले येतात आयुष्यात,
पण काही पावसाले मनात घर करून राहतात.

भरपूर वेगळ घडत आयुष्यात,
पण या आठवणी नेहमी सारख्याच वागतात,
म्हणूनच सांगते मित्रांनो,
एखादा असा पावसाळा पुढचे अनेक पावसाळे काढायला पुरेसा असतो,
कारण तो पावसाळा मनाच्या कप्प्यात जपलेला असतो,
अगदी आयुष्यभारासाठी

क्रोधाग्नी..एक चटका

टिप : एका सत्यघटनेवर आधारीत......
-------------------------------------

उत्तरप्रहर, मी गाढ झोपेत,
अपरात्री फ़ोनची घंटा खणखणली
बाहेरगावच्या मैत्रीणीचा नंबर
पाहून मनात शंकेची पाल चुकचकली
"अत्यंत तातडीची मदत हवीय,
ताबडतोब निघ" तिनं आज्ञा सोडली

"सुमी, परवा रात्री न सांगताच
कूणाचा तरी हात धरून पळून गेली
विधात्याचा लेख बघ, दुर्दैवाने
तिथेही तिची पाठ नाही रे सोडली
अपघातात त्याच्यासकट बाकीची
जागीच ठार,ती गंभीर जखमी झाली
तीने घडलेली सारी हकीकत
एका श्वासात न थांबता सांगून टाकली

"माझ्या कडून काय मदत हवी आहे"
अनपेक्षीत धक्का पचवित मी विचारणा केली
तिला मदत करावी, सार्‍यांची मी किती
गयावया केली, कुणीच भीक नाही घातली
वाटलं तू काहीतरी करशील म्हणून
अपरात्री तुला साद, ती पार रडवेली झाली

प्रत्येकाच्या डोळ्यात अंगार,आप्त
नातेवाईक मंडळी कोंडाळी करुन बसलेली
घाव अगदी ताजा, नुकता काल-परवाचा
झाडून सारी जणूकाही सुडाग्नीने पेटलेली
"जखमी प्राण्याला पण आपण मदत
करतो, हे तुमचं रक्त" मी समजुत काढली

"मदत करण्याचा विषय सोडून बोल"
बापाने करारीपणे आपली भूमिका स्पष्ट केली
"परवा तिचं श्राद्ध होतं, ती आम्हाला मेली
ज्या दिवशी तिने घराची लक्ष्मणरेषा ओलांडली
पोरीने केलेला विश्वासघात आठवून, बापाने
बहूदा मनातल्या मनात जोरदार शीवी हासडली

पाहून सार्‍यांचा एकंदर रागरंग, खवळलेल्या
समुद्रात नौका घालण्याची कल्पना, मी टाळली
"या घडीला गरज तिची, नंतर करायचं
काय तिचं, निवड तुमची" मी विनवणी केली
आणि म्हणालो,"तिला वाचवू शकला असता
तुम्हाला उपरती नाही झाली म्हणजे मिळवली

कुठलंस फ़ुटकळ इस्पितळ, तोच तो
चिरपरिचित विचित्र औषधी गंध, अंधारी खोली
शरीरावर असंख्य जखमा, जुन्यापुराण्या
खाटेवर मुटकुळं करुन ती निपचित पडलेली
माझी हलकेच थाप, तीची गाढ निद्रा भंग
पावली, मला पाहून तिला थोडी हुशारी आली

"माझ्याकरीता फ़ुलं नाही आणलीस?"
ती करुण चेहेर्‍यावर मिश्किली आणत म्हणाली
"अग वेळच नाही मिळाला गडबडीत,
लगेच आणू का?" मी उगाच सारवासारव केली
"चल सोड रे, तुला माझ्या पार्थिवावर
वहायला उपयोगी पडतील" ती कसंनुसं हसली

तुलाच शोधतोय!

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना......
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना... कण-कण मरतांना.......

तुझांच????

गजर नामाचा

श्रीधर तिच्या ह्यांचे नाव
नामाने होते सकाळ
उठता बसता घेते नाम
सदान कदाहाती माळ
गजर सदा नामाचा
श्रीधर उठ्तोस ना
श्रीधर अरे उठलास का
श्रीधर किती वाजले बघ जरा
श्रीधर उशिर होईल ऑफिसला
श्रीधर चहा ठेवलाय
श्रीधर
श्रीधर पुन्हा उठवणार नाही हं
श्रीधर काय करु ब्रेकफ्हस्ट्ला
कॉन्फ्लेक्स चालेल की
ऑमलेट हव लवकर सांग हां
देवा चटका बसला मला
श्रीधर जरा ब्र्नॉल शोध ना जरा
श्रीधर एकतोयस का
श्रीधर
अरे श्रीधर
पाणी सोडलय अंघोळीला जा
मग माझ्या करता हि बादली लाव
श्रीधर चीनुला उठवतोस का
श्रीधर कुठे जाणार आहेस आज
डबा भरुना
श्रीधर चिनुचा होमव्र्क कुठे गेला
इथेच होता काल
चल बेटा उशिर होईल आपल्याला
बेटा बाप्प्ला नमस्कार कर
आणि पापा दे बाबाला
बाबाला लवकर ये सांग
श्रीधर निघतो रे आता
फोन करेन जमेल तेव्हा
ओट्यावर डबा ठेवलाय
श्रीधर
अरे सुट्टे अस्तिल तर देना
देवळात जाईन जाताना

अनामिक भट्कंती

रात्रिच्या निरव शांततेत
एखादा तरंग उठावा
आणि उलथा-पालथ होऊन
सगळ शांत निश्चल व्हाव तसच काहितरी हे

तिच आणि त्याच भांडण झालेल
चांगलच जोरदार
तिच माहेर आणि सासर
दोघांचाही उध्दार होण्याइतपत

आणि आता सर्वत्र
अबोल्याच राज्य...

सकाळ व्हावी
तिही भांडी आपटण्याच्या आवाजाने
त्यानेही द्यावे उत्तर
मग आपटण्याऱ्या दरवाज्याने...

नाश्ता व्हावा
पण अळणी लागावा
आणि चहा मात्र कपातच रहावा

दुपार तर झालीये
पण आज तो इकडे एकटाच
आणि तिही तिकडे

मागुन थोडीशी कुजबुज
आणि मन चाहुल घेण्यात दंग...

समोरच्या होटेलातली
नेहमीची जागा आज कोणीतरी
दुसऱ्याच जोडीने बळकावलेली

आणि मनात आठवणींनी
उडवलेली गर्दी
तिकडे तो
आणि इकडे ती....

कस बस काम उरकुन
दोघही घरी निघालेले
आताशा राग जरा गेलेला...

त्याने मग नाईट शो
बुक केलेला..
तिनेही पूल साईड टेबल
रीझर्व्हड केलेला..

कालच भांडण आताशा
हरवलेल...पण
त्याने येउन मनवाव
म्हणुन तिच मन रुसलेल...नाटकीच

त्याने येउन सांगावा बेत
अन तिने तिचा...

जुनच भांडण पुन्हा नव्याने सुरु व्हाव...
भांडता भांडता त्याने म्हणाव
रागवलीस ना की खुपच सुंदर दिसतेस

तिनेही मग लाजुन त्याच्या मिठीत शिराव
अन मग रात्रभर त्यांनी
चांदण्याच्याच संगतीत घालवावी...रुपेरी चांदणे मिठीत भरत ....

'काटा' अन 'मी'

फुलांच्या बागेत आज काटा बोलला,
नेहमीच्या भाषेत मी त्याला हाकलला,

आज एक फुल नाही मिळाले वाट्याला,
मग म्हंटले आता विचारुच या काट्याला

तो मलुल होता पण तरीही सांगु लागला,
"मित्रा, मी रक्षक होतो त्या फुलासाठी,
पण आज डोळ्यासमोर हारलो रे!"
मी म्हंटले, "नवीन काय रे यामध्ये??
रोज तर सगळेच असेच फुल खुडतात"..
तो म्हणाला, "अरे त्या त्या फुलात,
माझा जीव गुंतलाय ना!"
मी म्हंटले, "अरे वेड्या हा तर निव्वळ मुर्खपणा!!"

तो भडकला अन म्हणाला,
"अरे आईबापही रक्षक असतात ना,
त्यांना ही तर काटाच ठरवितात ना कधीतरी!!
मग त्यांनी त्यांनी आपल्या फुलास जीव नाही का लावायचा??

ते जाउदे असं बघ,

तुही तर असशील ना कुणासाठी 'काटा',
(कारण तुही रक्षक आहेस कुणाचा!!)

कोणीतरी तुझ्यासाठी ही असेल 'काटा'
(तुलाही कोणीतरी हवे आहेच ना!!)

तुही 'फुल' असशील ना कुणासाठी,
(तुझ्यावर जीव लावणारे आठव!!)

कोणीतरी 'फुल' असेल ना तुझ्यासाठी,
(तुझा जीव कुणासाठी तरी तुटतो ना!!)

आणि हो,

कधीतरी एक 'काटा' दुसर्‍या 'काट्याला'
भारी पडतोच रे!!"

एवढं ऐकुन जड पावलाने बागेतुन
बाहेर पडत होतो अन तेवढ्यात पायात एक
काटा रुतला...

अन या वेळी मात्र मी 'काटा' अलगद उचलला अन
हृदयापाशी बाळगला..

अन मग दोन काटे, दोन फुलं,
उरल्या फुलांकडे, उरल्या काट्यांकडे
परतु लागले.......

आधुनिक....."चांदोमामा चांदोमामा भागलास का?...... "

चांदोमामाचे नवे गाणे एका माझ्या गीता नावाच्या मत्रिनिने संगितले.....कोणी
बनवले माहीत नाही.....
पण मला जाम आवडले म्हणून पोस्ट करत आहे....ज्याने बनवले त्याची मान्यता
मिळाली असे समजून.......

चांदोमामा चांदोमामा भागलास का?
बिल्डिंगच्या मागे जाऊन लपलास का?

बिल्डींग ही आहे सात माजली....
मामाचा वाडा पाडून बांधली.....

बिल्डींगमधे मामाच्या येऊन जा...
पाव भाजी खाऊन जा...

पाव भाजीत पडली माशी...
चांदोमामा राहिला उपाशी.....

मी "थांब" म्हणालो त्याला

मी "थांब" म्हणालो त्याला
आवाज माझा ऐकताच
तो जागच्या जागीच थांबला

क्षणभर माझं भानंच हरपलं
पाहुन त्याच्या चालण्याला
सुख-दुख:, नाती गोती सगळ्यांच्या
ओझ्याने तो पार थकलेला
तेव्हा पाहुन त्याच्या थकव्याला
आवाज मी त्याला दिलेला...........

पण..... नंतर
विचार मनात आला
थांबुनतरी मिटेल का सगळा थकवा त्याचा ?
चालत राहणं हा धर्म आहे "जीवनाचा"
म्हणुन मग थांबवण्यापेक्षा
चालण्यास थोडा उत्साह देऊया त्याला

पण....... हे आधी उमगलंच नव्हत मला
म्हणून
मी "थांब" म्हणालेलो त्याला
आवाज माझा ऐकुन
तो जागीच थांबलेला.....................

एक ’ भेट ’ काय टळली..

- स्वप्ना

पहायचे होते मला..
तुझ्या डोळ्यांत , माझे प्रतिबिंब..
पहायचे राहून गेले..

ऐकायचे होते मला..
तुझ्या आवाजात , माझे नाव..
ऐकायचे राहून गेले..

अनुभवायचे होते मला..
तुझ्या श्वासांत , माझे श्वास..
अनुभवायचे राहून गेले..

तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे....राहून गेले....

भेटीचे तर होते................फक्त बहाणे ,
मजसाठी तर झाले असते ते , ' जगणे '..

तुझ्या डोळ्यांच्या तेजात ,
उजळले असते लक्ष दीप , माझ्या नेत्रांत
जे तेवत राहिले असते , उदास अंधा-या रस्त्यांत..

तुझ्या श्वासांच्या सुगंधात ,
फुलले असते संजीवन प्राण , माझ्या श्वासांत
जे भरत राहिले असते जीवन , श्वास रोखणा-या क्षणांत..

तुझ्या आवाजाच्या मारव्यात ,
गुंजले असते मधुर गीत , माझ्या आत्म्यात
जे देत राहिले असते साद , भग्न एकाकी आयुष्यात..

पण, पण....

एक ' भेट ' काय टळली..
अन ' जगायचे ' राहून गेले..

' तुझ्याबरोबर ' जगायचे राहून गेले..

Tuesday, July 17, 2007

मी जिंकलो आणि ती हरली...

-सचिन काकडे [जुलै १६,२००७]
मी जिंकुनही हरलो ती हरुनही जिंकली
तीची प्रत्येक अदा माझ्या वेड्या मना भावली
मला खुप गर्व होता माझ्या प्रेमावर
आता फ़क्त हसुन पाहतोय त्या गर्वाच्या राखेवर

प्रेम करणं कुठे जमलं मला
सांगुच नाही शकलो कधी मनातलं तिला
पण न बोलताच ती बरंच काही बोलुन गेली
"कधी कुणावर प्रेमं नको करुस" हे मात्र सांगुन गेली

जाताना तीने माझ्याकडे तीची आठवण मात्र गहाण ठेवली
जगण्याची तेव्हा ईच्छाच नव्ह्ती उरली
तिच्या त्या आठवणींना शब्दांनी आसु, एकटेपणाने साथ दिली

पण त्याचवेळी ही कविता मला भेटली
"एक गेली तर दुसरी येतेच"
ही म्हण आज जणु पुन्हा सार्थ ठरली
तिच ती शब्दसुदंरी मला खूप आवडली
मैत्रीचा हात पुढे करता तिने लगेच मैत्री स्वीकारली

ति गेल्यावर मी अंधारातच भटकत होतो पण
हिने माझ्या आयुष्याची विझली वाट पुन्हा पेटवली

ती मला दुख:त खोलवर बुडवुन गेली
पण आज हीने मात्र
मला त्या डोहातही आनंदाने पोहण्याची कला शिकवीली
या कवितेने मला जगण्याची ही नवी भाषा शिकवीली

आज असं वाटलं की
मीच खरंच जिंकलोय आणि ती हरली
कारण दु:खाबरोबर चालताना
सुखाची वाट मी या कवितेसोबत शोधली.........

धागा द्या धागा द्या

-सनिल पांगे
धागा द्या धागा द्या (धागा = THREAD, -- इति ओर्कुत)
आम्हालाही थोडा धागा द्या
आमच्या शब्दांनाही इथे
व्यासपीटावर जागा द्या

धागा द्या धागा द्या
प्रेत्येकाचं मन म्हणतं
तुमचं नाणं सोन्याचं असलं
तरी आमचं पितळेचंही खणंखणंतं

येऊ द्या येऊ द्या
आम्हालाही पुढे येऊ द्या
चढाओढीच्या खेळा मध्ये
आम्हालाही भाग घेऊ द्या (चढा-ओढ - माझाही वाटा मोठा आहे)

जिंकू द्या, जिंकू द्या
आम्हालाही मन जिंकू द्या
आमच्या शब्दांनाही थोडाबहूत
कवितेत प्राण फुंकू द्या

ऋणानूबंध, ऋणानूबंध
आम्हालाही ऋणी होऊ द्या
तुमचे आभार मनापासून माणून
आम्हालाही कोणि होऊ द्या

मिरवू द्य, मिरवू द्या
आमच्याही कवितेंना मिरवू द्या
आमच्या बावळट मुलांच्या डोईवर
कोणालातरी हात फिरवू द्या

निस्व:र्थ व्हा, निस्व:र्थ व्हा
आमचही घर वसू ध्या
मागच्या बाकावर पडलो आम्ही
कधीतरी पुढे बसू द्या

दान द्या, भिक्षा द्या
प्रतिसाद आम्हाला हकखास द्या
आमच्याही गुदमरत जाणाऱ्या कवितेना
जगवण्यासाठी एक श्वास द्या

घोळ झालाय च्यायला डोक्यात

घोळ झालाय च्यायला डोक्यात खूप घोळ झालाय

ऑफिस मध्ये काय करतो मला माहित नसते
घरामधे बायको काय बोलते मला माहित नसते
कुठल्या दिवशी कुणाचा वाढ़ दिवस असतो वगैरे सोडाच
च्यायला कुठल्या दिवशी माझा वाढ़ दिवस असतो ते पण मला माहित नसते

घोळ झालाय माझ्या डोक्यात खूप .... जाऊ दे

मित्रान्ना फ़ोन करायला मी विसरातो
ऑफिस मध्ये मीटिंग ला जायचे मी विसरतो
मीटिंग रूम्स ची नावे पण भारी "नर्मदा ",सिंधु असते कुठली तर कुठली असते
गोदावरी
कुठली फर्स्ट floor वर अणि कुठली सेकन्ड वर हे पण मी विसरतो

घोळ झालाय माझ्या डोक्यात खूप घोळ झालाय

सॉफ्ट वेअर मध्ये काम करून साली माझी एफ्फिशियंसी पण गेलिये
काहीही वेळेवर आणि चांगलं करायची इच्छा पण मेलिये
फक्त पैसा कमावयाचे मात्र छान जमले आहे
बाकी नितिमत्ता सगळी तेल लावत गेलिये
माझ्या कामाचा जगाला किती उपयोग होतो ते नाही माहित
पण बिल्डर्स अणि दुकान्दारांची मात्र चांदी झालिये
हे सगळं पाहून ....
घोळ झालाय माझ्या डोक्यात .... साला फार घोळ झालाय

एक ना दोन ....हज़ार विचार येतात
flat,गाडी ,नोकरी , लग्न बायको,नातेवाईक , मराठी बाणा,गाणे म्हणा ,पुण्याच्या
ट्रिपा , ट्रेन तिकिट्स ,US ला जायचय ,अजुन छापायचय, वजन वाढलय ते सम्भाळायचय
....
एक ना दोन हज़ार विचार येतात
दिवसाचे २४ तास त्यामुळे कमी पडतात .... काय काय करु ?
घोळ झालाय खरच घोळ झालाय

कधी कधी वाटत मेडिटेशन करावं
डोक्याला थोड़ शांत करुन त्याला ताळ्यावर आणावं
निसर्गाने इतकं डोकं दिलय ते कसं शांत असावं
प्रत्येक गोष्टिचं गणित डोक्यात फीट बसावं
पण मेडिटेशन चा हा विचार लक्षात च रहात नाही
कारण ....
डोक्यात घोळ झालाय ... इतका घोळ झालाय कि अजुन आठवत नाही काय काय घोळ झालाय
घोळ झालाय , डोक्यात , लाइफ मध्ये , इकडे तिकडे सगळीकडे नुस्ता घोळ झालाय

Friday, July 13, 2007

पावसाची रात्र नशीली

पावसाची रात्र नशीली ...
आणि हवास तू जवळी
धुंद व्हावे तन मन आपुले ...
रिमझिम सरींच्या तालावरी

बेहोश व्हावे भिजूनी चिंब ...
भान नसावे दोघांनाही
अलगद ओठांनी टिपावेस तू ,
थेंब माझ्या गालावरी

मिळता नजरेस नजर...
ओठ थोडे थरथरावे ,
हात घेऊनी हातामध्ये,
सारे जग विसरावे ...

रेशमी स्पर्शाने तुझ्या ...
अंगअंग मोहरूनी यावे,
होऊनी रोमांचित दोघांनी,
बाहूपाशात हरवावे ...

तुझ्या ऊबदार मिठीतली ...
रात्र कधीच उलटू नये ,
विरहाचं ऊन पसरवणारी ...
अशी सकाळ कधी येऊच नये !!!!!!!

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते

या आठवणिला तरी काही कळते
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप्रमाणे गळते
तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते

तुला विसरायच॑ आहे

झाड म्हणाल॑ मला सावलीत बसायच॑ आहे
आकाश म्हणाल॑ मला गवसणी घालायची आहे
धरणी म्हणाली मला आराम करायचा आहे
सूर्य म्हणाला मला ऊन्हात बसायच॑ आहे
च॑द्र म्हणाला मला आमावस्या पहायची आहे
समुद्र म्हणाला मला तळ्यात मासे पकडायचे आहेत
तारा म्हणाला मला उल्का पडताऩा पहायची आहे
आणि तु म्हणालास.....
मला तुला विसरायच॑ आहे

त्या दिवसांनी

त्या दिवसांनी शिकवलयं
तुझ्याशिवाय नाही जगू शकत
त्या दिवसांनी शिकवलयं
तुझ्याशिवाय नाही मरू शकत
त्या दिवसांनी जाणलयं
तुझा आधार काय आहे
त्या दिवसांनी पाहिलयं
तुझ्यासाठी वेड कोण आहे
त्या दिवसांनी अनुभवलयं
वाट पाहणं काय असतं
त्या दिवसांनी दाखवलयं
कुठल्या जगात वावरायचं असतं
त्या दिवसांनी ओळखलयं
तुझ्यावर किती प्रेम आहे
त्या दिवसांनी सांगितलयं
आम्ही सरू तुमचा विरह संपवण्यासाठी

ते बघ सुख येतयं

देवानं आपल्याला का पाठवलं?
थोडसं सुख वाटावं असचं त्याला वाटलं
दुःख तर येणारचं ते आपण गोळा केलं
तुझ्यावर मैत्री रुसली
माझं तर प्रेमच हरवलं
पण सुख वाटायचं मी का थांबवलं?
तु सुख वाटलस पण दुःख घ्यायचं राहीलं
तु त्या दडलेल्या अश्रुंना वाटेतच का नाही सोडलं?
अरे आनंदाला तु सगळीकडे पाहिलं
पण त्याला आपण भेटायचं राहीलं
त्या अश्रुंना लपवू नकोस
त्यांना वाहू दे
ते बघ सुख येतयं
त्याला विसावू दे.......

तुलाही हीच स्थिती असेल का जाणवत?
हे जग विसरले मी तुला पाहत
मी झाले तुझी हळूच नजर वळवत
तुही तरंग उठवलेस नजरेला नजर मिळवत
अन् माझ्या विश्वात आलास तू नकळत
भान हरपले माझे तुला ह्रदयी साठवत
अचानक शब्द ओठांवर घाबरत
त्या शब्दांनी सांगितली एका भिंतीची तफावत
तरीही नजरेने ठेवल्या भावना तुझ्याशी जुळवत
कधी कधी पेटून उठलेल्या शंका मला अडवत
पण तुझ्या हास्याने ठेवले ते वारे वाहत
नेहमी शब्दांपेक्शा नजरा कायम बोलत
तू नसल्यावर तुझ्या आठवणी भिजवत
तुला पाहण्यासाठी हा जीव राही तळमळत
असंख्य विचार माझ्या मनात धावत
तुलाही हीच स्थिती असेल का जाणवत?
असे अनेक प्रश्न मला सतावत
अजुनि जगत आहे त्या प्रश्नांची उत्तरे शोधत?

धीर कर जरा
सांगू की नको करत दिवस जात आहेत
बोलून ज्या गोष्टी समजत नाहीत
नजरेतून त्या समजत आहेत
एवढा संयम का ते कधी कळणार?
मनातलं मनात राहतयं
ते ओठावर कधी येणार?
नजरेचा अर्थ कळलेला दिसतोय बरा!
मनात काय आहे
ते सांगायचा धीर कर जरा?

आठवण

आठवण असते फ़ुलासारखी
मनाच्या फ़ादींवर सजवायची
नाही फ़ुलदाणीत खोवायची
आठवण असते ढगासारखी
मनाच्या आकाशात झुलवायची
नाही वीज काढायची
आठवण असते वेलीसारखी
मनाच्या आधाराला लावायची
नाही आधाराला द्यायची
आठवण असते उन्हासारखी
मनःसूर्याकडून घ्यायची
नाही चद्रांला द्यायची
आठवण असते अश्रुसारखी
गालांवर ओघलायची
नाही डोळ्यात दडवायची

प्रत्येक क्शणात काहीतरी दडलय॑

प्रत्येक क्शणात काहीतरी दडलय॑
पावसातल॑ ऊन आणि ऊन्हातला पाऊस
आणि प्रत्येक ढगात हरवलेला किरण
क्शण जॊ प्रतिक्शणा॑मध्ये विभागला आहे

जणू पावसाचा थे॑ब
ऊन्हाचा किरण
आणि ढगातली वीज
प्रत्येक क्शणात काहीतरी दडलय॑

अश्रु॑चा खारटपणा
हास्याची मिठास
आणि डोळ्यातली चमक
क्शणात बदलणा-या या भावना

सुखासठी धडपडण॑
दुःखाशी झगडण॑
आठवणीतल्या सुन्दर आणि अस॑ख्य क्शणा॑बरॊबर जगण॑

जगलेल्या अस॑ख्य क्शणा॑चा हिशेब मागणारा मृत्यू
येणा-या क्शणा॑ची चाहूल दॆणारा जन्म
आणि या जगण्यामरण्यात हि॑दकळणारा जीव

एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे............
एक प्रेयसी पाहिजे............

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन् मलाही तिच्यासोबत भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरणमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधलत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बहुपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसनरी;
पण मानाने मात्र, अप्रतिम सुंदर दिसणारी,

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नात्याला हळुवारपणे जपणारी,

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जनणारी;
मे जसा आहे तसेच माझ्यावर प्रेम करणारी,

एक प्रेयसी पाहिजे, प्रेमाला प्रेम समझणारी;
सुखा- दु:खात माझ्या तन्मयतेने साथ देणारी,

एक प्रेयसी पाहिजे,........ मिळेल का अशी???????

म्हणून या आठवणींचे अस्तित्वच नाकारीन म्हणतो.......

कधिकाळी जुळलेल्या स्वप्नातल्या गाठीभेठी
आज आठवणी होऊन सामोर्‍या आल्या
थोडेसे पाणी या कोरडया डोळयात
पण बराचसा आधार मनात देऊन गेल्या

आज त्यांना मी काहीच नं बोलता जाऊ दिले
मनातं नसतानाही ओघळणारे अश्रू पाहू दिले
आता मात्र चित्र माझ्या जीवनाचे आज पुन्हा एकदा सजवतो
आणि साज म्हणून या आठवणींनाच रंगं बनवीन म्हणतो

आठवतात ते दिवस अगदी कालच घड्ल्यासारखे
दोघचं घडवत होतो शिल्प स्वप्नांचे जणू जिवंत असल्यासारखे
स्वप्नांच्या छायेत आज पुन्हा एकदा विसावतो
आणि शीतल म्हणून या आठवणींनाच सावली बनवीन म्हणतो

देहभांन विसरायचे ते दिवस होते पावसाचे
हातात हात गुंफून फुलताना एकरुप होवून झुलायचे
ओल्याचिंब गारा आज पुन्हा एकदां वेचतो
आणि ओल्या म्हणून या आठवणींनाच सरी बनवीन म्हणतो

त्या दिवसांनी दिली कष्टाला स्फूर्ती, यशाला आनंदाची आसवे
चार गूंज मायेचे उन्हात चांदणे शिंपडल्यासवे
अनुभवण्या स्पर्शही आज पुन्हा एकदां धजतो
आणि ऊब म्हणून या आठवणींनाच कुस बनवीन म्हणतो

नसले उद्या सोबत्त कोणी तरी नसतील आठवणी सर्वस्व
वेदनेतले सुख शोधत असेल विवेकाचे वर्चस्व
आयुष्याचे आव्हान आज पुन्हा एकदां स्वीकारतो
आणि ध्येयं म्हणून या आठवणींचे अस्तित्वच नाकारीन म्हणतो...........
आणि ध्येयं म्हणून या आठवणींचे अस्तित्वच नाकारीन म्हणतो............

प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...

ती म्हणाली होती प्रेम आहे माझे तुझ्यावर
नाही उमजला अर्थ तेव्हा तिच्या बोलण्याचा

माझ्याजवळं ती नाही, आता प्रत्येक आठवण सांधतो आहे
न कळलेल्या प्रेमाचा अर्थ बांधतो आहे

कदाचीत प्रेम म्हणजे आपुलकीच्या बोलांसाठी आतुर्लेले कान
पावसात शब्दांच्या चिंबं विसरतातं देह्भान

कदाचीत प्रेम म्हणजे भेटीच्या ओढीत झुरणारी ती
का फक्त एका कटाक्ष्यासाठी त्याने ओवळून टाकलेला जीव

कदाचीत प्रेम म्हणजे पाणीदार बोलके डोळे
शब्द नको तिला उसने, ती डोळ्यातूनच बोले

कदाचीत प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला तीचा विचार पहिला
आजही त्याने अर्धा घास तिच्यासाठी ठेवला

कदाचीत प्रेम म्हणजे पापण्यांमधे जपलेला सागर
ठेचं लागतच त्याला, तीला फुटलेला अश्रुंचा पाझर

कदाचीत प्रेम म्हणजे आठवणींचे धूके दाटलेले
ती निघून गेल्यावर अश्रूंच्या दवबिंदूसंगे मला वेढ

आता मात्र शब्धही लागतात अपुरे पडू
भावनांची गर्दी कशी कागदावर उतरवू ?

पण आता कळतयं....
प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे
आपले विसरून दुसर्‍याच्या विश्वात रमंणे

प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...
प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...

या सुंदर जीवनात कधी कधी..

या सुंदर जीवनात कधी कधी..
पडायच असत प्रेमात कधी कधी
बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..
पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत
विचारात गुंतल्यासारख कधी कधी
अन पाहताना तिच्याकडेच
विचारात गुंतायच असत कधी कधी..
रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच...
जागुन अशी रात्र काढावी कधी कधी
नंतर "जागली होतिस का रात्री?"
म्हणून विचारावे कधी कधी..
मागायचा असतो देवाकडे..
हात तिचा चोरुन कधी कधी
द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..
चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या
विषय तिचा निघाल्यावर कधी कधी
असते रागवायचे लटकेच
"अस काही नाहिये" म्हणून कधी कधी
विरहात तीच्या ...
असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..
पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..
असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..
पडायच असत प्रेमात कधी कधी
बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी

तुला नाही जमत

खूप प्रयत्न करतेस तू पण तुला नाही जमत
चेहर्या वरील उधार हस्याने मनातील दुख नाही लपत
आशेच तू हसत हसत खूप खूप ब ड बडटेस
लक्ष नाही माझे पाहून हळूच आश्रू पुसतेस
खूप प्रयत्न करतेस तू पण तुला नाही जमत
हृदयाच्या खोल जखमा नाही भरत
आशेच तू मित्र मित्र म्हणत नेहमीच विषय बदलतेस
काही तरीच तुझे म्हणत वेडा मला ठरवतेस
खूप प्रयत्न करतेस तू पण तुला नाही जमत

"संधी" म्हणजे सकाळची "मुंबई लोकल"

-सचिन काकडे [जुलै १३,२००७]
संधी म्हणजे सकाळची "मुंबई लोकल"
हीला नेहमी सुटण्याआधीच पकडायचंय
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
तीला वेळेवर पकडायचंय
का तीच्यामागे धावत तिला पकडायचय


ध्येयाकडे जायला दिल्या नियतीने दोन लोकल
एक 'फ़ास्ट' लोकल तर दुसरी 'स्लो' लोकल
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
'फ़ास्ट' लोकलने निराशेचे स्टेशन चुकवायचय
की स्लोने प्रत्येक स्टेशन वर थांबायचय


एक गेली तर दुसरी ही नक्कीच येणार पण
ती येईपर्यंत वाट ही पाहावी लागणार
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
हवं तिथे वेळेवर पोहोचायचय
की उशीरा पोहोचायचय


ही लोकल वेळेवर पकडलीत तर
आरामात खिडकीपाशी हवेशीर जागा मिळणार
हीला पकडायला उशीर केला तर
दरवाजावरच लटकावे लागणार
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
खिडकीपाशी आरामात हवा खात बसायचय की
बळजबरीने दरवाज्यावर लटकायचाय


या लोकलने प्रवास करताना
तुम्हाला कोणाच जागा नाही देणार
गर्दीतुन जागा स्वत:ची तुम्हालाच करावी लागणार
एखाद्या पुढच्या माणसाला डावलुनच पुढे जाव लागणार
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
एखाद्याच्या आधाराने त्याच्या पायावर उभं राहायचय
की थोडी मेहनत करुन स्वत:च्या पायावर उभं रहायचय


मग आता

तुम्हीच ठरवा तुम्हाला जीवनाचे ध्येय कसं गाठायचंय
हवं त्या ठीकाणी कुठल्या लोकलने पोहोचायचं........................

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची

- रेखा
गजावर झुकलेल्या रातराणीसारखी
नजर तुझी झुकायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!
निंबोणीच्या झाडामागचा
चंद्रही गालात हसायचा
आभाळातल्या ढगालाही गुपित तुझ सांगायचा
त्याच्यावर उगी रागवायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!

कळी कळी वेचतांना तू
फुलाच्या कानात बोलायची
मी कितीही विचारल तरी आम्ही नाही जा म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची ....!!

तुझ मात्र बर आहे,येण जाण ही सुरु आहे
मागे वळून पाहतांना काळीज तोडून नेण आहे
भुवई ऊडवत जायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!

असे हे किती दिवस चालायच,मुकेपणातच बोलायच
सारे संकेत कळून सुध्दा न कळल्यागत करायच
अन डोळे मोठे करुन पाहायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!

आता मात्र सोसत नाही,
दिवस काय पण रात्र ही तुझ्याशिवाय जात नाही
असं का व्हावं म्हणून विचारल तरी का ?लाच कारण नसत म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नको

तु परत येऊ नकोस

तु परत येऊ नकोस,
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खुप दिवस लागलेत,
मनावरील जखमा भरायला.....

दुःख अंतरी दाबुन,
एकांतामध्ये रडत असतो,
म्हणुनच का कोणास ठावुक,
सर्वांसोबत हसत असतो.....

तु आयुष्यात परत येऊ नकोस,
तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय,
त्या सर्व आठवणी विसरायला.....

पण...
काहीही असले तरी........

तुला शोधायला तरी,
नजर माझी फिरत असते,
आकाशीचा चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटुन येते......

तुला विसरण्याचा,
आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,
पण ही कवीता लिहीता लिहीता,
पुन्हा तुलाच गं मी आठवतोय...

एकदा तरी

-राज पालकर
एकदा तरी मला तुला,
एकदा तरी मला तुला,
मनापासुन हसवायचंय,
दोन क्षण का असेनात्या निखळ हास्यात,
स्वतःला हरवायचंय...

फक्त एकदाच मला तुझ्या डोळ्यांत,
नजरेला नजर मिळवत बघायचंय,
डोळ्यांमागचं वादळ मला,
अनाहुतपणे अनुभवायचंय...

फक्त एकदातरी मला,
तुला प्रेमाने जवळ घ्यायचंय,
नाहीस जगात ह्या तु एकटी,
हेच तुला समजवायचंय...

फक्त एकदा तरी तुला,
माझ्यासाठी बेचैन होताना पाहायचंय,
त्यासाठी मला तुझ्याशी,
एकदा खोटं खोटंच भांडायचय...

मग मला तुझ्यासाठी,
एकदाच विदुषक व्हायचंय,
तुझा तो लटका राग मला,
चुटकीसरशी पळवायचंय...

तुझा हात मात्र मला,
आयुष्यभरासाठीच पकडायचाय,
प्रेम करतो किती तुझ्यावर,
हेच तुला सांगायचय...

कोसळणारा पाऊस

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी

यांचं असं का होतं ते कळत नाही

यांचं असं का होतं ते कळत नाही , किंवा यांना कळतं पण वळत नाही
निळं निळं वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार,
रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार!
त्याचं कौतुक नसतंच मुळी कधी यांच्यासाठी
यांच्यासाठी एकच असते कपाळाला आठी!
कधी सुद्धा यांची पापणी ढळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही ॥१॥

मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होते!
वेलची खाल्ली तरी व्हिस्कीचा वास येतो!!
यांचा धोशा सुरू असतो -अमकं खाऊ नका त्याने डोकं जडसं होतं
तमकं पिऊ नका त्याने पडसं होतं
कधीसुद्द्धा यांची पापणी ढळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही ॥२॥


सगळे कसे बागेत व्यायाम करत बसणार?
किंवा हातात गीता घेऊन चिंतन करत बसणार?
बागेतल्या कोपऱ्यात कुणी घट्ट बिलगून बसतच ना!
गालाला गाल लावून गुलगुल करत असतंच ना!
असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच,
यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच!
नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं,
पण यांना मुलं होतात हेच एक कोडं असतं!!
या कूट कोड्याचं उत्तर कधीच सुटत नाही, यांचं असं का होतं कळत नाही॥३॥

कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात,
एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात.
एरंडेल प्यायल्यावर आणखी वेगळं काय होणार?
एकच जागा ठरलेली, आणखी कुठे जाणार?!
कारण आणि परिणाम यांचं नातं ढळत नाही,
यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळत पण वळत नाही ॥४॥

एकदा

एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत
सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत
हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची
तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात
काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे
आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त खास आहे

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

शब्द

शब्द हसणारे,शब्द हसविणारे
शब्द रडणारे,शब्द रडविणारे

कधी मधाळ,तर कधी रसाळ
वेगवेगळ्या तर्हेचे,वेगवेगळ्या स्वभावाचे
कधी सागराप्रमाणे उसळ्णारे
तर् कधी झरयाप्रमणे खळखळणारे

शब्द,कधी भांडतत,कधी कुजबुजतात
कधी रुसतात,कधी उमलतात
आणि कधीतरी फक्त डोळ्यातूनच कळतात

भावनेच्या पोटी जन्म घेउन
तिचे अस्तीत्व दाखवतात
आणि कधी कधी मात्र शब्दच
निशब्द होतात........

अचानक कधीतरी....

सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचं
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाऊन निघायचं,
काळजी, द्वेष, सारं फेकुन द्यायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

आपलं अस्तित्व या दुनियेत पहायचं,
आपलं महत्वं कुठे आहे का, हे सतत शोधायचं,
आपल्या प्रियजनांना नेहमीच जपायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

आपलं सारं कही, क्षणात दुसर्‍याला द्यायचं
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचं,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.


पण? पण अजून मला बरंच काही पहायचंय
या दुनियेकडुन, खूप काही शिकायचयं,
इथे, मलाही काहीतरी बनायचयं
म्हणून मला अजून, भरपूर जगायचं ....भरपूर जगायचं .....भरपूर जगायचं .....
सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचं
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाऊन निघायचं,
काळजी, द्वेष, सारं फेकुन द्यायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

आपलं अस्तित्व या दुनियेत पहायचं,
आपलं महत्वं कुठे आहे का, हे सतत शोधायचं,
आपल्या प्रियजनांना नेहमीच जपायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

आपलं सारं कही, क्षणात दुसर्‍याला द्यायचं
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचं,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.


पण? पण अजून मला बरंच काही पहायचंय
या दुनियेकडुन, खूप काही शिकायचयं,
इथे, मलाही काहीतरी बनायचयं
म्हणून मला अजून, भरपूर जगायचं ....भरपूर जगायचं .....भरपूर जगायचं .....

मनाला आपणच आवरायचं असतं....

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात


भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं

Tuesday, July 10, 2007

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल !!

-कुसूमाग्रज.

पुरे झाले सुर्य चंद्र, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा
जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा,
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापुर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुध्दा आभाळात पोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंड्या सारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल!

कुणीतरी असावे

कुणीतरी असावे
कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं,
भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं,

कुणीतरी असावे
पैलतीरी साद घालणारं,
शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं,

कुणीतरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर नेणारं,
अंधारलेल्या वाटेत आपल्याबरोबर येणारं,

कुणीतरी असावे,
फ़ुलांसारख फ़ुलणारं,
फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं,

कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं,
पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणारं..

धूके दाटलेले उदास उदास

-मंगेश पाडगांवकर

धूके दाटलेले उदास उदास
धूके दाटलेले उदास उदास
मला वेढीती हे तुझे सर्व भास ॥धृ.॥

उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन फिरे आर्त वारा
कुणी ही ना इथे दिसे आसपास ॥१॥

कुठे चालल्या या दिशाहीन वाटा
कुणा शोधिती या उदासीन लाटा
दिशांतून दाटे, तुझा एक ध्यास ॥२॥

क्षणी भास होतो, तुझे सूर येती
जीवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास ॥३॥

गणपत वाणी

- बा.सी.मर्ढेकर

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गि~हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!

योगा योग

योगा-योगही किती सुंदर असतात,
जसे दवबिंदू हिरव्यागार पानावर स्थिरावतात,
या योगा-योगांचे महत्व तरी पहा,
अनोळखी ही अगदी आपलेसे होतात...

एखादी घटना छानपैकी जुळुन येते,
योगा-योग यालाच तर म्हटले जाते,
या जुळलेल्या घटनाही किती सुखद असतात,
क्वचित अनमोल असा ठेवाही देऊन जातात....

प्रत्येक नाण्याला दुसरी बाजु असते,
योगाची कथाही वेगळी नसते,
योगा-योगालाही दुर्दैवाची किनार असते,
क्वचित सर्वस्वाचीही धुळधाण करते....

योगा-योगालही काही चवी असतात,
सहा रसांची याला देणगी असते ,
यांची चव घेता घेता माणुस शहाणा होतो,
योगा-योग योगा-योगानेच होतो हे समजतो...

Thursday, July 05, 2007

त्याला पाऊस आवडत नाही

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.
पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं.
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.
पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.

Wednesday, July 04, 2007

आई...

आई साठी काय लिहु
आई साठी कसे लिहु
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तीमत्व मोठे

जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातील छ्त्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं तसं ठंडगार पाणी

आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी............