Friday, July 13, 2007

ते बघ सुख येतयं

देवानं आपल्याला का पाठवलं?
थोडसं सुख वाटावं असचं त्याला वाटलं
दुःख तर येणारचं ते आपण गोळा केलं
तुझ्यावर मैत्री रुसली
माझं तर प्रेमच हरवलं
पण सुख वाटायचं मी का थांबवलं?
तु सुख वाटलस पण दुःख घ्यायचं राहीलं
तु त्या दडलेल्या अश्रुंना वाटेतच का नाही सोडलं?
अरे आनंदाला तु सगळीकडे पाहिलं
पण त्याला आपण भेटायचं राहीलं
त्या अश्रुंना लपवू नकोस
त्यांना वाहू दे
ते बघ सुख येतयं
त्याला विसावू दे.......

तुलाही हीच स्थिती असेल का जाणवत?
हे जग विसरले मी तुला पाहत
मी झाले तुझी हळूच नजर वळवत
तुही तरंग उठवलेस नजरेला नजर मिळवत
अन् माझ्या विश्वात आलास तू नकळत
भान हरपले माझे तुला ह्रदयी साठवत
अचानक शब्द ओठांवर घाबरत
त्या शब्दांनी सांगितली एका भिंतीची तफावत
तरीही नजरेने ठेवल्या भावना तुझ्याशी जुळवत
कधी कधी पेटून उठलेल्या शंका मला अडवत
पण तुझ्या हास्याने ठेवले ते वारे वाहत
नेहमी शब्दांपेक्शा नजरा कायम बोलत
तू नसल्यावर तुझ्या आठवणी भिजवत
तुला पाहण्यासाठी हा जीव राही तळमळत
असंख्य विचार माझ्या मनात धावत
तुलाही हीच स्थिती असेल का जाणवत?
असे अनेक प्रश्न मला सतावत
अजुनि जगत आहे त्या प्रश्नांची उत्तरे शोधत?

धीर कर जरा
सांगू की नको करत दिवस जात आहेत
बोलून ज्या गोष्टी समजत नाहीत
नजरेतून त्या समजत आहेत
एवढा संयम का ते कधी कळणार?
मनातलं मनात राहतयं
ते ओठावर कधी येणार?
नजरेचा अर्थ कळलेला दिसतोय बरा!
मनात काय आहे
ते सांगायचा धीर कर जरा?

No comments: