Wednesday, November 15, 2006

पुणे बोललं तेव्हा




पुणे बोललं तेव्हा
आज मला बोललंच पाहिजे
बोलूनही काही झालं नाही तर ओरडलंच पाहिजे
पुण्यात काय उणे ?
ते स्वतःचं सांगितले पाहिजे.


बिहार, युपी दिल्ली इथे घुसले आहेत
स्वतःचे असे माझे सगळे रुसले आहेत
आज इथले सारे कट्टे मोकळे आहेत
आई बाबा बागेत फिरताना एकले आहेत


महाराज, बाजीराव पासून बऱ्याचं नंतर
गोखले, आगरकर, टिळक पर्यंतचे अंतर
महापुरुषांची जागा ओसाड आता पडली आहे
गल्ली बोळ मात्र, राजकारणी कोल्हया कुत्र्यानं भरली आहेत


बंगलोर नक्कीच जास्ती थंड आहे
मुंबई पेक्षा इथला धंदा मंद आहे
हैद्राबाद्च्य्या तर रस्त्यांची ही बरकत आहे
इथे मात्र चालतानाही तुमची कसरत आहे


पण सोडून मला म्हणून जाऊ नका रे !
पुणेकरांनो ! उठा रे ! पुणे तिथे काय उणे ते सार्थ करा रे !
"silicon valley " इथेच बनवा , "detroit" पण इथेच घडवा,
MIT, Harvard हून परत या ... इथेच विद्येच एक मंदिर बनवा


चला आता जागे व्हा !!
इतिहास परत घडवायचा आहे
सोन्याच्या नांगर घेऊन
बाविसाव्या शतकातलं पुणं नांगरायचं आहे !! """"
..........


Aiport वर उतरताच , कोणीतरी मला खुणावतं होत
पाहिलं तर चक्क पुणे माझ्याशी बोलत होत
बोलत कसलं निष्कारणं ओरडतच होत
माझ्यातल्या मेलेल्या पुणेकराला आव्हान देत होत.


आव्हानां वर त्याच्या मी भित्रा मनात हसलो,
शेवटी पुण्यालाच पाठ दाखवून मी तसाच फिरलो,
म्हणालो : स्वप्न इथल्या होणार सगळ्यांची साकार,
पुणे मात्र असच वेदनांनी जळत राहणार.


हरलेल्या मनात एक विचार येऊनही
मी नाही बोललो काही
एकदाच वळून सांगावंसं वाटलं पुण्याला
"धीर धर : हि फक्त तात्पुरती माघार आहे, अंतिम शरणागती नाही"




No comments: