Thursday, May 17, 2007

पुन्हा एकदा....

पुन्हा एकदा....
(ह्या कवीतेतुन कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतु नाही तुमचे ह्या बाबतीतले विचार प्लिज मला रिप्लाय करा.)

आजकालचे राजकारणी साले असेच खेळ खेळतात,
दुसरयाच्या खांद्यावर बंदुक ठेवुन आपल्यावरच वार करतात,
गरीबांच्या जिवावरच ते निवडणुका लढवतात,
निवडुन आल्यावर मात्र आपल्यावरच पलटतात.

निवडुन यायच्या आधी त्यांना मायबाप बोलतात,
निवडुन आल्यावर त्यांच्याच जिवावरच उठतात,
वेगवेगळी नाटके करुन पैसा फक्त लाटतात ,
समाजसेवेचे व्रत घेऊन पैसा फक्त खातात,
समोर आल्यावर पैसा जनतेला विसरतात.

वेगवेगळ्या नावाने अनेक धंदे करतात,
पकडले गेल्यानंतर फक्त हॉस्पीटलचा रस्ता धरतात,
पकडायच्या आधी जे हट्टे खट्टे असतात,
त्यानंतर आजारीपणाच्या नावाखाली जामीनीवर सुटतात.

चारा ,धान्य अगदी शवपेट्यांचे घोटाळे करतात,
सगळा माल पचवुन मग सुखाची ढेकरही देतात,
आपण मोकाट सुटुन मग निरपराधांना त्यामध्ये फसवतात,
स्वतःहा एसी गाडीत बसुन ते फक्त इंटरव्यु देतात.

सरावलेले चोर साले ते मग चौकशीचे आदेश देतात,
आता अजुन काय बाकी ह्याचाच विचार करतात,
प्रत्येक महीन्याला काहीतरी नवीन बातमी पसरवतात,
मोर्चे काढयला लावुन जनतेची दिशाभुल सहज करतात.

मागेपुढे न पाहाता पोलीसांना लाठीचार्जचा आदेश देतात,
नंतर विचारपुस करुन जखमींची सहानभुतीही मिळवतात,
जनतेच्या डोळ्यांत किती सहजतेने धुळ फेकतात,
हे साले भामटे स्वतःला राजकारणी म्हणवतात.

विकासाच्या नावाखाली सगळे मते मागतात,
आपल्या घराचा विकास करुन देश विकायला लावतात,
कर्जे घेऊन भरमसाठ ति तशीच ठेवतात,
शेतकरयांना पँकेजेचे म्रुगजळ दाखवत राहातात.

निवडणुकीच्या वेळी तर मोठा चमत्कारच करतात,
जिंकुन आलो तर हे करीन ते करीन असे सांगतात,
जिंकेले तर सारे सहजपणे विसरुन जातात,
हरले तर विरोधी पार्टीचा डाव घोशीत करतात.

नागरीकांवर अघोषीत सम्राटशाही करतात,
भारत आहे प्रजासत्ताक ह्याचे सर्वत्र गुणगान करतात,
पकडुन ठेवलेल्या आतंकवाद्यांची देखभाल करतात,
आणी मग आतंकवादी हल्याची निंदा करतात.

गेंड्याची कातडी आपली फार जपून ठेवतात,
आणी मग सफेद कपडे घालुन वर समाजामध्ये वावरतात,
आपल्या देशाचे नेते असे गुणी असतात,
पापे करतात अनेक आणी गंगास्नान करतात,
तेच गंगेचे पात्र साफ करण्यासाठी परत टेंडर मागवतात,
का झाली अशुध्द ह्याचा मग विचार करत बसतात.

आता खरी वेळ आलीय जनतेने आवाज उठवण्याची,
ह्या समाजाच्या किडींना दुर फेकुन देण्याची,
आठवण करा त्या स्वातंत्र लढ्याची,
अनेकांनी डेशासाठी केलेल्या प्राणार्पणाची,
चला सर्व मिळुन सुरु करु तयारी परत त्या लढ्याची,
पुरे झाली तानाशाही ह्या भारतीय गेंड्यांची,
साथ जर असेल ह्याला आपणां सर्वांची,
होईलही भारतात नांदी पुन्हा एकदा शांतीची.

No comments: